शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
6
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
7
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
8
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
9
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
10
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
11
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
12
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
13
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
14
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
15
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
16
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
17
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
18
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
19
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
20
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल

जमीन संपादनासाठी पैसेच नाहीत; ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 09:05 IST

ऐरोली-काटई मार्गासाठी शासनाकडे ४०८ कोटींची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ऐरोली-काटई या महत्त्वपूर्ण मार्गात येणाऱ्या शीळ, डावले, डोमखार व देसाई या गावांतील भूसंपादनासाठी महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने हा प्रकल्प रखडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच यातून मार्ग काढण्यासाठी पालिकेने राज्य शासनापुढे हात पसरले आहेत. 

महापालिकेने जमिनीच्या भूसंपादनासाठी शासनाकडे तब्बल ४०८ कोटी ७५ लाखांची मागणी सात महिन्यांपूर्वीच केली आहे.  ऐरोली-काटई मार्ग हा नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. एमएसआरडीएच्या माध्यमातून या १२ कि.मी. मार्गाची उभारणी केली जात आहे. हा मार्ग ठाणे महापालिकेच्या हद्दीतील शीळ, डावले, डोमखार आणि देसाई गावांतून जाणार आहे. या जागेचे भूसंपादन करण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेची आहे. या नियोजित ४५ ते ६५ मीटर मार्गापैकी ३० मीटर रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रस्ताव महापालिकेने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून कामासाठी निधी देण्याची मागणी राज्य शासनाकडे सात महिन्यांपूर्वी केली होती. 

यामुळे झाली खर्चात वाढ

एमएमआरडीएने ३० ऐवजी विकास आराखड्यात दाखविल्याप्रमाणे ४५ मीटर रुंद रस्त्याचे भूसंपादन करण्याबाबत पालिकेला कळविले होते. यामुळे पालिकेने नव्याने प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावास पालिकेच्या प्रशासकीय महासभेने अलीकडेच मान्यता दिली. ठाणे महापालिकेने यापूर्वी तयार केलेल्या प्रस्तावानुसार ३० मीटर रुंद रस्त्याच्या भूसंपादनाकरिता २५४ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित होता. मात्र, नव्या प्रस्तावात ४५ मीटर रुंद रस्त्याचे भूसंपादन करण्यासाठी ४०८ कोटी ७५ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

आर्थिक स्थिती बिकट

ऐरोली-काटई या मार्गाच्या भूसंपादनासाठी पालिका प्रशासनाने एक प्रस्ताव तयार करून पैशांची मागणी केली. कोरोनानंतर पालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली. आजही पालिकेची स्थिती सावरू शकलेली नाही.

प्रकल्प शासनाचा आहे, त्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात भूसंपादन करावयाचे आहे. ते महापालिकेला शक्य नाही आणि तेवढा निधीही पालिकेकडे नाही. त्यामुळे शासनाकडे निधीची मागणी केलेली आहे. - संग्राम कानडे, सहायक नगर रचना संचालक, ठाणे महापालिका

 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाairoli-acऐरोली