शहरं
Join us  
Trending Stories
1
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
2
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
3
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
4
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
5
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
6
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
7
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
9
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
10
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
11
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
13
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
14
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
15
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
16
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
17
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
18
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
19
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
Daily Top 2Weekly Top 5

२०२८ पासून प्रवाश्यांना मोठ्या प्रमाणात करता येणार मेट्रोचा वापर, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

By धीरज परब | Updated: May 14, 2025 19:53 IST

Mira Road News: ह्या वर्षी मेट्रोची ५० किमी मार्गिका, पुढील वर्षी ६२ किमी तर त्याच्या पुढच्या वर्षात ६० किमी मेट्रो मार्गिका तयार होऊन एकमेकांना जोडले जाणार असल्याने २०२८ पासून मोठ्या प्रमाणात मेट्रोचा वापर प्रवाश्यांना करता येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मीरारोड - ह्या वर्षी मेट्रोची ५० किमी मार्गिका, पुढील वर्षी ६२ किमी तर त्याच्या पुढच्या वर्षात ६० किमी मेट्रो मार्गिका तयार होऊन एकमेकांना जोडले जाणार असल्याने २०२८ पासून मोठ्या प्रमाणात मेट्रोचा वापर प्रवाश्यांना करता येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मीरारोडच्या काशीगाव ते दहिसर मेट्रो टप्पा १ च्या तांत्रिक चाचणी साठी फडणवीस सह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे आले होते.

काशिगाव मेट्रो स्थानकात मेट्रोच्या तांत्रिक चाचणीला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे व पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सह अनेक लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. मेट्रोत बसून त्या सर्वानी दहिसर मेट्रो स्थानक पर्यंत प्रवास केला.

काशिगाव, मीरागाव, पांडुरंगवाडी आणि दहिसर अशी मेट्रो मार्गिका पहिल्या टप्प्यात सुरु होणार आहे. आजची तांत्रिक चाचणी असून आणखी चाचण्या केल्या जातील. तसेच प्रलंबित कामे पूर्ण करायची असल्याने प्रत्यक्षात काशिगाव ते दहिसर मेट्रो सुरु होण्यास सुमारे ६ महिने लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काशिगाव येथे मुख्यमंत्री म्हणाले कि, काशिगाव ते दहिसर पर्यंतच्या मेट्रोची तांत्रिक चाचणी केली गेली. लवकरच मेट्रोचे विधिवत उदघाटन करू. भाईंदरच्या सुभाषचंद्र बोस मैदान ते अंधेरी पर्यंत मेट्रो जोडली जाईल. ती पुढे वांद्रे पर्यंत करायची आहे.

डोंगरी येथे मेट्रो डेपो बनेल कि विरार पर्यंत मेट्रो मार्गिका करणार. ह्या मेट्रो मार्गिका ठाण्याशी जोडून लूप तयार होईल जेणे करून मुंबई व एमएमआर च्या प्रवाश्याना प्रवास सुकर होईल. मुंबईचे ६० टक्के ट्रॅफिक हे पश्चिम महामार्ग वर असल्याने कोस्टल रोड आणि मेट्रो ने वाहतूक विभागण्याचा प्रयत्न आहे. वाढवणं बंदर आणि तिकडून बुलेट ट्रेन जाणार असल्याने मेट्रो त्याला जोडण्याचा विचार देखील आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

सदर मेट्रो हि ठाणे - मुंबईला जोडली जाईल तसेच भविष्यात पालघर जिल्हा जोडला जाईल. ज्याचा फायदा सदर भागातील नागरिकांना होईल. काशिगाव मेट्रोचा पहिला टप्पा डिसेम्बर २०२५ पर्यंत तर भाईंदर पर्यंतचा टप्पा २ हा डिसेम्बर २०२६ पर्यंत पूर्ण होईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आता आम्ही तिघे एकत्र आहोत. आम्ही तिघांनी सुसाट वेगाने विकासाची एक्स्प्रेस सुरु केलेली आहे. आता त्याच्या मध्ये कोणी स्पीडब्रेकर आणू शकत नाही, बूस्टर देऊ शकतात. स्पीडब्रेकरला जागा नाही असा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.   

टॅग्स :mira roadमीरा रोडMetroमेट्रोDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस