शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

उलथापालथीचा केंद्रबिंदू असलेले ठाणेच कळीचा मुद्दा, CM पद ठाण्याकडे टिकून राहणार का? कमालीची उत्सुकता 

By संदीप प्रधान | Updated: October 16, 2024 10:28 IST

आता विधानसभा निवडणुकीत ठाण्यात शिंदेसेनेला मतदारांचा कौल कसा प्राप्त होतो, यावरच मुख्यमंत्रिपद ठाण्याकडे टिकून राहणार किंवा कसे, हे ठरणार आहे. त्यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीत ठाणे हाच कळीचा मुद्दा राहणार आहे.

ठाणे : महाराष्ट्रात अडीच वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय उलथापालथीचा केंद्रबिंदू ठाणे जिल्हा होता. एकनाथ शिंदे यांनी ४० हून अधिक आमदारांसह शिवसेनेत ‘उठाव’ केल्याने महाविकास आघाडी सत्तेतून बाहेर गेली व महायुतीची सत्ता स्थापन झाली. ठाण्याकडे मुख्यमंत्रिपद खेचून आणण्यात शिंदे यशस्वी ठरले. शिवसेनेला सत्ता दाखवणाऱ्या ठाण्यातील जवळपास सर्व आमदार शिंदे आपल्यासोबत घेऊन गेले. आता विधानसभा निवडणुकीत ठाण्यात शिंदेसेनेला मतदारांचा कौल कसा प्राप्त होतो, यावरच मुख्यमंत्रिपद ठाण्याकडे टिकून राहणार किंवा कसे, हे ठरणार आहे. त्यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीत ठाणे हाच कळीचा मुद्दा राहणार आहे.

जिल्ह्यात विधानसभेचे १८ मतदारसंघ असून मुंबई पाठोपाठ सर्वाधिक मतदारसंघ असलेला जिल्हा आहे. ठाणे (शहर) संजय केळकर (भाजप), कोपरी-पाचपाखाडी एकनाथ शिंदे (शिंदेसेना), ओवळा-माजिवडा प्रताप सरनाईक (शिंदेसेना), मुंब्रा-कळवा जितेंद्र आव्हाड (शरद पवार गट), मीरा भाईंदर गीता जैन (भाजप पुरस्कृत अपक्ष), डोंबिवली रवींद्र चव्हाण (भाजप), कल्याण पूर्व गणपत गायकवाड (भाजप), कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईर (शिंदेसेना), कल्याण ग्रामीण राजू पाटील (मनसे), उल्हासनगर कुमार आयलानी (भाजप), अंबरनाथ बालाजी किणीकर (शिंदेसेना), मुरबाड किसन कथोरे (भाजप), शहापूर दौलत दरोडा (अजित पवार गट), भिवंडी पूर्व रईस शेख (सपा), भिवंडी पश्चिम महेश चौघुले (भाजप), भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे (शिंदेसेना), ऐरोली गणेश नाईक (भाजप), बेलापूर मंदा म्हात्रे (भाजप) असे निवडणुकीत ठाणे जिल्ह्याचे चित्र आहे. स्वत: शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पाच आमदार शिंदेसेनेत गेले. ठाणे जिल्ह्याच्या राजकारणावर शिंदे यांची मजबूत पकड असल्याने शिंदे यांनी बंड केल्यावर त्यांचा विरोध पत्करून जिल्ह्यात राजकारण करणे अशक्य असल्याने सर्व आमदारांनी शिंदे यांची कास धरली.

मातब्बर आमदार सत्तेबाहेरजिल्ह्यात आठ आमदार हे भाजपचे आहेत. शिंदे यांच्या बंडानंतर संख्याबळात शिंदेसेनेपेक्षा दुप्पट असलेल्या भाजपची सत्ता आली. परंतु जिल्ह्यात भाजपचे इतके आमदार असूनही मंत्रिपद केवळ रवींद्र चव्हाण यांनाच मिळाले. 

संजय केळकर, किसन कथोरे, गणेश नाईक यांच्यासारख्या मातब्बर आमदारांना सत्तेबाहेर रहावे लागले. त्यामुळे सत्ता येऊनही भाजपला ठाणे जिल्ह्यात फारसा लाभ झाला नाही. 

सरकारच्या माध्यमातून शिंदे यांनी जिल्ह्यात आणलेला हजारो कोटींचा निधी हा मुख्यत्वे शिंदेसेनेच्या आमदारांना प्राप्त झाला. त्या तुलनेत भाजपच्या आमदारांना निधी मिळाला नाही.

स्वबळाचा नारा यंदा चालणार का?-     माजी खासदार कपिल पाटील व किसन कथोरे, गणेश नाईक व मंदा म्हात्रे अशा नेत्यांच्या वादंगामुळे भाजप पोखरला गेला आहे. लोकसभा निवडणुकीत ठाणे व कल्याण हे दोन्ही मतदारसंघ शिंदेसेनेनी राखले. मात्र पाटील-कथोरे वाद व अन्य कारणास्तव भिवंडी लोकसभा मतदारसंघ भाजपने गमावला.-     मनसेचा एकुलता एक आमदार राजू पाटील यांच्या रुपाने मागील वेळी विजयी झाला. स्वबळाचा नारा देणारे राज ठाकरे ठाणे जिल्ह्यात किती मतदारसंघात उमेदवार देणार व ते कुणाची मते खाणार, यावर येथील निकाल अवलंबून राहील.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाChief Ministerमुख्यमंत्री