शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

लोकसहभागातूनच ठाणे स्मार्ट सिटी होणार : डॉ महेंद्र कल्याणकर यांनी मांडले मत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 13:12 IST

विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात स्मार्ट सिटीज : द रोड अहेड या विषयावर राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी उपस्थित होते. 

ठळक मुद्देलोकसहभागातूनच ठाणे स्मार्ट सिटी होईल - डॉ . महेंद्र कल्याणकरस्मार्ट सिटीज : द रोड अहेड या विषयावर राष्ट्रीय परिषदठाणे महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता  सुधीर गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

ठाणे : " लोकसहभागातूनच ठाणे स्मार्ट सिटी होईल " असे उद्गगार जिल्हाधिकारी डॉ . महेंद्र कल्याणकर यांनी काढले . विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात स्मार्ट सिटीज : द रोड अहेड या विषयावर राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी  ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर बोलत होते.  ठाणे महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता  सुधीर गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांनी स्मार्ट सीटीज वरील दोन दिवसीय परिषदेत चर्चिलेल्या शोध निबंधांवर प्रकाश टाकला . 

      समारोपाच्या भाषणात ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर म्हणाले की, ठाण्याला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी ठाण्यातील नागरीकांनी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मिळून एकदिलाने काम करावे लागेल.  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्मार्ट सिटी संदर्भात प्रकल्प हाती घेऊन काही महत्वाच्या सूचना प्रशासनाला दिल्या तर शहराचा विकास गतिशील होईल असेही ते म्हणाले.  स्मार्ट सिटी वर काम करणाऱ्या सर्वच अभ्यासकांनी, ठाण्यातील नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी या अभियानात हिरीरीने भाग घेऊन ठाण्याला सुंदर बनवता येईल असं ते म्हणाले. स्मार्ट ठाणे बनवण्यासाठी स्मार्ट सिटीझन घडवावे लागतील असा संदेश त्यांनी दिला. विद्या प्रसारक मंडळाने दूरदृष्टी दाखवत अत्यंत महत्वाच्या विषयावर ही परिषद भरवली हे कौतुकास्पद आहे असेही ते म्हणाले. ठाणे महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड यांनी "स्मार्ट ठाणे " या विषयावर सादरीकरण केले. ठाण्याच्या  भविष्यातील विकासा साठी शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली. राष्ट्रीय परिषदेत सहभागी झालेल्या संशोधकांनी यावेळी आपले मत व्यक्त केले. या परिषदेस संशोधक, विद्यार्थी व प्राध्यापक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा वेदवती परांजपे यांनी केले व परिषदेच्या समन्वयिका प्रा नीलम शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले .

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकeducationशैक्षणिक