शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

...तर कागज नही दिखाएंगे सत्याग्रहाचा युवकांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 1:02 AM

ठाण्यात रंगला युवा टॉक शो

ठाणे : भारतीय संविधानाने राणीच्या पोटातून जन्म घेणाऱ्या राजाची राजेशाही व संस्थानिकांची मनमानी संपवून देशातील जनतेला समान हक्क देऊन विषमतेतून मुक्तीची वाट दाखवली आहे. त्यामुळे संविधानातील लोकशाही, स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांच्या रक्षणासाठी, युवा रस्त्यावर उतरले आहेत. न्यायालयाने न्याय दिला तर ठीकच, नाहीतर महात्मा गांधींच्या शिकवणुकीनुसार, नागरिकता दुरु स्ती कायदा हा धर्माधारित भेदभाव करणारा आणि संविधानाच्या आत्म्याशी फारकत घेणारा असल्याने, त्या विरु द्ध ‘कागज नहीं दिखाएंगे’ हा सत्याग्रहही युवक करतील, असा इशारा युवा टॉक शो मध्ये युवकांनी दिला.

महात्मा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त संविधान, नागरिकता व युवकांचे हक्क या विषयावर समता विचार प्रसारक संस्था आणि म्यूज फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ होते. यावेळी चर्चेत युवक म्हणाले की, देशातील नागरिकांकडून पुरावे मागणे हे गोरगरीब, प्रकल्पग्रस्त, आदिवासी आदींसाठी जिकिरीचे ठरू शकते. केवळ राष्ट्रध्वजाचा किंवा राष्ट्रगीताचा मान म्हणजे भारतीयत्व नाही, तर आपापल्या जबाबदाºया नेकीने पार पडणे, भ्रष्टाचार, अन्याय न करणे हे खरे भारतीयत्व आहे. नागरिकता कायदा दुरुस्ती प्रस्ताव मंजूर करताना, त्यावर संसदेत व संसदेबाहेर साधकबाधक चर्चा होणे अत्यावश्यक होते.

विद्यमान सरकारने रोजगाराचा हक्क डावलला

युवकांचे चांगले शिक्षण घेण्याचा, शिक्षण पूर्ण झाल्यावर रोजगार मिळवण्याचा हक्क विद्यमान सरकारने डावलला असून त्याविरु द्ध युवक आंदोलन करत आहेत. देशातील वाढती महागाई, सार्वजनिक उद्योग सावरणे, विकासाचा दर सुस्थितीत राखणे हे सरकारला जमत नसल्यामुळे नागरिकता कायदा दुरु स्ती आणि त्यापाठोपाठ येऊ घातलेले नागरिक नोंदणी आणि जनसंख्या नोंदणी हेही अनावश्यक असल्याचे मत आसामच्या विशिष्ट परिस्थितीचा दाखल देऊन या युवकांनी मांडले. प्रथमेश्वर उंबरे, कपिल खंडागळे, जुही शहा, रिंकल भोईर, यश माडगावकर, सोनू गुप्ता, सर्वेश अकोलकर आणि नीरज आठवले या विद्यार्थी- युवकांनी टॉक शोमध्ये आपली मते मांडली.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र