शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

...तर नेवाळीची पुनरावृत्ती घडेल, संतोष केणे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 1:20 AM

आयरेगाव परिसरातील जमीनमालक आणि रहिवासी यांच्यामध्ये द्वेष निर्माण करून काही व्यक्ती शांतता आणि कायदा-सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत.

डोंबिवली : आयरेगाव परिसरातील जमीनमालक आणि रहिवासी यांच्यामध्ये द्वेष निर्माण करून काही व्यक्ती शांतता आणि कायदा-सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक पोलीसही त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी भूमिपुत्रांना त्रास देत आहे. आगरी समाजाने संयम सुटल्यास नेवाळीची पुनरावृत्ती घडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी नगरसेवक तथा आयरेगाव भूमिपुत्र जनहित संस्थेचे सल्लागार संतोष केणे यांनी दिला.डोंबिवलीतील आगरी समाज सभागृहात रविवारी आगरी-कोळी भूमिपुत्रांसह घरमालक व रहिवाशांची विशेष सभा झाली. यावेळी केणे बोलत होते. मंचावर विलास म्हात्रे, गिरीश साळगावकर, गजानन पाटील, मोतीराम गोंधळी, विकास देसले, काळू कोमास्कर, गोविंद भगत, गणेश म्हात्रे, अ‍ॅड. भारद्वाज चौधरी, नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, माजी नगरसेविका सुशीला केणे आदी मान्यवर उपस्थित होते.आयरेगाव येथील इमारतींमधील रहिवाशांकडून पैसे उकळणे आणि इमारतमालकांना मानसिक त्रास देऊन रहिवासी आणि मालक यांच्यात वाद निर्माण करण्याचे कारस्थान काही मंडळी करत असल्याचा आरोप भूमिपुत्र जनहित संस्थेने केला आहे. त्रास देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी, याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.केणे पुढे म्हणाले की, मालक आणि रहिवासी ४० वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहत आहेत. पण, काही विघ्नसंतोषी मालक आणि रहिवाशांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून समाजकंटकांकडून मतांचे राजकारण सुरू आहे. धोकादायक इमारती, चाळींच्या पुनर्वसनासाठी क्लस्टर व म्हाडाच्या धर्तीवर गृहनिर्माण योजनेसारख्या अनेक वादग्रस्त मागण्या करून येथील आगरी-कोळी स्थानिक भूमिपुत्रांचे हक्क हिरावून घेण्याचा डाव रचला जात आहे. पोलिसांकडे याबाबत निवेदन देऊनही ते शांत आहेत, उलट भूमिपुत्रांना नोटिसा दिल्या जात आहेत, हे चुकीचे आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अशा शब्दांत केणे यांनी आपले मत व्यक्त केले.लोकभावना भडकावणे, त्यांची मने कलुषित करणे आणि जेणेकरून आपापसात भांडणे होतील, यासाठी हे सर्व सुरू आहे. इथले रहिवासी आणि मालक यांच्यात कुठलाही वाद नाही. भविष्यातही आम्ही एकत्रच राहणार, विकास दोघांचाही होणार, याची आम्ही ग्वाही देतो, असे अ‍ॅड. भारद्वाज चौधरी यांनी सांगितले. रहिवासी व मालक या नाण्याच्या दोन बाजू आहेत. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काही जण राजकीय षड्यंत्र रचले गेले, तरी ते यशस्वी होणार नाही, असे गणेश म्हात्रे म्हणाले. तर, मालकाची भूमिका ही सामोपचाराची राहिलेली असून भाडेकरूंचे हक्क अबाधित ठेवून आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत काळू कोमास्कर यांनी मांडले.>शाश्वत विकास हवाक्लस्टर म्हणजे समूह विकास, पण क्लस्टर या चांगल्या शब्दाचा वापर करून वाईट व्यवस्था राबवली जात आहे. त्याला आमचा विरोध आहे. समूह विकास हा माणसांनी माणसांसाठी केलेला विकास असतो. त्यात माणसांना योगदान देता आले नाही, तर त्याचा फायदा नाही. भूमिपुत्र सुशिक्षित आहे. त्याला शाश्वत विकास कळतो, त्यामुळे आपल्याबरोबर राहणाºया भाडेकरूला माणूस हा दर्जा देऊन त्याचा विकास कसा करता येईल, याचा तो विचार करतो, असे गिरीश साळगावकर म्हणाले.