शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

कोरोनाने कुंकू हिरावले; सरकारनेही वाऱ्यावर सोडले, ठाण्यातील उदरनिर्वाहाची समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 15:30 IST

- सुरेश लोखंडे ठाणे : कोरोनामध्ये पती गमावलेल्या या महिलांना न्याय देण्यासाठी महिला बाल विकासमंत्र्यांनी ‘मिशन वात्सल्य’ योजनाही सुरू ...

- सुरेश लोखंडे

ठाणे : कोरोनामध्ये पती गमावलेल्या या महिलांना न्याय देण्यासाठी महिला बाल विकासमंत्र्यांनी ‘मिशन वात्सल्य’ योजनाही सुरू केली आहे. तहसीलदार अध्यक्ष असलेल्या या मिशनची प्रत्येक आठवड्यात एक बैठक होणे अपेक्षित आहे. परंतु, गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत सात तालुक्यांत जास्तीत जास्त चार आणि कमीत-कमी केवळ दोन बैठका तहसीलदारांनी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाने कुंकू हिरावले आणि शासनानेही वाऱ्यावर सोडल्याची चर्चा या परिवारांमध्ये ऐकायला मिळत आहे.

कोरोना महामारीत घरातील कर्ता व कुटुंबप्रमुख दगावल्यामुळे जिल्ह्यातील ९४५ महिला विधवा झाल्या आहेत. त्यांना उदरनिर्वाहासाठी दरमहा एक हजार रुपये प्रारंभी म्हणजे ऑगस्टपासून सुरू केले आहेत. पण आताही २०० ते २२५ महिलांना दरमहा पेन्शन सुरू असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. कोरोना महामारीत आतापर्यंत जिल्ह्यात घरातील कमावते व कुटुंबप्रमुख असलेले ९४५ जण दगावले आहेत. त्यांच्या विधवा पत्नींना आता उदरनिर्वाहाची समस्या भेडसावत आहे. सध्या या महिलांपैकी ८५० महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यापैकी आतापर्यंत १५७ महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत; तर १८ महिलांचे अर्ज नामंजूर झाले. याशिवाय १२९ अर्ज अपात्र ठरले असून, ३३१ अर्जांवर कारवाई सुरू आहे.

जिल्ह्यातील ९४५ विधवा महिलांची तालुकानिहाय माहिती प्रारंभी कोकण विभागीय आयुक्तांकडे पाठविलेली आहे. यासाठी तहसीलदारांना या विधवा महिलांची यादी दिली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून महिलांना रेशनकार्ड काढून दिले जात आहे. महिलांची कागदपत्रे संकलित करून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात कृती दलाचे पदाधिकारी कार्यरत केले आहेत. या योजनेसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांचा प्रस्ताव तयार करून तहसील कार्यालयात कृती दलाकडून जमा केला जात आहे. याशिवाय आता तहसीलदार अध्यक्ष असलेले ‘मिशन वात्सल्य’ सुरू केलेले आहे. सात महिन्यांत अवघ्या चार ते दोन बैठका या तालुक्यातील घेतल्या आहेत. यामध्ये ठाणे, कल्याण, मुरबाड, भिवंडी या तालुक्यांमध्ये प्रत्येकी चार बैठका झाल्या आहेत; तर उल्हासनगर, अंबरनाथला प्रत्येकी तीन आणि शहापूरला फक्त दोन बैठका या मिशनच्या झाल्या आहेत.

१) सात महिन्यांत कोणत्या तालुक्यात किती बैठका?

तालुका - बैठका

१) कल्याण- ०४

२) मुरबाड- ०४

३) शहापूर- ०२

४) ठाणे- ०४

५) भिवंडी- ०४

६) अंबरनाथ- ०३

७) उल्हासनगर- ०३

१) शहापूर तालुका सर्वात मागे -

- या ‘मिशन वात्सल्य’चे अध्यक्ष असलेल्या शहापूरच्या तहसीलदारांनी सात महिन्यांत अवघ्या दोन बैठका घेतल्याचे वास्तव महिला बालविकास विभागाच्या अहवालावरून उघडकीस आले आहे. त्यामुळे या तालुक्यात आतापर्यंत सर्वात कमी बैठका घेऊन या महिलांच्या लाभांविषयी आढावा घेतल्याचे दिसून येत आहे.

२) ठाणे, कल्याण, भिवंडी, मुरबाड, सर्वाधिक बैठका -

या चार तालुक्यांनी प्रत्येकी चार बैठका घेऊन या ‘मिशन वात्सल्या’च्या कामाचा आढावा घेतला आहे. या मिशनकडून प्रत्येक आठवड्याला एक बैठक घेणे अपेक्षित आहे. पण त्यांनी आतापर्यंत केवळ चार बैठका घेतल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका