शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

...तेव्हा अमराठी विकासकांची रांग का होती?, आशिष शेलारांचा जितेंद्र आव्हाडांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 17:24 IST

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही. मात्र सत्तेत कॉंग्रेस बरोबर आल्यानंतर स्वातंत्रवीर सावरकर यांचा अपमान केला.

ठाणे : 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही. मात्र सत्तेत कॉंग्रेस बरोबर आल्यानंतर स्वातंत्रवीर सावरकर यांचा अपमान केला. त्यावेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे कोणाला सलाम करत होते. असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे मंत्री असतांना त्यांनी किती मराठी विकासक त्यांच्या कार्यालयात होते. शिवाय उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिकेत किती मराठी कंत्नाटदारांना काम दिले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबई आणि महाराष्ट्र मराठी माणसाच्या कष्टाने घामाने, हौत्याम्याने, देशात मुंबई आर्थिक राजधानी झालेली आहे. त्यामुळे कोणीही व्यक्तीने कुठल्याही पदावर बसून मराठी माणूस, संस्कृती, भाषा याला नखही लावण्यास त्याचा विपर्यास होईल अशी स्थिती आणू नये असे आमचे स्पष्ट मत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सुप्रिया सुळे यांनी जास्तीचा अभ्यास केला तर त्यांचे मत स्पष्ट होईल. राज्यपालाच्या वक्तव्यांची आम्ही असमहती दर्शवितो पण, जेव्हा तुम्ही कॉंग्रेस बरोबर होतोत, आणि तुमचे सरकार होते, त्यावेळेस कुठल्या राज्यपालाने अर्थसंकल्प मराठीत वाचून दाखविला असा सवाल त्यांनी सुप्रिया सुळे यांना केला.  कोश्यारी सोडून कोणत्याही राज्यपालांनी अर्थसकंल्प मराठीत वाचून दाखविलेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आमच्या छत्रपतींच्या किल्यांवर पायी वर र्पयत जाऊन नतमस्थक होण्याचे काम कोश्यारी सोडून कोणत्या राज्यपालाने केले याचेही उत्तर द्यावे असे त्यांनी सांगितले. केवळ एका वक्तव्यावर लगेच राजकीय पोळी भाजण्याची टीवटीव तुम्ही करु नका असेही त्यांनी सांगितले. कोल्हापुरी चप्पल आणि जोडे मारो आंदोलनाची एवढीच खुमखुमी असेल तर सावरकरांचा अपमान केल्यावर त्या मनीशंकरला जोडे मारण्याचा कार्यक्रम बाळासाहेबांनी केला, कॉंग्रेस बरोबर महाविकास आघाडीत आल्यावर कॉंग्रेसने जी अभद्र भाषा वापरली, त्यानंतर तुमच्या हातात ते जोडे का नाही आले असा सवाल त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना केला. जोडे मारायचेच असतील आणि माफीची मागणीच करायची असतील तर बरेच विषय समोर येतील आणि शिवसेनेची पळता भुई थोडी होईल असा टोलाही त्यांनी लगावला. 

आव्हाडांनी केलेल्या टिकेलाही त्यांनी प्रतिउत्तर यावेळी दिले. आव्हाड आणि मराठी माणसाच्या हिताचा संबध काय? असा थेट सवाल त्यांनी केला. गृहनिर्माणमंत्री असतांना त्यांच्या दालनात अमराठी विकासकांची रांग का होती?, त्यावेळेस त्यांच्या बंगल्या समोर ज्या चपला आणि जोडे होते, त्या मराठी विकसकांचे होते की, अमराठी विकासकांचे होते असा सवालही त्यांनी केला. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार आहे, परंतु शब्दाच्या मर्यादा या प्रत्येकालाच पाळाव्या लागतील, त्यामुळे अशा प्रकारचा शब्द आव्हाड वापरत असतील तर ते मर्यादेचे आत आहे की बाहेर हे जनतेला कळेल, असे त्यांनी सांगितले. माफीचा उद्योग करायचा असेल तर ब:याच माफ्या मागाव्या लागतील, तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतांना कोणत्या विकासकाला थंड हवेचे ठिकाण विकसित करायला दिले होते त्यांची माफी मागणार का?, मुंबई महापालिकेत २५ वर्षात एकाही मराठी कंत्रटदाराला येऊ दिले नाही, याचे उत्तर शिवसेनेला द्यावे लागेल. असेही त्यांनी शेवटी सांगितले.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारJitendra Awhadजितेंद्र आव्हाड