शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

'ई-पास’साठी कारणे दोनच; रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 23:23 IST

चार हजार ५६१ प्रवाशांना प्रवासाची मुभा : २३ हजार २७८ अर्ज नामंजूर

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य शासनाने वाढत्या कोरोना रुग्णांवर नियंत्रण आणण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत कडक लॉकडाऊन केला. या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासासाठी पोलिसांचा ई-पास आवश्यक केला आहे. अत्यावश्यक कारणांसाठी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना पोलिसांकडून हा ई-पास दिला जाणार असून आतापर्यंत १२ दिवसांमध्ये चार हजार ५६१ प्रवाशांनी हा पास घेतल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी दिली.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने अलीकडेच आंतरजिल्हा जाण्यासाठी निर्बंध आणले आहेत. २१ एप्रिल २०२१ रोजीच्या आदेशानुसार २३ एप्रिलपासून ई-पास सेवा सुरू केली आहे. त्यानुसार ४ मेपर्यंत संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात २७ हजार ९९६ अर्ज आले. यामध्ये ठाणे- दहा हजार ५५३, भिवंडी- एक हजार ४५०, कल्याण- नऊ हजार ९५३ आणि उल्हासनगर परिमंडळातील सहा हजार ४० अर्जांचा समावेश आहे. यात अनावश्यक २३ हजार २७८ अर्ज नामंजूर झाले. तर चार हजार ५६१ अर्ज मंजूर झाले. यामध्ये ठाणे- दोन हजार २१८, भिवंडी- २४६, कल्याण- एक हजार ३३० आणि उल्हासनगर परिमंडळातून ७६७ प्रवाशांना मुभा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ही कागदपत्रे हवीतऑनलाइन अर्ज करताना जर अंत्यसंस्कारासाठी जात असाल तर शक्य असल्यास मृत्यूचा दाखला किंवा इतर कागदपत्रे, विवाहसमारंभासाठी लग्नपत्रिका त्याचबरोबर रुग्णालयीन कारणासाठी आणि एखादी व्यक्ती गंभीर आजारी असल्यास तशी कागदपत्रे जवळ बाळगावी आणि ऑनलाइन अर्जामध्ये जोडावीत. ई-पास मंजूर झाल्यास त्याची सॉफ्ट कॉपी, स्वत:चे ओळखपत्र आणि आधार कार्ड आदी कागदपत्रेही जवळ बाळगावीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ई-पाससाठी असा करावा अर्ज nई-पाससाठी संबंधितांनी पोलिसांकडे ( https://covid19.mhpolice.in/) ऑनलाइन अर्ज केल्यानंतर अत्यावश्यक प्रवासासाठी खासगी व्यक्तींना या प्रवासाची अनुमती दिली जात आहे. nअर्ज केल्यानंतर संबंधितांना अर्जावर टोकन क्रमांक दिला जातो. त्यानंतर पोलीस उपायुक्त किंवा अधीक्षक यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर हा अर्ज मंजूर केला जातो. यात कारण अयोग्य असल्यास तो नामंजूर केला जातो, अशी माहिती शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.

अवघ्या २४ तासांमध्ये मिळते ई-पासला मंजुरी बाहेरील जिल्ह्यात जाण्यासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित पोलीस अधीक्षक यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर साधारण २४ तासांमध्ये अर्ज मंजूर केला जातो. यामध्ये अत्यावश्यक सेवा तसेच शासकीय सेवा त्याचबरोबर वैद्यकीय सेवांशी संबंधितांना त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे प्रवास करता येतो. जर बाहेर जिल्ह्यात जायचे असेल तर त्यांनाही अशा ई-पासची गरज लागणार आहे.

कारणे तीच ई-पाससाठी जवळच्या किंवा लांबच्या नातेवाइकाचा अथवा ओळखीच्या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण दिले जाते. त्याचबरोबर विवाह समारंभ, वैद्यकीय सेवा, रुग्णालय आणि मजुरांच्या स्थलांतरासाठीची कारणे किंवा नळ दुरुस्ती तसेच इलेक्ट्रिक कामासाठीही बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी मागितली जाते.

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस