शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राजभवनाकडे निघाला होता मोर्चा, जितेंद्र आव्हाडांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 13:17 IST

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आव्हाड यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना कोपरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

ठाणे/मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात केलेल्या विधानावरुन राज्यात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. राजस्थानी आणि गुजराती नसतील तर मुंबईत पैसाच राहणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ डॅा.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राजभवनावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाणे पोलिसांनी डॅा.जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांना आनंदनगर येथे घेतले ताब्यात. 

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आव्हाड यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना कोपरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. आनंद परांजपे, नजीब मुल्ला यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना आनंदनगर येथे पोलिसांनी ताब्यात घेत राजभवनावर जाण्यापासून रोखले. यावेळी, बोलताना आव्हाड यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टिका केली. महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राच्या मातीचा अपमान कोणी ही सहन करणार नाही. जेव्हा त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर वक्तव्य केले होते तेव्हाच त्यांना हकलण्याची वेळ आली होती. पण, आता अती झाले. मराठी माणूस भिकारी आहे असं त्यांना वाटत असेल तर मराठी माणूस भिकारी नाही. या मातीने अनेकांना श्रीमंत केले आहे, पण मराठी माणूस संस्कृतीने आणि संस्काराने श्रीमंत आहे, असे आव्हाड यांनी म्हटले. 

पोलिसांनी ताब्यात घेतलं म्हणजे पोलिसांचे ते काम आहे. त्यात वाईट वाटण्यासारखे काही नाही, शेवटी पोलीस कायदा सुव्यवस्थेचं काम करतात. आता, मराठी माणसाला फक्त भिकारी म्हणायचे बाकी होतं. सगळ्याच गोष्टी मीडियाला सांगितल्या, तर माझ्याकडे काय राहणार. काही तरी गुपित ठेवला पाहिजे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. 

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी