शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

"वंचितांचा रंगमंच हे समाजाचे व कलाविश्वाचे वैभव " - ज्येष्ठ नाट्यकर्मी जयंत सावरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 4:33 PM

ठाण्यात वंचितांचे रंगमंचचे सहावे पर्व पार पडले. 

ठळक मुद्दे"वंचितांचा रंगमंच हे समाजाचे व कलाविश्वाचे वैभव " - जयंत सावरकरवंचितांचे रंगमंचचे सहावे पर्व समता विचार प्रसारक संस्था, व बालनाट्य पुरस्कृत वंचितांचा रंगमंच

ठाणे : वंचित समुहांना आपल्या भावना, समस्या व समज, आपल्या भाषेत व शैलीत व्यक्त करण्याची संधी देणारा वंचितांचा रंगमंच हे आपल्या समाजाचे व कला विश्वाचे वैभव आहे. असे मत ज्येष्ठ नाट्यकर्मी जयंत सावरकर यांनी व्यक्त केले.  समता विचार प्रसारक संस्था, व बालनाट्य पुरस्कृत वंचितांचा रंगमंचच्या माध्यमातून आयोजित " युवा नाट्यजल्लोष "च्या सहाव्या पर्वात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.

       त्या अभिव्यक्तीचा लाभ सर्वसामान्य जनतेस मुक्त हस्ते व मोफत उपलब्ध करून देणारी समता विचार प्रसारक व बालनाट्य संस्था फार मोलाचे कार्य करीत असून, त्यात सर्वांनी सामील व्हायला हवे.असे नमुद करत ते पुढे म्हणाले, माझेही यंदा इथे येणे हे पहिले असले तरी शेवटचे असणार नाही.यावेळी युवा नाट्य जल्लोष मध्ये पाच नाटिका सादर करण्यात आल्या : मैट्रो आणि वृक्षकत्तल या विषयावर आधारित 'गोष्ट जीवाची ' (किशननगर गट), 'दृष्टीकोन' (सावरकर नगर गट), 'एचआयव्ही- एड्स' (ठाणे शहर गट), महिला सक्षमता आणि निर्भयता या विषयांवर 'निर्भय मी- सक्षम मी' (मानपाडा गट), 'हम सब' (माजिवडा गट). या नाटिकांबद्दल बोलतांना ज्येष्ठ कवि अरूण म्हात्रे म्हणाले, वंचितांचा रंगमंच हा साधा सहज आणि सर्वाना सामावून घेणारा मंच आहे. "अनेक वर्षे निरपेक्ष पणे संतांच्या लोकवस्तीत शैक्षणिक- सांस्कृतिक कार्य करणारा वंचितांचा रंगमंच हे ठाण्याचे भुषण आहे. ठाणे महापालिका या चळवळीला भरघोस सहकार्य करेल. असे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के या प्रसंगी बोलतांना म्हणाले. शहरभर दिवसभर अनेक कार्यक्रमांची रेलचेल असतांनाही मा. महापौर या वेळी आवर्जून उपस्थित राहिले होते. लघुपट निर्माते प्रा. संतोष पाठारे म्हणाले, " वंचिताचा रंगमंच हा केवळ ठाण्यातील वस्तीत राहणाऱ्या मुलांच्या कलागुणांना वाव देणार व्यासपीठ न राहता समाजापर्यंत आपले विचार पोहचवणारी चळवळ झाला आहे.रत्नाकर मतकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या वंचितांच्या रंगमंचावर गेली सहा वर्षे मुलांच्या नाटिका बघण्याच्या निमित्ताने समविचारी माणसं एकत्र येतात, विचार मंथन होते हे खूप महत्त्वाचे आहे. या वेळी वैदेही भिडे (मनो विकास संस्था - IPH) माधुरी वारियत (जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय) यानी ही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या संयोजिका हर्षदा बोरकर यांनी सूत्र संचालन केले. दिपक वाडेकरने पाहुण्यांची ओळख करून दिली. सह संयोजक अनुजा लोहारने आभार प्रदर्शन केले. या वेळी कार्यक्रमात डॉ. निर्मोही फडके, नीलिमा सबनीस, शैलेश भिडे, हर्षल सुतार, शिवाजी पवार, जगदीश खैरालिया, उमाकांत पावसकर आदी मान्यवर उपस्थित होते. ठाणे आर्ट गिल्ड चे योगेश खांडेकर आणि सुनिता फडके व समता विचार प्रसारक संस्थेचे लतिका सु. मो., हर्षलता कदम, मनिषा जोशी, सुनील दिवेकर, कल्पना भांडारकर, विश्वनाथ चांदोरकर, प्रवीण खैरालिया, हेमाली शिंदे, निखिल दंत, आतेश शिंदे, इनाॅक कोलियार, ओंकार जंगम, दर्शन पडवळ, गौतमी सिन्गारे, स्नेहा राठोड, पल्लवी कदम आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.  

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक