शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

राजभवनाकडे निघाला होता मोर्चा, जितेंद्र आव्हाडांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 13:17 IST

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आव्हाड यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना कोपरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

ठाणे/मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात केलेल्या विधानावरुन राज्यात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. राजस्थानी आणि गुजराती नसतील तर मुंबईत पैसाच राहणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ डॅा.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राजभवनावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाणे पोलिसांनी डॅा.जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांना आनंदनगर येथे घेतले ताब्यात. 

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आव्हाड यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना कोपरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. आनंद परांजपे, नजीब मुल्ला यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना आनंदनगर येथे पोलिसांनी ताब्यात घेत राजभवनावर जाण्यापासून रोखले. यावेळी, बोलताना आव्हाड यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टिका केली. महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राच्या मातीचा अपमान कोणी ही सहन करणार नाही. जेव्हा त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर वक्तव्य केले होते तेव्हाच त्यांना हकलण्याची वेळ आली होती. पण, आता अती झाले. मराठी माणूस भिकारी आहे असं त्यांना वाटत असेल तर मराठी माणूस भिकारी नाही. या मातीने अनेकांना श्रीमंत केले आहे, पण मराठी माणूस संस्कृतीने आणि संस्काराने श्रीमंत आहे, असे आव्हाड यांनी म्हटले. 

पोलिसांनी ताब्यात घेतलं म्हणजे पोलिसांचे ते काम आहे. त्यात वाईट वाटण्यासारखे काही नाही, शेवटी पोलीस कायदा सुव्यवस्थेचं काम करतात. आता, मराठी माणसाला फक्त भिकारी म्हणायचे बाकी होतं. सगळ्याच गोष्टी मीडियाला सांगितल्या, तर माझ्याकडे काय राहणार. काही तरी गुपित ठेवला पाहिजे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. 

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी