शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

ठाणे ठरवणार पदवीधर आमदार, मतदार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 4:33 AM

मागील निवडणुकीप्रमाणे यंदाच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाणे जिल्हाच आमदार ठरवणार आहे. नव्याने नोंदणी झालेल्या या मतदारसंघात यावेळी एक लाख सात हजार २६४ मतदार असून यातील सर्वाधिक मतदार ठाणे जिल्ह्यातील आहेत.

ठाणे  -  मागील निवडणुकीप्रमाणे यंदाच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाणे जिल्हाच आमदार ठरवणार आहे. नव्याने नोंदणी झालेल्या या मतदारसंघात यावेळी एक लाख सात हजार २६४ मतदार असून यातील सर्वाधिक मतदार ठाणे जिल्ह्यातील आहेत. ठाणे जिल्ह्यात ४५ हजार ८३४ मतदारांची नोंद झाली आहे. या निवडणुकीत तिरंगी लढत असून तिन्ही महत्त्वाचे उमेदवार हे ठाण्यातीलच आहेत, हेही या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे.कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चुरशीचे रंग भरू लागले आहेत. भाजपाचे निरंजन डावखरे, शिवसेनेचे संजय मोरे आणि राष्टÑवादीचे नजीब मुल्ला हे प्रमुख तीन उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीच्या प्रचारात भाजपाकडून दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, तर राष्टÑवादीतर्फे स्वत: शरद पवार रिंगणात उतरले असून ‘गद्दाराला धडा शिकवा’, अशी गर्जना त्यांनी केली आहे. त्यामुळे आता यापैकी कुठल्या नेत्याच्या पारड्यात यश, तर कोणाच्या पारड्यात अपयश टाकायचे, हे ठाणेकर मतदार ठरवणार आहेत.मागील निवडणुकीत या मतदारसंघात ९० हजारांच्या आसपास मतदार होते. त्यावेळेसही ठाणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या ३५ हजारांच्या आसपास होती. नव्याने मतदारनोंदणी झाली, त्यानुसार या मतदारसंघात आता एक लाख सात हजार २६४ मतदारांची नोंद झाली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या तब्बल ४५ हजार ८३४ आहे. त्याखालोखाल पालघर जिल्ह्यातील मतदारांची संख्या १६ हजार ९८२ एवढी आहे. त्यामुळे या ठिकाणी बविआची भूमिका निर्णायक ठरणार आहे. हितेंद्र ठाकूर कोणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील मतदारांची संख्या ठाण्याखालोखाल म्हणजे १९ हजार ९१८ एवढी आहे. याठिकाणी शेकापचा वरचष्मा असून त्यांनी राष्टÑवादीला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. रत्नागिरीत शिवसेनेचे वर्चस्व असून याठिकाणी मतदारांची संख्या १६ हजार २२२ एवढी आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांची संख्या पाच हजार ३०८ एवढी आहे. याठिकाणी नारायण राणे यांचा पगडा असून त्यांच्या स्वाभिमानी पक्षाने निरंजन डावखरे यांना पाठिंबा दिला आहे. तटकरे यांचे पुत्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवत असताना राणे यांचे समर्थन मिळवले होते. तसेच समर्थन आता राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना मिळेल, अशी अपेक्षा बाळगली होती. परंतु, त्यांची ही अपेक्षा फोल ठरली आहे.ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या निवडणुकांचा विचार केल्यास जिल्ह्यात शिवसेना तसेच भाजपाला समसमान यश लाभले आहे. काही ठिकाणी शिवसेना, तर काही ठिकाणी भाजपा वरचढ ठरली आहे.शहापूर तालुक्यात २ हजार ३४० मतदारभातसानगर : कोकण पदवीधर मतदार संघासाठी शहापूर तालुक्यात २ हजार ३४० मतदारांनी आपली नावे नोंदवली असून यामध्ये ७०२ महिला मतदारांचा समावेश आहे. यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले असले तरी शहापूर तालुक्यातील मतदार निर्णायक ठरणार आहेत. विद्यार्थी बेकारी भत्ता मिळत नाही, तालुक्यात कारखाने मोठ्या संख्येने असून तेथे स्थानिकांना आरक्षण मिळावे यासाठी कुणीही प्रयत्न करत नाही अशा येथील समस्या आहेत.भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी स्वाभिमानी पक्षाचे नेते खा. नारायण राणे यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली. ही विनंती राणे यांनी मान्य केल्याने तळकोकणातील राणे यांच्या पक्षाने नोंदवलेल्या पदवीधरांची मते डावखरे यांना मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. डावखरे यांच्याकरिता ही लढत अटीतटीची असून, मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकVidhan Parishadविधान परिषदMaharashtraमहाराष्ट्र