शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कुठलीही गोष्ट सांभाळून करावी लागते, विनोद तावडे यांची भूमिका  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 06:33 IST

दिवाळीची सुट्टी, त्या आधीची परीक्षा हे लक्षात घेत यंदा जमेल तसा वाचन प्रेरणा दिवस साजरा करा , असे शासनाने सांगितले होते. अन्यथा ‘मंत्र्याच्या हट्टापायी परीक्षा सोडून मुलांना जुंपले वाचनाला’ अशा बातम्या यायच्या.

ठाणे : दिवाळीची सुट्टी, त्या आधीची परीक्षा हे लक्षात घेत यंदा जमेल तसा वाचन प्रेरणा दिवस साजरा करा , असे शासनाने सांगितले होते. अन्यथा ‘मंत्र्याच्या हट्टापायी परीक्षा सोडून मुलांना जुंपले वाचनाला’ अशा बातम्या यायच्या. पूर्वी नाही, पण हल्ली अशा ब्रेकिंग न्यूज यायला लागल्या आहेत. त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना सांभाळून करावी लागते. चांगले करतानाही कोणाला अनावश्यक कोलीत मिळणार नाही, याची काळजी घ्यावी लागते, अशा शब्दात सांस्कृतिक व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी ठाण्यात आपली बाजू मांडली.व्यास क्रिएशन्स् आणि थिएटर कोलाजच्यावतीने भगवती मंदिराच्या टेरेस हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर लेखिका सुमन नवलकर, श्री. वा. नेर्लेकर, निलेश गायकवाड, पल्लवी वाघ उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तावडे बोलत होते.मराठी वाचक कमी झाला, असे आपण ऐकतो. मात्र साहित्य संमेलनांमध्ये आजही ग्रंथ दालनातून कोट्यवधी रूपयांच्या पुस्तकांची विक्री होते आणि अनेक जण ही पुस्तके त्यांना त्यांच्या परिसरात मिळत नाहीत, म्हणून घेतात. त्यामुळे वाचनाची आवड प्रचंड आहे. मात्र पुस्तके पोहोचत नाही म्हणून वाचक नाहीत, अशी परिस्थिती असल्याचे निरीक्षण त्यांनी मांडले. वाचकांपर्यंत साहित्य कसे पोचेल, याचा विचार केला तर मराठी साहित्याचा वाचक कमी झाला, असे म्हणण्याची वेळ येणार नाही. जेव्हा भिलारला पुस्तकांच गावं निर्माण करावं अशी संकल्पना मांडली, तेव्हा त्याबाबत अनेकांनी शंका घेतली. आज तिथे शाळांच्या सहली जातात. वाचनप्रेमी तिथे जाऊन तासन्तास पुस्तक वाचतात. घरातील सुखदु:ख विसरून तेथील लोकही पर्यटक, पुस्तकप्रेमींची सेवा करतात. इतके त्या गावाने आणि गावकºयांनी स्वत:ला पुस्तकाच्या, वाचनाच्याप्रती समर्पित केले आहे आणि लोकांनीही पुस्तकाच्या गावाची संकल्पना उचलून धरली आहे. ही महाराष्टÑाची सांस्कृतिक भूक आहे. आजची मराठी पिढी इंग्लिशमध्ये शिकते आहे. मात्र पुलं, वपु म्हणजे काय? हे त्यांना कळत नाही. आपले साहित्य संचित नवीन पिढीने गमावता कामा नये. त्यांनी ते पुढे नेत राहिले पाहिजे. त्यासाठी तरूण पिढीला आकर्षित करणारे साहित्यही निर्माण करण्याची गरज आहे, असे मत तावडे यांनी व्यक्त केले.यावेळी व्यास क्रिएशनने अभिनय कट्टा, थिएटर कोलाज, नुपूर नृत्यालय, नवजीवन विद्या मंदिर, भारतीय जनता रिक्षा चालक मालक संघ यांना पुस्तकांचे संच भेट दिले. थिएटर कोलाजच्या मुलांनी दिलेल्या प्रतिकात्मक ग्रंथपेटीचे तावडे यांनी उद््घाटन केले आणि बच्चेकंपनीने त्यातील पुस्तके लुटली.टीएमटीवर कोणाचा भरवसा हाय काय?ज्या ठाण्यात आयुक्तांनी की आणखी कोणी रिक्षावाल्यांवर दांडगाई केली, ते संजय वाघुलेंना चांगले माहित आहे. परंतु अशा रिक्षाचालकांना आज या उपक्रम सामावून घेतले हे विशेष. ठाणे रेल्वे स्थानकावर रात्री रिक्षावाले नसतात, तेव्हा त्यांची गरज जाणवते. टीएमटीवर कोणाचा भरोसा हाय काय? अशा शब्दांत तावडे यांनी रिक्षाचालकांची पाठराखण करत टीएमटीच्या व्यवस्थापनाला चिमटे काढले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे