शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

लग्नानंतर वेडे ठरवण्याचे वाढते प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 06:44 IST

अनेकांच्या घटस्फोटासाठी कारण; कौटुंबिक न्यायालयातील निरीक्षण

- स्नेहा पावसकर ठाणे : विशेष विवाह नोंदणी कायदा १९५४ नुसारच्या विवाह नोंदणी फॉर्ममध्ये एका रकान्यात आपण वेडे नाहीत, हे जाहीरपणे कबूल करावे लागते व सध्या हाच वादविषय झाला आहे. वास्तवात कौटुंबिक न्यायालयात येणाऱ्या जोडप्यांपैकी अनेकांच्या घटस्फोटाचे कारण हा वेडेपणा ठरतो आहे.नोंदणी पद्धतीने विवाह करताना कायदेशीर प्रक्रिया म्हणून फॉर्मवरील विविध माहिती भरावी लागते. विशेष विवाह नोंदणी कायदा १९५४ प्रकरण-२ मध्ये काही शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. त्यात विवाह करण्यास आणि संततीला जन्म देण्यास अपात्र ठरेल, अशा प्रकारे त्याच्या मानसिकतेत बिघाड झालेला नाही ना किंवा त्याला वारंवार भ्रमिष्टाचे झटके येत नाहीत ना, हे जाहीर करण्याची तरतूद आहे. हा प्रकार अनेकांना तापदायक वाटत असून लग्नवेदीवर उभ्या असलेल्यांच्या सारासार विवेकबुद्धीवर शंका घेण्यालाच विरोध होत आहे. बौद्धिकतेवर शंका उपस्थित केल्यासारखा वाटतो आहे.ख्यातनाम विधिज्ञ जाई वैद्य म्हणतात की, सेल्फ अ‍ॅटेस्टेशन किंवा पासपोर्ट मिळण्याकरिता आपण जसे प्रतिज्ञापत्र देतो, तशी ही तरतूद आहे. या ठिकाणी आपण विवाहाचा निर्णय विचारपूर्वक घेतला असून विवाहानंतर निर्णय व जबाबदारी घेण्यास सक्षम असल्याची कबुली द्यायची आहे. मात्र, अशी कबुली दिल्यानंतर जर एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे आढळले, तर घटस्फोटाबरोबरच लग्न रद्द करण्याकरिता अर्ज करता येईल. मात्र, अशा अर्जाबरोबर त्या व्यक्तीसाठी त्याची जबाबदारी घेईल, असा ‘पालक’ नेमण्याचाही अर्ज करावा लागतो.विवाहावेळी आपल्या मानसिकतेबाबत असे जाहीरपणे लिहून देणे, ही बाब आश्चर्यकारक वाटत असली तरी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी येणाºया अनेक केसेसमध्ये एकमेकांवर वेडेपणाचे आरोप केले जातात. याचा आयक्यू कमी आहे, त्याचे वागणे वेड्यासारखे आहे, तो कधीकधी वेड्यासारखा बोलतो आणि आम्हाला हे आधी सांगितले नव्हते, असे आरोपप्रत्यारोप सर्रास केले जातात, असे ठाणे कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक माधवी देसाई यांनी सांगितले. काहींचा बुद्धयांक हा कमी असतो. परंतु, म्हणून त्यांना यावरून वेडे ठरवणे अयोग्य आहे. मात्र, काहींची मानसोपचारतज्ज्ञाकडे मुळातच तपासणी सुरू असते. समुपदेशनादरम्यान असे लक्षात आल्यास आम्हीही त्यांना ट्रीटमेंट घेण्यास सुचवतो, असेही त्या म्हणाल्या.विवाह कायद्यात तरतूद काहीही असली, तरी त्यासाठी भ्रमिष्टाचे झटके हा शब्दप्रयोग अयोग्य वाटतो. एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्याविषयी असे शब्द वापरणेच चुकीचे आहे. वेडा नसलेल्या व्यक्तीतही अशाने वेडेपणाची भावना निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत कौटुंबिक न्यायालयाच्या एका वकिलांनी व्यक्त केले.

टॅग्स :marriageलग्न