शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

कुठलीही गोष्ट सांभाळून करावी लागते, विनोद तावडे यांची भूमिका  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 06:33 IST

दिवाळीची सुट्टी, त्या आधीची परीक्षा हे लक्षात घेत यंदा जमेल तसा वाचन प्रेरणा दिवस साजरा करा , असे शासनाने सांगितले होते. अन्यथा ‘मंत्र्याच्या हट्टापायी परीक्षा सोडून मुलांना जुंपले वाचनाला’ अशा बातम्या यायच्या.

ठाणे : दिवाळीची सुट्टी, त्या आधीची परीक्षा हे लक्षात घेत यंदा जमेल तसा वाचन प्रेरणा दिवस साजरा करा , असे शासनाने सांगितले होते. अन्यथा ‘मंत्र्याच्या हट्टापायी परीक्षा सोडून मुलांना जुंपले वाचनाला’ अशा बातम्या यायच्या. पूर्वी नाही, पण हल्ली अशा ब्रेकिंग न्यूज यायला लागल्या आहेत. त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना सांभाळून करावी लागते. चांगले करतानाही कोणाला अनावश्यक कोलीत मिळणार नाही, याची काळजी घ्यावी लागते, अशा शब्दात सांस्कृतिक व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी ठाण्यात आपली बाजू मांडली.व्यास क्रिएशन्स् आणि थिएटर कोलाजच्यावतीने भगवती मंदिराच्या टेरेस हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर लेखिका सुमन नवलकर, श्री. वा. नेर्लेकर, निलेश गायकवाड, पल्लवी वाघ उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तावडे बोलत होते.मराठी वाचक कमी झाला, असे आपण ऐकतो. मात्र साहित्य संमेलनांमध्ये आजही ग्रंथ दालनातून कोट्यवधी रूपयांच्या पुस्तकांची विक्री होते आणि अनेक जण ही पुस्तके त्यांना त्यांच्या परिसरात मिळत नाहीत, म्हणून घेतात. त्यामुळे वाचनाची आवड प्रचंड आहे. मात्र पुस्तके पोहोचत नाही म्हणून वाचक नाहीत, अशी परिस्थिती असल्याचे निरीक्षण त्यांनी मांडले. वाचकांपर्यंत साहित्य कसे पोचेल, याचा विचार केला तर मराठी साहित्याचा वाचक कमी झाला, असे म्हणण्याची वेळ येणार नाही. जेव्हा भिलारला पुस्तकांच गावं निर्माण करावं अशी संकल्पना मांडली, तेव्हा त्याबाबत अनेकांनी शंका घेतली. आज तिथे शाळांच्या सहली जातात. वाचनप्रेमी तिथे जाऊन तासन्तास पुस्तक वाचतात. घरातील सुखदु:ख विसरून तेथील लोकही पर्यटक, पुस्तकप्रेमींची सेवा करतात. इतके त्या गावाने आणि गावकºयांनी स्वत:ला पुस्तकाच्या, वाचनाच्याप्रती समर्पित केले आहे आणि लोकांनीही पुस्तकाच्या गावाची संकल्पना उचलून धरली आहे. ही महाराष्टÑाची सांस्कृतिक भूक आहे. आजची मराठी पिढी इंग्लिशमध्ये शिकते आहे. मात्र पुलं, वपु म्हणजे काय? हे त्यांना कळत नाही. आपले साहित्य संचित नवीन पिढीने गमावता कामा नये. त्यांनी ते पुढे नेत राहिले पाहिजे. त्यासाठी तरूण पिढीला आकर्षित करणारे साहित्यही निर्माण करण्याची गरज आहे, असे मत तावडे यांनी व्यक्त केले.यावेळी व्यास क्रिएशनने अभिनय कट्टा, थिएटर कोलाज, नुपूर नृत्यालय, नवजीवन विद्या मंदिर, भारतीय जनता रिक्षा चालक मालक संघ यांना पुस्तकांचे संच भेट दिले. थिएटर कोलाजच्या मुलांनी दिलेल्या प्रतिकात्मक ग्रंथपेटीचे तावडे यांनी उद््घाटन केले आणि बच्चेकंपनीने त्यातील पुस्तके लुटली.टीएमटीवर कोणाचा भरवसा हाय काय?ज्या ठाण्यात आयुक्तांनी की आणखी कोणी रिक्षावाल्यांवर दांडगाई केली, ते संजय वाघुलेंना चांगले माहित आहे. परंतु अशा रिक्षाचालकांना आज या उपक्रम सामावून घेतले हे विशेष. ठाणे रेल्वे स्थानकावर रात्री रिक्षावाले नसतात, तेव्हा त्यांची गरज जाणवते. टीएमटीवर कोणाचा भरोसा हाय काय? अशा शब्दांत तावडे यांनी रिक्षाचालकांची पाठराखण करत टीएमटीच्या व्यवस्थापनाला चिमटे काढले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे