शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

मनीषाच्या कुटुंबीयांची विचारपूसही नाही, भाऊ मनोज निचिते यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 3:45 AM

शिवाजी चौकातील सदोष रस्त्यामुळे दुचाकीवरून पडून माझी सख्खी लहान बहीण मनीषा भोईर हिचा मृत्यू झाला. तिच्यावर घराचा डोलारा होता. तिच्या मृत्यूच्या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

 - मुरलीधर भवार कल्याण : शिवाजी चौकातील सदोष रस्त्यामुळे दुचाकीवरून पडून माझी सख्खी लहान बहीण मनीषा भोईर हिचा मृत्यू झाला. तिच्यावर घराचा डोलारा होता. तिच्या मृत्यूच्या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. आंदोलने तसेच रस्त्यांची पाहणी झाली. मात्र, मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांची विचारपूस करण्यासाठी एकही व्यक्ती तिच्या घरी फिरकली नाही. यावरून आपली संवेदना किती मृत झाली आहे, असा सवाल भोईर यांचा भाऊ मनोज निचिते यांनी केला आहे.मनोज हा रिक्षा चालवून तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मनीषाचा ७ जुलैला शिवाजी चौकात दुचाकीवरून पडून मृत्यू झाल्याची माहिती तिचे पती धनाजी यांनी मनोजला दिली. ती ऐकून त्याला धक्का बसला. घटनास्थळी धाव घेत त्याने मनीषाला रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.कल्याणच्या के.सी. गांधी विद्यालयात मनीषा शिपाई होत्या. त्याचबरोबर काही घरांमध्ये धुणीभांडीची कामे करत होत्या. ७ जुलैला सायंकाळी शाळा सुटली, तेव्हा पाऊस होता. त्या रस्त्याने जात असताना त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने त्यांना दुचाकीने घरी सोडतो, असे सांगितले. मनीषा त्याच्या गाडीवर बसल्या. १०० मीटर अंतरावर गाडी जात नाही, तोच शिवाजी चौकातील असमान रस्त्यावरून गाडी घसरून मनीषा खाली पडल्या. त्यांच्या अंगावरून शेजारून जाणारी बस गेली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.मनोजने सांगितले की, धनाजी हे कूक असून खडकपाड्यातील हॉटेलमध्ये काम करतात. त्यांना कायमस्वरूपी नोकरी नाही. मनीषाला तीन मुली व एक मुलगा आहे. मोठी मुलगी मयूरी (वय १९) ही एका खाजगी कंपनीत कामाला आहे. दुसरी मुलगी माधुरी (वय १८) असून तिचे लग्न झालेले आहे. तिसरी मुलगी खुशबू (वय १६) हिचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तर, मुलगा सागर हा वाणी विद्यालयात सातवीत शिकत आहे. मनीषा काम करून मुलांना शिकवत होती. तिच्या मृत्यूमुळे भोईर कुटुंबाचा आधार हरपला आहे.मनीषाच्या अपघातप्रकरणी बेजबाबदार अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी होत आहे. आंदोलनेही झाली. अशा प्रकारच्या घटना पुढे होऊ नयेत, यासाठी आंदोलने केली जात असतील, तर चांगली बाब आहे. मात्र, मनीषाच्या घरी एकही राजकीय व्यक्ती, लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी फिरकलेले नाहीत. मनीषाच्या कुटुंबाची कोणी साधी विचारपूस केली नाही. तिच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. शहरातील करदात्या नागरिकांना चांगले रस्ते मिळत नाहीत. रस्ते विकास महामंडळावर जबाबदारी ढकलली जात आहे. या आरोप-प्रत्यारोपांत मनीषाच्या कुटुंबीयांना न्याय मिळणार आहे का? की केवळ ही एक दुर्दैवी घटना आहे, असे बोलून अधिकारी व सगळेच वेळ मारून नेणार आहेत, असा प्रश्न मनोजने केला आहे.मदतीसाठी ठरावाची मागणी करावीकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सदस्या छाया वाघमारे यांनी मनीषा भोईरच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली. त्यावर स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी या विषयी महासभेत ठराव करण्याची सगळ्यांनी मागणी करावी, अशी सूचना केली. 

टॅग्स :kalyanकल्याणnewsबातम्या