शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

पाणीकपातीपासून ठाणेकरांची तूर्त सुटका, पावसाने दिला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 02:36 IST

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील पाणीपुरवठा हा बुधवार ते गुरुवार असा २४ ते ३० तास बंद ठेवण्यात येत होता.

ठाणे : गेले काही महिने ठाणेकरांचे पाण्याविना हाल सुरू होते. परंतु, आता पावसाने ठाण्यासह जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याने ठाणे शहराची पाणीकपात तूर्तास रद्द केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. परंतु, पावसाने पाठ फिरवल्यास पुन्हा पाणीकपात केली जाईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. असे असले तरी जोपर्यंत पाऊस आहे, तोपर्यंत ठाणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही.ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील पाणीपुरवठा हा बुधवार ते गुरुवार असा २४ ते ३० तास बंद ठेवण्यात येत होता. यंदा तर ही पाणीकपात सप्टेंबर २०१८ पासूनच लागू केली होती. सुरुवातीला १४ टक्के त्यानंतर २० टक्के आणि आता तब्बल ३० टक्के पाणीकपात ठाणे शहरात केली जात होती. परंतु, त्यानंतरही पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. पाण्याच्या या कपातीवरून महासभेतही अनेकवेळा आवाज उठवण्यात आला होता. पाण्यासाठी आंदोलनही झाल्याचे पाहावयास मिळाले होते.दरम्यान, आता काही दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पाऊस असा पडत राहिला, तर धरणांच्या पातळीतही लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाने लावलेल्या सततच्या हजेरीमुळे शहरातील पाणीकपात तूर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. जोपर्यंत पावसाची अशीच कृपा राहील, तोपर्यंत कपात होणार नसल्याचेही पालिकेच्या सूत्रांचे म्हणणे आहे... तर पुन्हा पाणीकपातअद्याप धरणांच्या पातळीत वाढ झालेली नाही. तलावांमध्येही पुरेसा पाणीसाठा नाही. परंतु, सलग पडणाऱ्या पावसामुळे हा दिलासा दिला जात असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. परंतु, पावसाने पाठ फिरवल्यास पुन्हा पाणीकपात करावी लागेल, असेही पालिकेने स्पष्ट केले.

टॅग्स :Waterपाणी