शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

पाण्यासाठी ठामपाचे माजी विरोधीपक्ष नेते पठाण यांचे आयुक्तांच्या दालनाबाहेर बसून आंदोलन

By जितेंद्र कालेकर | Updated: June 7, 2024 16:51 IST

हजारो नागरिकांसह आयुक्तांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा.

जितेंद्र कालेकर, ठाणे: ठाणे, मुंब्रा - कौसा भागात गेल्या चार दिवसांपासून पाणीच सोडण्यात येत नाही. पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी आणि स्टेमचा शटडाऊन संपल्यानंतरही पाणी सोडले जात नसल्याने संतप्त झालेले माजी विरोधीपक्ष नेते अश्रफ (शानू) पठाण यांनी महापालिका आयुक्त सौरव राव यांच्या दालनासमोरच शुक्रवारी आंदोलन केले. त्यामुळे पालिका मुख्यालयात बराच वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने दहा टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ठाणे शहरातील काही भाग आणि कळवा, मुंब्रा , कौसा परिसरात गेली चार दिवस पाणीपुरवठाच केला जात नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी टँकर पाचारण करावे लागत आहेत. त्याविरोधात पठाण आक्रमक झाले हाेते. शुक्रवारी त्यांनी पालिका मुख्यालयात धडक देऊन आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या आंदाेलन केले. त्यामुळे पालिका मुख्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या आंदोलनानंतर  पाणी पुरवठा अभियंता विनोद पवार यांनी पठाण यांची भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासनही दिले.

यावेळी पठाण म्हणाले की, ठाणे शहरात दहा टक्के पाणी कपात केली असली तर ९० टक्के पाणीपुरवठा केला जात नाही. गेल्या चार दिवसांपासून पाणीच सोडण्यात आले नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मुंब्रा - कौसा भागातील नागरिकांना गेल्या तीन दिवसात सुमारे ५० लाख रूपयांचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. ठामपाचे काही अधिकारी टँकर लॉबीचे हित सांभाळण्यासाठी पाणी सोडत नाहीत. तसेच टँकर लॉबीकडून मोठा मलिदा मिळत असल्यानेच नागरिकांची छळवणूक होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. येत्या सोमवारपर्यत पाणीपुवठा नियमित केला नाही तर पालिका आयुक्तांच्या घरासमोर दहा हजार नागरिकांसह आंदोलनाला बसू, असा इशाराही पठाण यांनी दिला.

शटडाउन लांबल्यामुळे उद्भवली समस्या-

‘ एमआयडीसीने ४ जून रोजी काही कामांसाठी मुंब्रा भागासाठी शटडाऊन घेतला होता. हे काम ५ जूनला संपणे अपेक्षित होते. परंतू, ते दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ जूनला दुपारी २.३० वाजता संपले. त्यानंतर पाणी पुरवठा सुरु केला. मात्र, शटडाऊन नंतर दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे शुक्रवार (७ जून पासून ) पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे. शटडाऊन २४ तासांचा असला तरी त्यानंतर दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. हीच समस्या होती. ती आता सुटली आहे.’ विनोद पवार, उपनगर अभियंता, पाणी पुरवठा विभाग, ठामपा.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाईStrikeसंप