शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

कोरोनाने कुंकू हिरावले; सरकारनेही वाऱ्यावर सोडले, ठाण्यातील उदरनिर्वाहाची समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 15:30 IST

- सुरेश लोखंडे ठाणे : कोरोनामध्ये पती गमावलेल्या या महिलांना न्याय देण्यासाठी महिला बाल विकासमंत्र्यांनी ‘मिशन वात्सल्य’ योजनाही सुरू ...

- सुरेश लोखंडे

ठाणे : कोरोनामध्ये पती गमावलेल्या या महिलांना न्याय देण्यासाठी महिला बाल विकासमंत्र्यांनी ‘मिशन वात्सल्य’ योजनाही सुरू केली आहे. तहसीलदार अध्यक्ष असलेल्या या मिशनची प्रत्येक आठवड्यात एक बैठक होणे अपेक्षित आहे. परंतु, गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत सात तालुक्यांत जास्तीत जास्त चार आणि कमीत-कमी केवळ दोन बैठका तहसीलदारांनी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाने कुंकू हिरावले आणि शासनानेही वाऱ्यावर सोडल्याची चर्चा या परिवारांमध्ये ऐकायला मिळत आहे.

कोरोना महामारीत घरातील कर्ता व कुटुंबप्रमुख दगावल्यामुळे जिल्ह्यातील ९४५ महिला विधवा झाल्या आहेत. त्यांना उदरनिर्वाहासाठी दरमहा एक हजार रुपये प्रारंभी म्हणजे ऑगस्टपासून सुरू केले आहेत. पण आताही २०० ते २२५ महिलांना दरमहा पेन्शन सुरू असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. कोरोना महामारीत आतापर्यंत जिल्ह्यात घरातील कमावते व कुटुंबप्रमुख असलेले ९४५ जण दगावले आहेत. त्यांच्या विधवा पत्नींना आता उदरनिर्वाहाची समस्या भेडसावत आहे. सध्या या महिलांपैकी ८५० महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यापैकी आतापर्यंत १५७ महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत; तर १८ महिलांचे अर्ज नामंजूर झाले. याशिवाय १२९ अर्ज अपात्र ठरले असून, ३३१ अर्जांवर कारवाई सुरू आहे.

जिल्ह्यातील ९४५ विधवा महिलांची तालुकानिहाय माहिती प्रारंभी कोकण विभागीय आयुक्तांकडे पाठविलेली आहे. यासाठी तहसीलदारांना या विधवा महिलांची यादी दिली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून महिलांना रेशनकार्ड काढून दिले जात आहे. महिलांची कागदपत्रे संकलित करून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात कृती दलाचे पदाधिकारी कार्यरत केले आहेत. या योजनेसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांचा प्रस्ताव तयार करून तहसील कार्यालयात कृती दलाकडून जमा केला जात आहे. याशिवाय आता तहसीलदार अध्यक्ष असलेले ‘मिशन वात्सल्य’ सुरू केलेले आहे. सात महिन्यांत अवघ्या चार ते दोन बैठका या तालुक्यातील घेतल्या आहेत. यामध्ये ठाणे, कल्याण, मुरबाड, भिवंडी या तालुक्यांमध्ये प्रत्येकी चार बैठका झाल्या आहेत; तर उल्हासनगर, अंबरनाथला प्रत्येकी तीन आणि शहापूरला फक्त दोन बैठका या मिशनच्या झाल्या आहेत.

१) सात महिन्यांत कोणत्या तालुक्यात किती बैठका?

तालुका - बैठका

१) कल्याण- ०४

२) मुरबाड- ०४

३) शहापूर- ०२

४) ठाणे- ०४

५) भिवंडी- ०४

६) अंबरनाथ- ०३

७) उल्हासनगर- ०३

१) शहापूर तालुका सर्वात मागे -

- या ‘मिशन वात्सल्य’चे अध्यक्ष असलेल्या शहापूरच्या तहसीलदारांनी सात महिन्यांत अवघ्या दोन बैठका घेतल्याचे वास्तव महिला बालविकास विभागाच्या अहवालावरून उघडकीस आले आहे. त्यामुळे या तालुक्यात आतापर्यंत सर्वात कमी बैठका घेऊन या महिलांच्या लाभांविषयी आढावा घेतल्याचे दिसून येत आहे.

२) ठाणे, कल्याण, भिवंडी, मुरबाड, सर्वाधिक बैठका -

या चार तालुक्यांनी प्रत्येकी चार बैठका घेऊन या ‘मिशन वात्सल्या’च्या कामाचा आढावा घेतला आहे. या मिशनकडून प्रत्येक आठवड्याला एक बैठक घेणे अपेक्षित आहे. पण त्यांनी आतापर्यंत केवळ चार बैठका घेतल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका