शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

Thane: ठाणे जिल्ह्यातील साडेतेरा हजार ग्रामीण कुटुंबांना मिळाले स्वप्नांचे घर  

By सुरेश लोखंडे | Updated: March 15, 2024 19:48 IST

Thane News: ठाणे जिल्हा परिषदेच्या मार्फत केंद्र पुरस्कृत योजना व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेद्वारे आजपर्यंत १३ हजार ५३८ ग्रामीण कुटुंबियांना त्यांचे हक्काचे घर मिळाले आहे,असे ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- सुरेश लोखंडे ठाणे  - जिल्हा परिषदेच्या मार्फत केंद्र पुरस्कृत योजना व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेद्वारे आजपर्यंत १३ हजार ५३८ ग्रामीण कुटुंबियांना त्यांचे हक्काचे घर मिळाले आहे,असे ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यात पंतप्रधान आवास, रमाई, शबरी, आदिम, मोदी घरकुल योजनाच्या माध्यमातून आदिवासी, अनुसूचित जाती जमातीतील गोरगरीब, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आर्थिक, दुर्बल घटकांना पक्क्या घरासाठी अर्थसहाय्य दिले जाते. त्यामुळे ठाणे ग्रामीण भागातील १३ हजार ५३८ गोरगरीब कुटुंबियाना त्यांच्या स्वप्नाचे घर मिळवता आले आहे.

त्यासाठी केंद्र पुरस्कृत योजना व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांची यशस्वी अंमलबजावणी होत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे यांनी दिली. केंद्र पुरस्कृत घरकुल योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण अंतर्गत २०१६-१७ ते २०२१ -२२ यावर्षात न ऊ हजार ५३५ घरकुल ठाणे जिल्ह्यात मंजूर झाली होती . त्यापैकी आठ हजार ९४६ घरकुल पूर्ण करण्यात यश मिळाले असून ९३ टक्के काम पूर्ण झाले आहे. शिल्लक ५८९ घरकुल लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मार्फत करण्यात आले आहे.

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनthaneठाणे