शहरं
Join us  
Trending Stories
1
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
2
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
3
"बलात्कार करायचा तर करा, पण, आमच्या पती, मुलांना सोडा…’’ मुर्शिदाबाद प्रकरणी कोर्टासमोर आली धक्कादायक माहिती   
4
३६० अंकांनी घसरल्यानंतर सेन्सेक्सची १५०० अंकांची झेप; 'ही' आहेत तेजीची ५ कारणे
5
रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..."
6
Video: धोनीने जिंकली चाहत्यांची मनं..!! व्हिलचेअर बसलेल्या चाहतीजवळ स्वत: जाऊन काढला 'सेल्फी'
7
गुजरातमधील पाटण जिल्ह्यात भीषण अपघात; बस आणि ऑटोरिक्षाच्या धडकेत ६ जण ठार!
8
IPL 2025: ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
9
सलमानचा 'सिकंदर' ठरला फ्लॉप, सपोर्टला आला अक्षय कुमार, म्हणाला-"टाइगर जिंदा है, हमेशा जिंदा रहेगा"
10
रेश्मा केवलरमानी यांचा अमेरिकेत डंका! टाईम मासिकाच्या टॉप १०० यादीत एकमेव भारतीय
11
CM फडणवीसांचा नव्या शैक्षणिक धोरणाला पाठिंबा; म्हणाले, “मराठी आली पाहिजे, पण हिंदी...”
12
ऑटोमॅटीक कार चालवत असाल किंवा एकाच जागी बसून असाल तर काय कराल? डीव्हीटी काय असतो...
13
Aligarh: "मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?
14
हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा; नेते म्हणाले, “आमच्यावर भाषा लादू शकत नाही”
15
"३ महिन्यात निर्णय घ्या"; कोर्टाच्या निर्णयावर उपराष्ट्रपती नाराज, म्हणाले, "न्यायालय आदेश देऊ शकत नाही"
16
२०३२ पर्यंत गुरुची अतिचारी गती: ९ राशींना गुरुबळ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; बक्कळ लाभ, भरभराट!
17
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
18
IPL 2025: २५ दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज काव्या मारनला हसवणार की रडवणार? प्रकरण काय
19
पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, दिल्ली- राजस्थान सामन्यात काय घडलंं?
20
चीनच्या कंपनीने मारुतीच्या फ्राँक्सची कॉपी केली; 1200 किमी रेंजवाली एसयुव्ही लाँच केली

जमीन संपादनासाठी पैसेच नाहीत; ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 09:05 IST

ऐरोली-काटई मार्गासाठी शासनाकडे ४०८ कोटींची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ऐरोली-काटई या महत्त्वपूर्ण मार्गात येणाऱ्या शीळ, डावले, डोमखार व देसाई या गावांतील भूसंपादनासाठी महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने हा प्रकल्प रखडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच यातून मार्ग काढण्यासाठी पालिकेने राज्य शासनापुढे हात पसरले आहेत. 

महापालिकेने जमिनीच्या भूसंपादनासाठी शासनाकडे तब्बल ४०८ कोटी ७५ लाखांची मागणी सात महिन्यांपूर्वीच केली आहे.  ऐरोली-काटई मार्ग हा नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. एमएसआरडीएच्या माध्यमातून या १२ कि.मी. मार्गाची उभारणी केली जात आहे. हा मार्ग ठाणे महापालिकेच्या हद्दीतील शीळ, डावले, डोमखार आणि देसाई गावांतून जाणार आहे. या जागेचे भूसंपादन करण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेची आहे. या नियोजित ४५ ते ६५ मीटर मार्गापैकी ३० मीटर रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रस्ताव महापालिकेने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून कामासाठी निधी देण्याची मागणी राज्य शासनाकडे सात महिन्यांपूर्वी केली होती. 

यामुळे झाली खर्चात वाढ

एमएमआरडीएने ३० ऐवजी विकास आराखड्यात दाखविल्याप्रमाणे ४५ मीटर रुंद रस्त्याचे भूसंपादन करण्याबाबत पालिकेला कळविले होते. यामुळे पालिकेने नव्याने प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावास पालिकेच्या प्रशासकीय महासभेने अलीकडेच मान्यता दिली. ठाणे महापालिकेने यापूर्वी तयार केलेल्या प्रस्तावानुसार ३० मीटर रुंद रस्त्याच्या भूसंपादनाकरिता २५४ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित होता. मात्र, नव्या प्रस्तावात ४५ मीटर रुंद रस्त्याचे भूसंपादन करण्यासाठी ४०८ कोटी ७५ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

आर्थिक स्थिती बिकट

ऐरोली-काटई या मार्गाच्या भूसंपादनासाठी पालिका प्रशासनाने एक प्रस्ताव तयार करून पैशांची मागणी केली. कोरोनानंतर पालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली. आजही पालिकेची स्थिती सावरू शकलेली नाही.

प्रकल्प शासनाचा आहे, त्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात भूसंपादन करावयाचे आहे. ते महापालिकेला शक्य नाही आणि तेवढा निधीही पालिकेकडे नाही. त्यामुळे शासनाकडे निधीची मागणी केलेली आहे. - संग्राम कानडे, सहायक नगर रचना संचालक, ठाणे महापालिका

 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाairoli-acऐरोली