शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

बंदमुळे ठाणेकर राहिले उपाशी! ५०० हॉटेल व्यावसायिकांचा कारवाईविरुद्ध एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 06:56 IST

महापालिकेने नोटीस देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाºया ८६ हॉटेल व बारपैकी १३ हॉटेल व बार सील करण्याची कारवाई अग्निशमन विभागाने केली आहे. यानंतर, अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रासाला कंटाळून मंगळवारी ठाणे शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी दुपारी ४ वाजल्यापासून एक दिवसाचा बंद पुकारला.

ठाणे - महापालिकेने नोटीस देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाºया ८६ हॉटेल व बारपैकी १३ हॉटेल व बार सील करण्याची कारवाई अग्निशमन विभागाने केली आहे. यानंतर, अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रासाला कंटाळून मंगळवारी ठाणे शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी दुपारी ४ वाजल्यापासून एक दिवसाचा बंद पुकारला. यामुळे हॉटेलवर पोटभरणाºया ठाणेकरांचे अतोनात हाल झाले. आयुक्तांशी बुधवारी चर्चा केल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याचा निर्णयदेखील त्यांनी घेतला आहे.अग्निशमन दलाचा ना-हरकत दाखला नसलेल्या ठाणे शहरातील एकूण ४२६ हॉटेल, बार, लाउंज यांना यापूर्वी अग्निशमन दलाच्या वतीने नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी जवळपास ८० आस्थापनांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्याने ती हॉटेल नियमित करण्यात आली आहेत. तसेच २६० प्रकरणे शहर विकास विभागाकडे नियमित करण्याच्या कार्यवाहीसाठी सादर करण्यात आली आहेत. परंतु, नोटीस दिल्यानंतरही त्यावर काहीही कार्यवाही न केलेले एकूण ८६ हॉटेल, बार, लाउंज तीन दिवसांत सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी दिले होते. त्यानंतर, शनिवारी अग्निशमन विभागाने शहरातील तब्बल १३ हॉटेल सील केले होते. टप्प्याटप्प्याने उर्वरित हॉटेलही सील केले जाणार आहेत.परंतु, आता शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी एकत्रित येऊन महापालिकेच्या अग्निशमन विभागाविरोधात असहकार पुकारला आहे. त्यानुसार, मंगळवारी दुपारी अचानक ४ वाजल्यापासून त्यांनी बंद पुकारला. महाराष्टÑ अग्निशमन कायद्यांतर्गत आम्ही सर्व प्रकारच्या अटींचे पालन केले आहे. तसेच बी फॉर्मदेखील भरून दिला आहे. असे असतानादेखील अग्निशमन विभागामार्फत रोजच्या रोज नवनवीन अटी काढल्या जात आहेत. त्यामुळे त्यांचा हा त्रास असह्य झाल्यानेच हा बंद पुकारल्याची माहिती हॉटेल तथा बार असोसिएशनने दिली. अग्निशमन विभागाच्या या जाचक अटींमुळे आम्हाला आमचा व्यवसाय बंद करण्याची वेळ आल्याचेही मत या व्यावसायिकांनी व्यक्त केले.हॉटेल, बार सील करण्याची कारवाई सुरूचमहापालिकेच्या अग्निशमन दलाने नोटीस देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाºया ८६ हॉटेल व बारपैकी १३ हॉटेल व बार सील करण्याची कारवाई अग्निशमन विभागाने शनिवारी केली होती. त्यानंतर, सोमवारी पुन्हा शहरातील १३ आणि मंगळवारी १० हॉटेल, बार अग्निशमन दलाकडून सील करण्यात आले आहेत. त्यानुसार, तीन दिवसांत ३६ हॉटेल, बार, लाउंज सील केल्याचे पालिकेने स्पष्ट केले.कम्पोडिंग चार्जेस भरण्यावरून सुरू आहे वादअग्निशमन दलामार्फत कोणत्याही प्रकारच्या नव्या अटीशर्ती टाकण्यात आलेल्या नाहीत. परंतु, कम्पोडिंग चार्जेस आणि अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह चार्जेस भरण्याला या हॉटेल व्यावसायिकांचा विरोध असल्यानेच ते रद्द करण्यासाठी हा बंद पुकारल्याचे बोलले जात आहे.आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाचक अटी टाकलेल्या नाहीत. दोन महिन्यांपूर्वी ज्या अटीशर्ती मंजूर झाल्या, त्याच आजही आहेत. त्यामुळे नव्याने कोणत्याही अटीशर्ती टाकण्यात आलेल्या नाहीत.- शशिकांत काळे, मुख्य अग्निशमन अधिकारी, ठामपाबुधवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासमवेत दुपारी १२.३० वाजता चर्चा होणार असून त्यानंतर पुढील दिशा ठरवली जाणार आहे.- रत्नाकर शेट्टी, हॉटेल-बार असोसिएशनचे ज्येष्ठ पदाधिकारी

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रthaneठाणे