शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

बंदमुळे ठाणेकर राहिले उपाशी! ५०० हॉटेल व्यावसायिकांचा कारवाईविरुद्ध एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 06:56 IST

महापालिकेने नोटीस देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाºया ८६ हॉटेल व बारपैकी १३ हॉटेल व बार सील करण्याची कारवाई अग्निशमन विभागाने केली आहे. यानंतर, अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रासाला कंटाळून मंगळवारी ठाणे शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी दुपारी ४ वाजल्यापासून एक दिवसाचा बंद पुकारला.

ठाणे - महापालिकेने नोटीस देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाºया ८६ हॉटेल व बारपैकी १३ हॉटेल व बार सील करण्याची कारवाई अग्निशमन विभागाने केली आहे. यानंतर, अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रासाला कंटाळून मंगळवारी ठाणे शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी दुपारी ४ वाजल्यापासून एक दिवसाचा बंद पुकारला. यामुळे हॉटेलवर पोटभरणाºया ठाणेकरांचे अतोनात हाल झाले. आयुक्तांशी बुधवारी चर्चा केल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याचा निर्णयदेखील त्यांनी घेतला आहे.अग्निशमन दलाचा ना-हरकत दाखला नसलेल्या ठाणे शहरातील एकूण ४२६ हॉटेल, बार, लाउंज यांना यापूर्वी अग्निशमन दलाच्या वतीने नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी जवळपास ८० आस्थापनांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्याने ती हॉटेल नियमित करण्यात आली आहेत. तसेच २६० प्रकरणे शहर विकास विभागाकडे नियमित करण्याच्या कार्यवाहीसाठी सादर करण्यात आली आहेत. परंतु, नोटीस दिल्यानंतरही त्यावर काहीही कार्यवाही न केलेले एकूण ८६ हॉटेल, बार, लाउंज तीन दिवसांत सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी दिले होते. त्यानंतर, शनिवारी अग्निशमन विभागाने शहरातील तब्बल १३ हॉटेल सील केले होते. टप्प्याटप्प्याने उर्वरित हॉटेलही सील केले जाणार आहेत.परंतु, आता शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी एकत्रित येऊन महापालिकेच्या अग्निशमन विभागाविरोधात असहकार पुकारला आहे. त्यानुसार, मंगळवारी दुपारी अचानक ४ वाजल्यापासून त्यांनी बंद पुकारला. महाराष्टÑ अग्निशमन कायद्यांतर्गत आम्ही सर्व प्रकारच्या अटींचे पालन केले आहे. तसेच बी फॉर्मदेखील भरून दिला आहे. असे असतानादेखील अग्निशमन विभागामार्फत रोजच्या रोज नवनवीन अटी काढल्या जात आहेत. त्यामुळे त्यांचा हा त्रास असह्य झाल्यानेच हा बंद पुकारल्याची माहिती हॉटेल तथा बार असोसिएशनने दिली. अग्निशमन विभागाच्या या जाचक अटींमुळे आम्हाला आमचा व्यवसाय बंद करण्याची वेळ आल्याचेही मत या व्यावसायिकांनी व्यक्त केले.हॉटेल, बार सील करण्याची कारवाई सुरूचमहापालिकेच्या अग्निशमन दलाने नोटीस देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाºया ८६ हॉटेल व बारपैकी १३ हॉटेल व बार सील करण्याची कारवाई अग्निशमन विभागाने शनिवारी केली होती. त्यानंतर, सोमवारी पुन्हा शहरातील १३ आणि मंगळवारी १० हॉटेल, बार अग्निशमन दलाकडून सील करण्यात आले आहेत. त्यानुसार, तीन दिवसांत ३६ हॉटेल, बार, लाउंज सील केल्याचे पालिकेने स्पष्ट केले.कम्पोडिंग चार्जेस भरण्यावरून सुरू आहे वादअग्निशमन दलामार्फत कोणत्याही प्रकारच्या नव्या अटीशर्ती टाकण्यात आलेल्या नाहीत. परंतु, कम्पोडिंग चार्जेस आणि अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह चार्जेस भरण्याला या हॉटेल व्यावसायिकांचा विरोध असल्यानेच ते रद्द करण्यासाठी हा बंद पुकारल्याचे बोलले जात आहे.आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाचक अटी टाकलेल्या नाहीत. दोन महिन्यांपूर्वी ज्या अटीशर्ती मंजूर झाल्या, त्याच आजही आहेत. त्यामुळे नव्याने कोणत्याही अटीशर्ती टाकण्यात आलेल्या नाहीत.- शशिकांत काळे, मुख्य अग्निशमन अधिकारी, ठामपाबुधवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासमवेत दुपारी १२.३० वाजता चर्चा होणार असून त्यानंतर पुढील दिशा ठरवली जाणार आहे.- रत्नाकर शेट्टी, हॉटेल-बार असोसिएशनचे ज्येष्ठ पदाधिकारी

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रthaneठाणे