शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

टॅक्सी-टेम्पोमध्ये थाटला संसार; रात्र काढली जागून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:11 IST

गोविंदवाडी बायपास परिसरातील नागरिकांचा पुलावर मुक्काम

- मुरलीधर भवारकल्याण : पावसाच्या पुरामुळे कल्याण खाडीचे पाणी जसे वाढू लागले, तसे आम्ही सगळे अंगावरच्या कपड्यानिशी घराबाहेर पडलो. गोविंदवाडी बायपास रस्त्यावरील ओळखीच्या व्यक्तीच्या टॅक्सीमध्ये २४ तास जागून काढले आहेत. मात्र, कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून कोणीही मदतीसाठी आले नाही. साधी विचारपूसही केली नाही, अशी व्यथा दुर्गाडी खाडी परिसरातील घरात राहणारे मेहमूद शेख यांनी मांडली.मुसळधार पावसामुळे कल्याण खाडीने रौद्ररूप धारण केल्याने रविवारी पहाटे ५ वाजता शेख यांच्या घरात पुराचे पाणी शिरू लागले. तेव्हा ते, पत्नी अमिना, मुलगा वकास यांच्यासह गॅस सिलिंडर घेऊन घराबाहेर पडले. त्यावेळी त्यांनी थेट गोविंदवाडी बायपास रस्ता गाठला. तेथे मित्र मुनाफ शेख याची टॅक्सी उभी होती. त्या टॅक्सीमध्ये त्यांनी पूर्ण रात्र जागून काढली. साधी विचारपूस करायलाही महापालिकेकडून कोणीही आले नाही. काही संस्थांनी त्यांना बिस्किटे व चहा दिला. त्यावर, त्यांनी रात्र काढली.खाडी परिसरातील सुमित्रा काऊतकर यांच्याही घरात पाणी शिरल्याने त्यांनी एका टेम्पोत संसार थाटला. गोविंदवाडी बायपास रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोत त्यांनी घरातील मोजकेच साहित्य घेऊन रात्र काढली. पती भगवान, मुलगा आनंद, अमोल आणि प्रिया हेदेखील त्यांच्या सोबत होते. घरकाम करणाऱ्या अरुणा मोरे यांचाही संसार एका टेम्पोतच आहे. घरातील सगळे सामान सोडून त्यांनी टेम्पोचा आधार घेतला. तसेच मोरे यांच्या टेम्पोतच आसिया युसूफ शेख यांनीही जागून रात्र काढली.७० वर्षीय हुसेन इस्माईल यांची खाडीकिनारी असलेली चहाची टपरी वाहून गेली आहे. रहिवासी नासीर शेख यांनी सांगितले की, महापालिकेने पूरग्रस्तांची पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे बायपास रस्त्यावर उभ्या असलेल्या टॅक्सी-टेम्पोचालकांनी त्यांच्या गाड्या बाधितांना राहण्यासाठी दिल्या आहेत. बाधित झालेल्या जवळपास १५० कुटुंबांनी टॅक्सी-टेम्पोचा आधार घेतला. त्यामुळे त्यांचा जीव बचावला आहे.म्हशींचा गोठाही रस्त्यावरचकल्याण खाडी परिसरालगत १५० पेक्षा जास्त गोठे असून, त्यात जवळपास पाच हजार म्हशी आहेत. म्हशींना पुराच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी अनेक गोठामालकांनी त्यांच्या म्हशी गोविंदवाडी बायपास रस्त्याच्या दुभाजकाला बांधल्या. दुभाजकाच्या मधोमध त्यांच्यासाठी चारा टाकण्यात आला होता. म्हशीच्या शेणगोठ्यामुळे रस्त्यावर सगळा राळ पसरला आहे.वाहतूक सुरू : पुरामुळे दुर्गाडी चौकात रविवारी पाणी भरल्याने दुर्गाडी पुलावरून कल्याण-भिवंडी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. ही वाहतूक सोमवारी सकाळी सुरू करण्यात आली आहे. पावसामुळे रस्त्यांची चाळण तसेच बारीक खडी पसरल्याने रस्ते वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. वाहतूककोंडीचा सामना करीत वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे.

टॅग्स :Rainपाऊस