शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

वर्षभरात साडेसात कोटींचा मुद्देमाल परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 03:11 IST

पोलीस-जनता संबंध अधिक दृढ होणार : ६८ फिर्यादींना मिळाला चोरीतील ५४ लाख ९६ हजारांचा ऐवज

ठाणे : गेल्या संपूर्ण वर्षभरात ६१६ तक्रारदारांना त्यांचा जबरी चोरी तसेच इतर गुन्ह्यांतील सात कोटी ५० लाख सात हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अभिहस्तांतरित केला. तर, सोमवारी ६८ फिर्यादींना ५६ लाख १२ हजारांचा ऐवज परत केला. अशा प्रकारे मुद्देमाल हस्तांतरणाच्या माध्यमातून पोलिसांवरील जनतेचा विश्वास वाढणार असून या दोघांचेही संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी व्यक्त केला.

ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-१ च्या वतीने जबरी चोरी, चोरी तसेच वाहनचोरीतील गुन्हे उघड केल्यानंतर आरोपींकडून हस्तगत केलेला मुद्देमाल ६८ जणांना सोमवारी स्वामी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्टÑ पोलीस दलाच्या स्थापना दिवसानिमित्त २ जानेवारीपासून पोलिसांच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत उपायुक्त कार्यालयाच्या आवारात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात नौपाडा, ठाणेनगर, कळवा, मुंब्रा, डायघर आदी पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातून लुटीस गेलेल्या ऐवजाचे उत्कृष्टरीत्या अन्वेषण करून हे गुन्हे उघड केले. वर्षभरात सोनसाखळी जबरी चोरी तसेच इतर गुन्ह्यांमधील चार हजार ६३६ ग्रॅम (चार किलो ६२६ ग्रॅम) वजनाचे एक कोटी ५२ लाख ९२ हजार ६२८ किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. तसेच १०९ दुचाकी, २८ तीनचाकी, ५५ चारचाकी वाहने असा तीन कोटी ८२ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत झाला. याशिवाय, एक कोटी तीन लाख ६८ हजार ७०० रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि ८६ व्यक्तींची एक कोटी १० लाख ५६ हजार ६८२ ची रोकड जप्त केली. असा २०१८ या संपूर्ण वर्षभरात सात कोटी ५० लाख सात हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. न्यायालयाच्या आदेशाने ९१ लाख ७९ हजारांचे तीन किलो ७५० ग्रॅम सोन्याचे दागिने परत केले. तर ७५ दुचाकी, २७ तीनचाकी, ३४ चारचाकी वाहनांसह मोबाइल, लॅपटॉप आणि २९ तक्रारदारांची ९५ लाख ४८ हजार ८३७ रुपयांची रोकड असा पाच कोटी चार लाख ७४३ रुपयांचा मुद्देमाल संबंधितांना परत केला. याव्यतिरिक्त रेझिंग डे च्या अनुषंगाने ७ जानेवारी रोजी सोनसाखळी जबरी चोरीसह विविध गुन्ह्यांतील २१ लाख ८७ हजार ८०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच १४ दुचाकी, दोन तीनचाकी, पाच चारचाकी अशी २१ लाख ५५ हजार ७४२ हजारांच्या वाहनांसह ५४ लाख ९६ हजार ७७० किमतीचा मुद्देमाल ६८ फिर्यादींना स्वामी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.पोलीस जनतेसाठी असून चोरीतील ऐवज पुन्हा मिळवून दिल्यास जनतेमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण होतो. जनता-पोलीस दुरावा दूर झाला पाहिजे. तेव्हा गुन्हेगारांवर नक्कीच वचक राहील. नागरिक हे साध्या वेशातील पोलीस असून अशा उपक्रमांद्वारे पोलीस-जनता संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास स्वामी यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ, अभय सायगावकर तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, संजय धुमाळ, रविकांत मालेकर, शेखर बागडे, मंगेश सावंत आणि तुकाराम पोवळे आदींसह फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.माझी १४ ग्रॅम वजनाची सोनसाखळी १९ आॅगस्ट २०१८ रोजी सिद्धी टॉवर येथून चोरट्यांनी जबरीने चोरली होती. याबाबत तक्रार केल्यानंतर नौपाडा पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मेहनतीने चोरट्यांकडून १० ग्रॅमचे सोने हस्तगत केले. ते आज परत मिळाले. खूप आनंद झाला. तो शब्दांतही व्यक्त करता येत नाही.’’- शरयू फणसे (८०),फिर्यादी, नौपाडा, ठाणेआईची सोनसाखळी गेली तेव्हापासून आजपर्यंत कोणताही पाठपुरावा करावा लागला नाही. थेट सोनसाखळी चोरट्यांकडून मिळवल्याचे पोलिसांकडून समजले. त्यानुसार, त्यांनी हस्तांतरण कार्यक्रमात सोने परत केले. पोलिसांचे खूप आभारी आहोत.’’- डॉ. समीर फणसे, नौपाडा, ठाणे (फिर्यादी शरयू यांचे चिरंजीव)

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका