शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

धरणातील पाण्याच्या वार्षिक ४०० कोटींच्या उपकरास ठाणे जिल्हा परिषद ६५ वर्षांपासून मुकली!

By सुरेश लोखंडे | Updated: February 2, 2019 19:02 IST

महाराष्ट्र  जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१चे कलम ४६ नुसार पाणी पट्टीच्या प्रत्येक रूपयावर २० पैसे इतका स्थानिक उपकर ठाणे जिल्हा परिषदेला मिळणे कायदेशीर आहे. या जिल्ह्यात मुंबई महापालिकेचे व जलसिंचनचे सुमारे १९५४ पासून पाणी पुरवठा करणारे धरणे आहेत. एमजेपीचे आता पालघर जिल्ह्यातमध्ये असलेले साक्रे धरण सुमारे १९६९ पासूनचे आहेत. याच कालावधीतील एमआयडीसी व एमजेपीचे धरणे आहेत. या धरणांच्या पाण्यावरील स्थानिक उपकर वर्षाकाठी सुमारे ४०० कोटी जिल्हा परिषदेस मिळणे आहे.

ठळक मुद्देकेवळ भातसा धरणाच्या पाण्यापोटी ठाणे जिल्हा परिषदेला सुमारे ३० ते ४० लाख रूपये स्थानिक उपकर दिला जात आहेसुमारे ६५ वर्षांच्या कालावधीपासून हा स्थानिक उपकर अंदाजे २६ हजार कोटी पाणी पट्टीच्या प्रत्येक रूपयावर २० पैसे इतका स्थानिक उपकर

सुरेश लोखंडेठाणे : मुंबईच्या नगर, उपनगर या दोन्ही जिल्ह्यांसह ठाणे जिल्ह्यातील महापालिकाना पाणी पुरवठा ठाणे जिल्ह्यातील धरणांमधून सुरू आहे. या धरणांच्या पाण्यापोटी ठाणे जिल्हा परिषदेला दरवर्षी सुमारे ४०० कोटी रूपये स्थानिक उपक्रम मिळणे कायदेशीर बंधनकारक आहे. मात्र सुमारे ६५ वर्षांपासून या स्थानिक उपकरास जिल्हा परिषद मुकली आहे. तो प्राप्त करण्यासाठी आता किविलवाणे प्रयत्न सुरू झाले आहेत.महाराष्ट्र  जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१चे कलम ४६ नुसार पाणी पट्टीच्या प्रत्येक रूपयावर २० पैसे इतका स्थानिक उपकर ठाणे जिल्हा परिषदेला मिळणे कायदेशीर आहे. या जिल्ह्यात मुंबई महापालिकेचे व जलसिंचनचे सुमारे १९५४ पासून पाणी पुरवठा करणारे धरणे आहेत. एमजेपीचे आता पालघर जिल्ह्यातमध्ये असलेले साक्रे धरण सुमारे १९६९ पासूनचे आहेत. याच कालावधीतील एमआयडीसी व एमजेपीचे धरणे आहेत. या धरणांच्या पाण्यावरील स्थानिक उपकर वर्षाकाठी सुमारे ४०० कोटी जिल्हा परिषदेस मिळणे आहे. पण सुमारे ६५ वर्षांचा स्थानिक उपकर आजपर्यंतही ठाणे जिल्ह्यास मिळालेला नाही. या धरणातील पाण्याचा कर तत्कालीन लघूपाटबंधारे व आताच्या जलसिंचन विभागाकडून वसूल केल्या जात असल्याचा आरोपही जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून होत आहे. पण त्यावसुलीच्या एक रूपयातील २० पैसे प्रमाणेचा हिस्सा जिल्हा परिषदेला मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात मुंबई महानगरपालिकेचे तानसा, वैतरणा, मध्यवैतरणा धरणे आहेत. याप्रमाणेच लघूपाटबंधारे म्हणजे जलसिंचन विभागाचे भातसा, अप्पर वैतरणा, सूर्या, कवडास आणि धामणी हे धरणे आहेत. एमआयडीसीचे बारवी आणि महाराष्टÑ जीवन प्राधीकरण (एमजेपी) इत्यादी धरणे जिल्ह्यात आहेत. त्याव्दारे रोज सुमारे चार हजार दशलक्ष लिटर म्हणजे सुमारे ४० लाख लिटर पाणी पुरवठा महापालिकां, नगरपालिकां आणि एमआयडीसीला सूरू आहे. या धरणांपैकी केवळ भातसा धरणाच्या पाण्यापोटी ठाणे जिल्हा परिषदेला सुमारे ३० ते ४० लाख रूपये स्थानिक उपकर दिला जात आहे. उर्वरित धरणांचा मात्र आजपर्यंतही स्थानिक उपकर मिळालेला नाही. सुमारे ६५ वर्षांच्या कालावधीपासून हा स्थानिक उपकर अंदाजे २६ हजार कोटी असल्याचे बोलले जात आहे.कायद्यातील तरतुदीप्रमाणे जिल्हा परिषदेला सुमारे ६५ वर्षांपासूनच्या प्रदीर्घकाळाचा सुमारे २६ हजार कोटी रूपये मिळणे अपेक्षित आहे. या हक्काच्या रकमेसाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात जलसिंचन विभागाची बैठक घेतली जाणार आहे. मात्र अद्यापही त्याचा मूहुर्त निश्चित झालेला नाही. या आधीच्या जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी जुजबी प्रयत्न केले. मात्र ते अपयशी ठरले. आता युध्दपातळीवर सुरू केलेल्या प्रयत्नाना यश मिळण्याची आशा आहे. मात्र पालकमंत्र्यांनी आता गांभीर्याने घेऊन जिल्ह्यातील ग्रामीण जनतेच्या हक्काचा हा स्थानिक उपकर प्राप्तीची आशा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाWaterपाणीTaxकर