शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

दिल्या-घेतल्या पाण्याचा हिशेब नसल्याने ठणठणाट

By संदीप प्रधान | Updated: November 7, 2022 06:43 IST

मुंबईतील दीड कोटीहून अधिक लोकसंख्येची तहान ठाणे जिल्हा भागवतो.

मुंबई शहराची तहान भागवणारी धरणे ठाणे जिल्ह्यात आहेत. यंदा पाऊसही मुबलक झाला आहे; परंतु जिल्ह्यातील सर्वच शहरांमधील काही भागांत भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. अनधिकृत बांधकामांना दिले जाणारे बेकायदा कनेक्शन, टँकर माफियांकडून होणारी पाणीचोरी आणि दिल्या- घेतल्या पाण्याचा हिशेब ठेवणारी यंत्रणाच अस्तित्वात नसणे, यामुळे जिल्ह्यातील शहरे तहानलेली आहेत.

मुंबईतील दीड कोटीहून अधिक लोकसंख्येची तहान ठाणे जिल्हा भागवतो. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरात आहेत; परंतु शहापूर व मुरबाड या ग्रामीण भागातील १६७ गावपाड्यांत टँकरने पाणीपुरवठा केला जातो. ग्रामीण भागात ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ हे चित्र आहे. याखेरीज ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, उल्हासनगर, मीरारोड- भाईंदर, अशा सर्वच शहरांत पाणीटंचाई जाणवते. ठाण्यातील घोडबंदर, कळवा, वागळे इस्टेट, दिवा या भागांतील अनेक टॉवर, चाळी, झोपडपट्ट्यांमध्ये वर्षभर पाणीटंचाई जाणवते. घोडबंदर रोड येथे मोठमोठे टॉवर उभे राहिले. तेथील फ्लॅटची ८० ते ९० लाखांना विक्री केली गेली; परंतु तेथे राहायला येणाऱ्यांना दररोज दोन ते तीन टँकर मागवावे लागतात. एका टँकरचे तीन ते सात हजार रुपये मोजावे लागतात. याचा अर्थ वर्षानुवर्षे येथील रहिवाशांना हा त्रास सहन करावा लागणार आहे. कोपरी परिसरात आता मुंबई महापालिकेने अतिरिक्त पाणीपुरवठा केल्याने परिस्थिती सुधारली. घोडबंदरच्या रहिवाशांना भातसा धरणातून अतिरिक्त ५० द.ल.लि. पाण्याची प्रतीक्षा आहे. सोसायट्यांंमध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर बसले. ठाणे शहराला ४८५ द.ल.लि. पाणीपुरवठा होत असून, तूर्त मागणी ५३० द.ल.लि.ची आहे. अर्थात, सध्या पुरवठा होत असलेल्या पाण्यातील तब्बल ४२ टक्के पाणीचोरी, गळती यामध्ये वाया जाते.

कल्याण-डोंबिवलीतही...    कल्याण- डोंबिवलीतही वेगळे चित्र नाही. आतापर्यंत महापालिका हद्दीत असलेल्या २७ गावांच्या परिसरात भीषण टंचाई आहे.     भोपर, संदप, दावडी, सोनारपाडा आदी भागांत लोकांना पुरेसा पाणीपुरवठा वर्षभर होत नाही. या दोन्ही शहरांत मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली. त्यांना पाणी दिले जात असल्याने ग्रामीण भागात पाणीपुरवठा कमी झाल्याची ओरड होते.     २७ गावांतील पाण्याची थकबाकी वर्षानुवर्षे तशीच आहे. या भागात ३० द.ल.लि. पाणी दिले जाते. ५५ द.ल.लि. पाण्याची मागणी आहे.    सध्या या दोन्ही शहरांना ३८० द.ल.लि. पाणीपुरवठा केला जातो. या शहरांची मागणी ४२३ द.ल.लि.ची आहे. अनधिकृत बांधकामांची पाणीचोरी व गळती यामुळे २१ टक्के पाणी वाया जाते.

टॅग्स :thaneठाणे