शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

२०२८ पासून प्रवाश्यांना मोठ्या प्रमाणात करता येणार मेट्रोचा वापर, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

By धीरज परब | Updated: May 14, 2025 19:53 IST

Mira Road News: ह्या वर्षी मेट्रोची ५० किमी मार्गिका, पुढील वर्षी ६२ किमी तर त्याच्या पुढच्या वर्षात ६० किमी मेट्रो मार्गिका तयार होऊन एकमेकांना जोडले जाणार असल्याने २०२८ पासून मोठ्या प्रमाणात मेट्रोचा वापर प्रवाश्यांना करता येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मीरारोड - ह्या वर्षी मेट्रोची ५० किमी मार्गिका, पुढील वर्षी ६२ किमी तर त्याच्या पुढच्या वर्षात ६० किमी मेट्रो मार्गिका तयार होऊन एकमेकांना जोडले जाणार असल्याने २०२८ पासून मोठ्या प्रमाणात मेट्रोचा वापर प्रवाश्यांना करता येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मीरारोडच्या काशीगाव ते दहिसर मेट्रो टप्पा १ च्या तांत्रिक चाचणी साठी फडणवीस सह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे आले होते.

काशिगाव मेट्रो स्थानकात मेट्रोच्या तांत्रिक चाचणीला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे व पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सह अनेक लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. मेट्रोत बसून त्या सर्वानी दहिसर मेट्रो स्थानक पर्यंत प्रवास केला.

काशिगाव, मीरागाव, पांडुरंगवाडी आणि दहिसर अशी मेट्रो मार्गिका पहिल्या टप्प्यात सुरु होणार आहे. आजची तांत्रिक चाचणी असून आणखी चाचण्या केल्या जातील. तसेच प्रलंबित कामे पूर्ण करायची असल्याने प्रत्यक्षात काशिगाव ते दहिसर मेट्रो सुरु होण्यास सुमारे ६ महिने लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काशिगाव येथे मुख्यमंत्री म्हणाले कि, काशिगाव ते दहिसर पर्यंतच्या मेट्रोची तांत्रिक चाचणी केली गेली. लवकरच मेट्रोचे विधिवत उदघाटन करू. भाईंदरच्या सुभाषचंद्र बोस मैदान ते अंधेरी पर्यंत मेट्रो जोडली जाईल. ती पुढे वांद्रे पर्यंत करायची आहे.

डोंगरी येथे मेट्रो डेपो बनेल कि विरार पर्यंत मेट्रो मार्गिका करणार. ह्या मेट्रो मार्गिका ठाण्याशी जोडून लूप तयार होईल जेणे करून मुंबई व एमएमआर च्या प्रवाश्याना प्रवास सुकर होईल. मुंबईचे ६० टक्के ट्रॅफिक हे पश्चिम महामार्ग वर असल्याने कोस्टल रोड आणि मेट्रो ने वाहतूक विभागण्याचा प्रयत्न आहे. वाढवणं बंदर आणि तिकडून बुलेट ट्रेन जाणार असल्याने मेट्रो त्याला जोडण्याचा विचार देखील आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

सदर मेट्रो हि ठाणे - मुंबईला जोडली जाईल तसेच भविष्यात पालघर जिल्हा जोडला जाईल. ज्याचा फायदा सदर भागातील नागरिकांना होईल. काशिगाव मेट्रोचा पहिला टप्पा डिसेम्बर २०२५ पर्यंत तर भाईंदर पर्यंतचा टप्पा २ हा डिसेम्बर २०२६ पर्यंत पूर्ण होईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आता आम्ही तिघे एकत्र आहोत. आम्ही तिघांनी सुसाट वेगाने विकासाची एक्स्प्रेस सुरु केलेली आहे. आता त्याच्या मध्ये कोणी स्पीडब्रेकर आणू शकत नाही, बूस्टर देऊ शकतात. स्पीडब्रेकरला जागा नाही असा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.   

टॅग्स :mira roadमीरा रोडMetroमेट्रोDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस