शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

'ई-पास’साठी कारणे दोनच; रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 23:23 IST

चार हजार ५६१ प्रवाशांना प्रवासाची मुभा : २३ हजार २७८ अर्ज नामंजूर

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य शासनाने वाढत्या कोरोना रुग्णांवर नियंत्रण आणण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत कडक लॉकडाऊन केला. या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासासाठी पोलिसांचा ई-पास आवश्यक केला आहे. अत्यावश्यक कारणांसाठी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना पोलिसांकडून हा ई-पास दिला जाणार असून आतापर्यंत १२ दिवसांमध्ये चार हजार ५६१ प्रवाशांनी हा पास घेतल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी दिली.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने अलीकडेच आंतरजिल्हा जाण्यासाठी निर्बंध आणले आहेत. २१ एप्रिल २०२१ रोजीच्या आदेशानुसार २३ एप्रिलपासून ई-पास सेवा सुरू केली आहे. त्यानुसार ४ मेपर्यंत संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात २७ हजार ९९६ अर्ज आले. यामध्ये ठाणे- दहा हजार ५५३, भिवंडी- एक हजार ४५०, कल्याण- नऊ हजार ९५३ आणि उल्हासनगर परिमंडळातील सहा हजार ४० अर्जांचा समावेश आहे. यात अनावश्यक २३ हजार २७८ अर्ज नामंजूर झाले. तर चार हजार ५६१ अर्ज मंजूर झाले. यामध्ये ठाणे- दोन हजार २१८, भिवंडी- २४६, कल्याण- एक हजार ३३० आणि उल्हासनगर परिमंडळातून ७६७ प्रवाशांना मुभा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ही कागदपत्रे हवीतऑनलाइन अर्ज करताना जर अंत्यसंस्कारासाठी जात असाल तर शक्य असल्यास मृत्यूचा दाखला किंवा इतर कागदपत्रे, विवाहसमारंभासाठी लग्नपत्रिका त्याचबरोबर रुग्णालयीन कारणासाठी आणि एखादी व्यक्ती गंभीर आजारी असल्यास तशी कागदपत्रे जवळ बाळगावी आणि ऑनलाइन अर्जामध्ये जोडावीत. ई-पास मंजूर झाल्यास त्याची सॉफ्ट कॉपी, स्वत:चे ओळखपत्र आणि आधार कार्ड आदी कागदपत्रेही जवळ बाळगावीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ई-पाससाठी असा करावा अर्ज nई-पाससाठी संबंधितांनी पोलिसांकडे ( https://covid19.mhpolice.in/) ऑनलाइन अर्ज केल्यानंतर अत्यावश्यक प्रवासासाठी खासगी व्यक्तींना या प्रवासाची अनुमती दिली जात आहे. nअर्ज केल्यानंतर संबंधितांना अर्जावर टोकन क्रमांक दिला जातो. त्यानंतर पोलीस उपायुक्त किंवा अधीक्षक यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर हा अर्ज मंजूर केला जातो. यात कारण अयोग्य असल्यास तो नामंजूर केला जातो, अशी माहिती शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.

अवघ्या २४ तासांमध्ये मिळते ई-पासला मंजुरी बाहेरील जिल्ह्यात जाण्यासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित पोलीस अधीक्षक यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर साधारण २४ तासांमध्ये अर्ज मंजूर केला जातो. यामध्ये अत्यावश्यक सेवा तसेच शासकीय सेवा त्याचबरोबर वैद्यकीय सेवांशी संबंधितांना त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे प्रवास करता येतो. जर बाहेर जिल्ह्यात जायचे असेल तर त्यांनाही अशा ई-पासची गरज लागणार आहे.

कारणे तीच ई-पाससाठी जवळच्या किंवा लांबच्या नातेवाइकाचा अथवा ओळखीच्या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण दिले जाते. त्याचबरोबर विवाह समारंभ, वैद्यकीय सेवा, रुग्णालय आणि मजुरांच्या स्थलांतरासाठीची कारणे किंवा नळ दुरुस्ती तसेच इलेक्ट्रिक कामासाठीही बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी मागितली जाते.

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस