शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

ठाण्याच्या डायघर पोलिसांनी एकाच वेळी दाखविले माणूसकी आणि कारवाईचे दर्शन

By जितेंद्र कालेकर | Updated: April 2, 2020 19:16 IST

मंगळवारी गस्तीच्या दरम्यान डायघर पोलिसांच्या व्हॅनचा सायरन वाजल्यानंतर एका फळ विक्रेत्याने घाबरुन पळ काढला. त्याच्या फळांचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी स्वत: त्याची गाडी ढकलून चौकीवर आणली. त्यानंतर कोरोनाची माहिती देऊन तोंडाला लावण्यासाठी मास्क आणि त्याची हातगाडीही परत केली.

ठळक मुद्देपोलीस आल्याचे समजताच फळ विक्रेता पळालावरिष्ठ पोलीस निरीक्षकाने स्वत: ढकलत आणली हातगाडीवाहन चालकांविरुद्ध दाखल केले गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: संचारबंदीच्या काळात नागरिकांना हटवितांना पोलिसांना माणूसकीचे भानही ठेवावे लागत आहे. मंगळवारी गस्तीच्या दरम्यान डायघर पोलिसांच्या व्हॅनचा सायरन वाजल्यानंतर एका फळ विक्रेत्याने घाबरुन पळ काढला. त्याच्या फळांचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी स्वत: त्याची गाडी ढकलून चौकीवर आणली. दरम्यान, विनाकारण रस्त्यावर आलेल्या पाच वाहन चालकांविरुद्ध मात्र बुधवारी त्यांनी कारवाई करुन गुन्हे दाखल केले.शीळफाटा ते पूजा पंजाब हॉटेल महापे रोडवर पोलीस व्हॅनचा सायरन वाजवत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांची ३१ मार्च रोजी गस्त सुरु होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना घरात राहण्याबाबतच्या सूचना त्यांच्याकडून ध्वनीक्षेपकाद्वारे दिल्या जात होत्या. पोलिसांची व्हॅन पाहूनच गर्भगळीत झालेल्या एका फळ विक्रेत्याने मात्र अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश असतांनाही आपला ठेला सोडून तिथून पळ काढला. आपला ठेला घेण्यासाठी तो परत येईल, या अपेक्षेने जाधव यांनी काही वेळ तिथे थांबून त्याची वाट पाहिली. मात्र भीतीने तो आलाच नाही. त्याचे ठेल्यावरील फळ कोणी चोरू नये यासाठी स्वत: जाधव यांनी तो ठेला ढकलत शीळ फाटा पोलीस चौकी येथे नेऊन ठेवला. काही तासांनी हा फळ विक्रेता तरुण घाबरतच या चौकीत येऊन त्यांना भेटला. तेंव्हा त्यास कोरोना विषाणूची माहिती देऊन तोंडावर लावण्यासाठी एक मास्कही देऊन त्याचा ठेला त्यांनी त्याला परत केला. दरम्यान, विनाकारण वाहने रस्त्यावर आणणाºया आरीस खान (२१, डावले, ठाणे), विजय सिंग (२१, रा. डोंबिवली), संदीप रजक (३०, रा. कुर्ला, मुंबई), किशोर आलीमकर (४०, रा. शीळगाव, ठाणे), बालेंद्र मिश्रा (५५, दिघा, नवी मुंबई) आणि दिनेश गुप्ता (३१, रा. दिवा, ठाणे)या वाहन चालकांविरुद्ध १ एप्रिल रोजी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग उपाययोजना कायद्यासह कलम १८८ नुसार कारवाई करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी डायघर पोलिसांनी काही दानशूर नागरिकांच्या मदतीने सुमारे ६० मजूरांच्या घरातही आवश्यक वस्तूंचे वाटप केले होते. विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध मात्र कारवाई करण्यात कोणाचीही गय केली जात नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस