शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कोरोनाने कुंकू हिरावले; सरकारनेही वाऱ्यावर सोडले, ठाण्यातील उदरनिर्वाहाची समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 15:30 IST

- सुरेश लोखंडे ठाणे : कोरोनामध्ये पती गमावलेल्या या महिलांना न्याय देण्यासाठी महिला बाल विकासमंत्र्यांनी ‘मिशन वात्सल्य’ योजनाही सुरू ...

- सुरेश लोखंडे

ठाणे : कोरोनामध्ये पती गमावलेल्या या महिलांना न्याय देण्यासाठी महिला बाल विकासमंत्र्यांनी ‘मिशन वात्सल्य’ योजनाही सुरू केली आहे. तहसीलदार अध्यक्ष असलेल्या या मिशनची प्रत्येक आठवड्यात एक बैठक होणे अपेक्षित आहे. परंतु, गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत सात तालुक्यांत जास्तीत जास्त चार आणि कमीत-कमी केवळ दोन बैठका तहसीलदारांनी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाने कुंकू हिरावले आणि शासनानेही वाऱ्यावर सोडल्याची चर्चा या परिवारांमध्ये ऐकायला मिळत आहे.

कोरोना महामारीत घरातील कर्ता व कुटुंबप्रमुख दगावल्यामुळे जिल्ह्यातील ९४५ महिला विधवा झाल्या आहेत. त्यांना उदरनिर्वाहासाठी दरमहा एक हजार रुपये प्रारंभी म्हणजे ऑगस्टपासून सुरू केले आहेत. पण आताही २०० ते २२५ महिलांना दरमहा पेन्शन सुरू असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. कोरोना महामारीत आतापर्यंत जिल्ह्यात घरातील कमावते व कुटुंबप्रमुख असलेले ९४५ जण दगावले आहेत. त्यांच्या विधवा पत्नींना आता उदरनिर्वाहाची समस्या भेडसावत आहे. सध्या या महिलांपैकी ८५० महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यापैकी आतापर्यंत १५७ महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत; तर १८ महिलांचे अर्ज नामंजूर झाले. याशिवाय १२९ अर्ज अपात्र ठरले असून, ३३१ अर्जांवर कारवाई सुरू आहे.

जिल्ह्यातील ९४५ विधवा महिलांची तालुकानिहाय माहिती प्रारंभी कोकण विभागीय आयुक्तांकडे पाठविलेली आहे. यासाठी तहसीलदारांना या विधवा महिलांची यादी दिली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून महिलांना रेशनकार्ड काढून दिले जात आहे. महिलांची कागदपत्रे संकलित करून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात कृती दलाचे पदाधिकारी कार्यरत केले आहेत. या योजनेसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांचा प्रस्ताव तयार करून तहसील कार्यालयात कृती दलाकडून जमा केला जात आहे. याशिवाय आता तहसीलदार अध्यक्ष असलेले ‘मिशन वात्सल्य’ सुरू केलेले आहे. सात महिन्यांत अवघ्या चार ते दोन बैठका या तालुक्यातील घेतल्या आहेत. यामध्ये ठाणे, कल्याण, मुरबाड, भिवंडी या तालुक्यांमध्ये प्रत्येकी चार बैठका झाल्या आहेत; तर उल्हासनगर, अंबरनाथला प्रत्येकी तीन आणि शहापूरला फक्त दोन बैठका या मिशनच्या झाल्या आहेत.

१) सात महिन्यांत कोणत्या तालुक्यात किती बैठका?

तालुका - बैठका

१) कल्याण- ०४

२) मुरबाड- ०४

३) शहापूर- ०२

४) ठाणे- ०४

५) भिवंडी- ०४

६) अंबरनाथ- ०३

७) उल्हासनगर- ०३

१) शहापूर तालुका सर्वात मागे -

- या ‘मिशन वात्सल्य’चे अध्यक्ष असलेल्या शहापूरच्या तहसीलदारांनी सात महिन्यांत अवघ्या दोन बैठका घेतल्याचे वास्तव महिला बालविकास विभागाच्या अहवालावरून उघडकीस आले आहे. त्यामुळे या तालुक्यात आतापर्यंत सर्वात कमी बैठका घेऊन या महिलांच्या लाभांविषयी आढावा घेतल्याचे दिसून येत आहे.

२) ठाणे, कल्याण, भिवंडी, मुरबाड, सर्वाधिक बैठका -

या चार तालुक्यांनी प्रत्येकी चार बैठका घेऊन या ‘मिशन वात्सल्या’च्या कामाचा आढावा घेतला आहे. या मिशनकडून प्रत्येक आठवड्याला एक बैठक घेणे अपेक्षित आहे. पण त्यांनी आतापर्यंत केवळ चार बैठका घेतल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका