शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

एमएमआरडीएची भाडे तत्त्वावरील घरे महापालिकेला मालकीने देण्याचा चेंडू आता शासनाच्या दरबारी  ​​​​​​​

By धीरज परब | Updated: March 17, 2023 14:05 IST

ऑगस्ट २०१३ सालात तत्कालीन शासनाने भाडेतत्वार उपलब्ध होणाऱ्या एकूण सदनिकांपैकी ५० टक्के सदनिका संक्रमण निवास स्थान म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला होता. 

मीरारोड - एमएमआरडीएची भाडे तत्त्वावरील घरां पैकी ५० टक्के घरे भाड्याऐवजी महापालिकांना मालकी हक्काने देण्याचा निर्णय एमएमआरडीएने शासनाच्या नगरविकास विभागाच्या दरबारी टोलवला आहे. एमएमआरडीए क्षेत्रात जास्तीचे चटईक्षेत्र विकासकांना देऊन त्या मोबदल्यात छोट्या सदनिका बांधून घेण्याचा निर्णय काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी सरकारने घेतला होता. ऑगस्ट २०१३ सालात तत्कालीन शासनाने भाडेतत्वार उपलब्ध होणाऱ्या एकूण सदनिकांपैकी ५० टक्के सदनिका संक्रमण निवास स्थान म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला होता. 

महापालिकेत क्षेत्रात तात्पुरत्या निवाऱ्यासाठी संक्रमण शिबीर नसल्याने अनेक महापालिका आयुक्तांच्या विनंती वरून केवळ संक्रमण निवासस्थान वापरासाठी सदनिका आयुक्तांच्या ताब्यात देण्याचे ठरले होते.  त्यासाठी प्रति चौ . मी . १ रुपये ह्या नाममात्र भाड्याने ३० वर्षांच्या काळासाठी सदनिका देण्यात आल्या. 

मीरा भाईंदर महापालिका हद्दीत देखील भाडेतत्त्वावरील सदनिका योजनेतून एमएमआरडीला प्रत्येकी ३२० चौ . फुटाच्या २ हजार ७८९ सदनिका विकासकांनी बांधून दिल्या आहेत . ५० टक्के प्रमाणे १३९४ सदनिका महापालिकेस देणे असताना पालिकेला १७५० सदनिका आतापर्यंत संक्रमण निवासस्थान साठी देण्यात आल्या आहेत. म्हणजेच ३५६ सदनिका जास्त मिळाल्या आहेत. पालिकेने सदर सदनिका बीएसयुपी योजनेतील रहिवाशी, विकास कामात बाधित रहिवासी तसेच धोकादायक इमारतीतील रहिवासी आदींना भाडे तत्वावर राहण्यास दिल्या आहेत. 

उर्वरित ४३२ सदनिका एमएमआरडीच्या कर्मचाऱ्यांसाठी, ९५ सदनिका एमएमआरडीकडे रिक्त तर ४०७ सदनिका ह्या कोरोना काळात पालिकेला अलगीकरण कक्ष म्हणून वापरास दिलेल्या आहेत. दरम्यान महापालिकेला संक्रमण निवासस्थान म्हणून नाममात्र भाड्याने दिलेल्या ५० टक्के सदनिका मालकी तत्वावर देण्याची मागणी नोव्हेंबर २०२२ मध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. 

आ. सरनाईक यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक घेऊन नगरविकास विभाग व एमएमआरडीएला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एमएमआरडीएच्या नगर नियोजन प्रमुख मोहन सोनार यांनी १३ मार्च रोजी नगरविकास विभागाला पत्र पाठवले आहे . त्यात मीरा भाईंदर महापालिकेला १,७५० सदनिका संक्रमण निवास म्हणून वापरण्यासाठी हस्तांरीत केल्या आहेत . पण हस्तांतरित केलेली घरे महापालिकेला कायमस्वरूपी देता येणार नाही असे स्पष्ट नमूद करत सदर घरे भाड्या ऐवजी मालकी तत्वावर देण्याबाबतचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात यावा व त्याबाबत एमएमआरडीएला निर्देश व्हावेत, असे कळवले आहे. 

त्यामुळे शासनाने ५० टक्के सदनिका महापालिकेला मालकी तत्वावर देण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा फायदा एमएमआर क्षेत्रातील सर्वच पालिकांना होणार आहे . तर शासन स्तरावर मुख्यमंत्री यांच्या नगरविकास विभागा कडून काय निर्णय होतो या कडे पालिकेचे लक्ष लागले आहे . 

टॅग्स :mmrdaएमएमआरडीए