शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

दिल्या-घेतल्या पाण्याचा हिशेब नसल्याने ठणठणाट

By संदीप प्रधान | Updated: November 7, 2022 06:43 IST

मुंबईतील दीड कोटीहून अधिक लोकसंख्येची तहान ठाणे जिल्हा भागवतो.

मुंबई शहराची तहान भागवणारी धरणे ठाणे जिल्ह्यात आहेत. यंदा पाऊसही मुबलक झाला आहे; परंतु जिल्ह्यातील सर्वच शहरांमधील काही भागांत भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. अनधिकृत बांधकामांना दिले जाणारे बेकायदा कनेक्शन, टँकर माफियांकडून होणारी पाणीचोरी आणि दिल्या- घेतल्या पाण्याचा हिशेब ठेवणारी यंत्रणाच अस्तित्वात नसणे, यामुळे जिल्ह्यातील शहरे तहानलेली आहेत.

मुंबईतील दीड कोटीहून अधिक लोकसंख्येची तहान ठाणे जिल्हा भागवतो. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरात आहेत; परंतु शहापूर व मुरबाड या ग्रामीण भागातील १६७ गावपाड्यांत टँकरने पाणीपुरवठा केला जातो. ग्रामीण भागात ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ हे चित्र आहे. याखेरीज ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, उल्हासनगर, मीरारोड- भाईंदर, अशा सर्वच शहरांत पाणीटंचाई जाणवते. ठाण्यातील घोडबंदर, कळवा, वागळे इस्टेट, दिवा या भागांतील अनेक टॉवर, चाळी, झोपडपट्ट्यांमध्ये वर्षभर पाणीटंचाई जाणवते. घोडबंदर रोड येथे मोठमोठे टॉवर उभे राहिले. तेथील फ्लॅटची ८० ते ९० लाखांना विक्री केली गेली; परंतु तेथे राहायला येणाऱ्यांना दररोज दोन ते तीन टँकर मागवावे लागतात. एका टँकरचे तीन ते सात हजार रुपये मोजावे लागतात. याचा अर्थ वर्षानुवर्षे येथील रहिवाशांना हा त्रास सहन करावा लागणार आहे. कोपरी परिसरात आता मुंबई महापालिकेने अतिरिक्त पाणीपुरवठा केल्याने परिस्थिती सुधारली. घोडबंदरच्या रहिवाशांना भातसा धरणातून अतिरिक्त ५० द.ल.लि. पाण्याची प्रतीक्षा आहे. सोसायट्यांंमध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर बसले. ठाणे शहराला ४८५ द.ल.लि. पाणीपुरवठा होत असून, तूर्त मागणी ५३० द.ल.लि.ची आहे. अर्थात, सध्या पुरवठा होत असलेल्या पाण्यातील तब्बल ४२ टक्के पाणीचोरी, गळती यामध्ये वाया जाते.

कल्याण-डोंबिवलीतही...    कल्याण- डोंबिवलीतही वेगळे चित्र नाही. आतापर्यंत महापालिका हद्दीत असलेल्या २७ गावांच्या परिसरात भीषण टंचाई आहे.     भोपर, संदप, दावडी, सोनारपाडा आदी भागांत लोकांना पुरेसा पाणीपुरवठा वर्षभर होत नाही. या दोन्ही शहरांत मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली. त्यांना पाणी दिले जात असल्याने ग्रामीण भागात पाणीपुरवठा कमी झाल्याची ओरड होते.     २७ गावांतील पाण्याची थकबाकी वर्षानुवर्षे तशीच आहे. या भागात ३० द.ल.लि. पाणी दिले जाते. ५५ द.ल.लि. पाण्याची मागणी आहे.    सध्या या दोन्ही शहरांना ३८० द.ल.लि. पाणीपुरवठा केला जातो. या शहरांची मागणी ४२३ द.ल.लि.ची आहे. अनधिकृत बांधकामांची पाणीचोरी व गळती यामुळे २१ टक्के पाणी वाया जाते.

टॅग्स :thaneठाणे