शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बाळकुम-गायमुख सागरी मार्गाचा खर्च ६०० कोटींनी वाढणार; एमएमआरडीए- ठाणे-महापालिकेला झटका

By नारायण जाधव | Updated: October 11, 2023 16:46 IST

पर्यावरण मंत्रालयाने घेतली हरकत

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ठाणे शहराच्या रस्ते वाहतुकीवर ताण कमी करून वाहनाच्या प्रदूषणापासून ठाणेकरांची सुटका करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या बाळकुम-गायमुख या सहा पदरी मार्गास मंजुरी देताना केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने एमएमआरडीएसह ठाणे महापालिकेस मोठा झटका दिला आहे.

१३.२१५ किमीच्या मार्गात आधीच्या आराखड्यानुसार मार्गातील नौदलाच्या प्रभाव क्षेत्रात कट ॲन्ड कव्हर तत्त्वावर रस्ता बांधण्याचे प्रस्तावित होते. मात्र, आता केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाच्या एक्सपर्ट ॲप्राजल समितीने २६ सप्टेंबर २०२३ च्या बैठकीत त्यास हरकत घेऊन हा संपूर्ण ८०० मीटर लांबीचा एक तर उन्नत वा भुयारी करण्याची सूचना केली आहे. परंतु, उन्नत मार्गास आधीच नौदलाची हरकत असल्यामुळे तो आता भुयारीच बांधावा लागणार आहे. यामुळे आधीच्या प्रस्तावानुसार ९०० कोटींवरून त्याचा खर्च १५०० कोटींवर जाऊन अंदाजे ६०० कोटी रुपये वाढणार आहे.

ठाण्यातील बाळकुम ते गायमुख हा रस्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नातील एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्यासाठी ठाणे महापालिकेसह एमएमआरडीएने कंबर कसली आहे. त्यानुसार एमएमआरडीएने आपल्या २०२१ मध्ये झालेल्या १५१ व्या बैठकीत या प्रकल्पासाठी १३१६.१८ कोटी रुपये इतका खर्च गृहीत धरला होता. मात्र, नंतर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने आराखडा सादर केल्यानंतर खर्चात थेट दुपटीने वाढ झाली आहे. त्यानुसार या ठाणे खाडी किनारा रस्त्यासाठी २६७४ कोटी रुपये इतका निधी लागणार असून, त्यास एमएमआरडीएने १५४ व्या बैठकीत मंजुरी दिली आहे. परंतु, आता त्यात आता पुन्हा ६०० कोटींची वाढ होणार असल्याने पुन्हा त्यासाठी मंजुरी घ्यावी लागणार आहे.

या गावांची जमीन जाणारखारेगाव येथून सुरू होऊन घोडबंदर रस्त्यावरील गायमुख येथे हा रस्ता सागरी रस्ता संपणार आहे. त्यात बाळकुम, कोलशेत, वाघबीळ, ओवळा, कासारवडवली, मोघरपाडा या गावांतून तो जाणार आहे. मूळ प्रस्तावात नौदलाने त्यांच्या प्रभाव क्षेत्रात तो खोदकाम करून भुयारी करून तो नंतर कव्हर करण्याची सूचना करून आपले ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. परंतु, खाेदकाम करून पुन्हा कव्हर करण्यात मोठ्या प्रमाणात खारफुटीसह सीआरझेड क्षेत्र प्रभावीत होणार असल्याने केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने तो उन्नत किंवा भुयारी बांधण्याची सूचना केली आहे.

यामुळे वाढणार खर्चठाणे महापालिकेच्या आधीच्या प्रस्तावात नौदलाच्या प्रभाव क्षेत्रात तो जमिनीखाली कट ॲन्ड कव्हर तत्त्वावर बांधण्याचे प्रस्तावित होते. यानुसार जमिनीखाली १० मीटर खोलीचे खोदकाम करून नंतर ते कव्हर करण्यात येणार होते. त्यासाठी ९०० कोटींचा खर्च अपेक्षित होता. परंतु, तो भुयारी केल्यास जमिनीखाली ३० मीटर खोलीचे खोदकाम करावे लागणार आहे. यामुळे खर्च ९०० कोटींवरून १५०० कोटींवर जाणार आहे.

८४४१ खारफुटी झाडांना फटकाबाळकुम- गायमुख सागरी मार्गात १००३७७ चौरस मीटर खारफुटीचे क्षेत्र प्रभावीत होणार आहे. यात खारफुटीची ७०३४ झाडे तात्पुरती तर बाळकुम येथे ४३९, खारेगाव ७७, कोलशेत ५६२, कावेसर ३४, वडवली-९ आणि भाईंदरपाडा १०४ अशी १४०७ खारफुटीची झाडे कायमची तोडावी लागणार आहेत.