शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

...तेव्हा अमराठी विकासकांची रांग का होती?, आशिष शेलारांचा जितेंद्र आव्हाडांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 17:24 IST

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही. मात्र सत्तेत कॉंग्रेस बरोबर आल्यानंतर स्वातंत्रवीर सावरकर यांचा अपमान केला.

ठाणे : 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही. मात्र सत्तेत कॉंग्रेस बरोबर आल्यानंतर स्वातंत्रवीर सावरकर यांचा अपमान केला. त्यावेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे कोणाला सलाम करत होते. असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे मंत्री असतांना त्यांनी किती मराठी विकासक त्यांच्या कार्यालयात होते. शिवाय उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिकेत किती मराठी कंत्नाटदारांना काम दिले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबई आणि महाराष्ट्र मराठी माणसाच्या कष्टाने घामाने, हौत्याम्याने, देशात मुंबई आर्थिक राजधानी झालेली आहे. त्यामुळे कोणीही व्यक्तीने कुठल्याही पदावर बसून मराठी माणूस, संस्कृती, भाषा याला नखही लावण्यास त्याचा विपर्यास होईल अशी स्थिती आणू नये असे आमचे स्पष्ट मत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सुप्रिया सुळे यांनी जास्तीचा अभ्यास केला तर त्यांचे मत स्पष्ट होईल. राज्यपालाच्या वक्तव्यांची आम्ही असमहती दर्शवितो पण, जेव्हा तुम्ही कॉंग्रेस बरोबर होतोत, आणि तुमचे सरकार होते, त्यावेळेस कुठल्या राज्यपालाने अर्थसंकल्प मराठीत वाचून दाखविला असा सवाल त्यांनी सुप्रिया सुळे यांना केला.  कोश्यारी सोडून कोणत्याही राज्यपालांनी अर्थसकंल्प मराठीत वाचून दाखविलेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आमच्या छत्रपतींच्या किल्यांवर पायी वर र्पयत जाऊन नतमस्थक होण्याचे काम कोश्यारी सोडून कोणत्या राज्यपालाने केले याचेही उत्तर द्यावे असे त्यांनी सांगितले. केवळ एका वक्तव्यावर लगेच राजकीय पोळी भाजण्याची टीवटीव तुम्ही करु नका असेही त्यांनी सांगितले. कोल्हापुरी चप्पल आणि जोडे मारो आंदोलनाची एवढीच खुमखुमी असेल तर सावरकरांचा अपमान केल्यावर त्या मनीशंकरला जोडे मारण्याचा कार्यक्रम बाळासाहेबांनी केला, कॉंग्रेस बरोबर महाविकास आघाडीत आल्यावर कॉंग्रेसने जी अभद्र भाषा वापरली, त्यानंतर तुमच्या हातात ते जोडे का नाही आले असा सवाल त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना केला. जोडे मारायचेच असतील आणि माफीची मागणीच करायची असतील तर बरेच विषय समोर येतील आणि शिवसेनेची पळता भुई थोडी होईल असा टोलाही त्यांनी लगावला. 

आव्हाडांनी केलेल्या टिकेलाही त्यांनी प्रतिउत्तर यावेळी दिले. आव्हाड आणि मराठी माणसाच्या हिताचा संबध काय? असा थेट सवाल त्यांनी केला. गृहनिर्माणमंत्री असतांना त्यांच्या दालनात अमराठी विकासकांची रांग का होती?, त्यावेळेस त्यांच्या बंगल्या समोर ज्या चपला आणि जोडे होते, त्या मराठी विकसकांचे होते की, अमराठी विकासकांचे होते असा सवालही त्यांनी केला. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार आहे, परंतु शब्दाच्या मर्यादा या प्रत्येकालाच पाळाव्या लागतील, त्यामुळे अशा प्रकारचा शब्द आव्हाड वापरत असतील तर ते मर्यादेचे आत आहे की बाहेर हे जनतेला कळेल, असे त्यांनी सांगितले. माफीचा उद्योग करायचा असेल तर ब:याच माफ्या मागाव्या लागतील, तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतांना कोणत्या विकासकाला थंड हवेचे ठिकाण विकसित करायला दिले होते त्यांची माफी मागणार का?, मुंबई महापालिकेत २५ वर्षात एकाही मराठी कंत्रटदाराला येऊ दिले नाही, याचे उत्तर शिवसेनेला द्यावे लागेल. असेही त्यांनी शेवटी सांगितले.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारJitendra Awhadजितेंद्र आव्हाड