शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकर जानेवारीपर्यंत शॉवरफुल!; लघुपाटबंधारे विभागाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:51 IST

पाणीटंचाईचे संकट तीन महिने लांबणीवर, जिल्हावासीयांना दिलासा

ठाणे : दिवाळी संपताच ठाणे जिल्ह्यात दरवर्षी सुरु होणारी १५ टक्के पाणीकपात यंदा होणार नाही. जिल्ह्यास पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा भरपूर पाणीसाठा असल्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत सर्व महापालिका, नगरपालिकांना त्यांच्या मंजूर कोट्यानुसार पाणी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर उपलब्ध पाणीसाठ्यास अनुसरून निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील पाच महापालिकांसह दोन नगरपालिका आणि ग्रामीण भागास मोठा दिलासा मिळाला आहे.दरवर्षी दिवाळी झाल्यावर लागलीच सर्व शहरांमध्ये पाणीकपात लागू होत होती. त्यामुळे सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद केला जात होता. साहजिकच ज्या भागात सोमवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद असायचा तेथील सोसायट्यांमध्ये रविवारी दुपारीच पाणी बंद केले जात होते. सोमवारी पाणी नसल्याने काटकसरीने वापरावे लागायचे. सोमवारी पाणी नसल्याने मंगळवारी दिवसभर पाणीपुरवठ्यावर परिणाम असायचा. तात्पर्य हेच की, एक पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद असला तरी त्याची झळ त्या दिवसाच्या मागील व पुढील दिवसही जाणवायची. एप्रिल व मे महिन्यात आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात लागू केल्यावर आठवड्यात सहा दिवस पाण्याची बोंब असायची व जेमतेम एक किंवा दोन दिवस तुलनेनी बºयापैकी पाणी मिळायचे. त्यामुळे शॉवर सोडाच बालदीभर पाणी मिळाले तरी नशिब, अशी ठाणेकरांची अवस्था असायची. यंदा या त्रासापासून नागरिकांना दिलासा लाभला आहे. जानेवारी अखेरपर्यंत पाणीपुरवठा पूर्ण दाबाने मिळाला व फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये थोडीफार कपात लागू झाली तरी जेमतेम तीन महिने लोकांना कळ सोसावी लागेल. यंदा आॅक्टोबर अखेरपर्यंत पाऊस कोसळल्याने ठाणे जिल्ह्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. मात्र लांबलेला पाऊस आणि बारवी धरणाची उंची वाढल्याने अतिरिक्त पाणीसाठा त्यामुळे पाण्याचा दिलासा लाभला.कळवा येथील लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यालयात सर्व महापालिकांच्या पाणीपुरवठा विभागांसह स्टेमघर, एमआयडीसी आदींची बैठक लघुपाटबंधारे विभागाने १५ नोव्हेंबर रोजी घेतली. मंजूर कोट्यानुसार पाणी उचलण्याची तंबी सर्वांना देण्यात आली. कोणीही जादा पाणी उचलण्याचा प्रयत्न करू नये. जानेवारीनंतर कपात करायची किंवा कसे, याविषयी निर्णय घेण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. यामुळे यंदा पाणीकपातीचे संकट टळले आहे.जलपर्णी स्वच्छता केडीएमसीवरउल्हास नदीपात्रातून पाणी उचलणाºया स्टेमघरसह कल्याण-डोंबिवली महापालिकेला मात्र उल्हास नदीतील जलपर्णी साफ करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या नदीपात्रात जलपर्णी होणार नाही, याची काळजी घेण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली. पाणी उचलण्याच्या ठिकाणी स्टेमघर व केडीएमसीने जलपर्णी होऊ न देण्याचे आदेश लघुपाटबंधारे विभागाकडून देण्यात आले आहेत.बारवीत मुबलक पाणीसाठा : बारवी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यास अनुसरून जानेवारीनंतर पाणीपुरवठ्याच्या कमीअधिक प्रमाणाचा विचार करण्यावर मात्र सर्वांचे एक मत झाल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी नोव्हेंबरअखेर पाणीकपातीला तोंड द्यावे लागले होते. ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरांमधील लोकसंख्या वाढत असून बेकायदा इमारती, चाळी यामुळे पाण्याची समस्या नेहमीच भेडसावते. नोव्हेंबर ते मे या सात महिन्यांत या परिसरात दरवर्षी पाणीटंचाईचे संकट असल्याने अनेक वसाहतींमध्ये पाण्याकरिता वादावादी, भांडणे इतकेच काय हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका