शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

ठाणे स्थानक : जुन्या पुलांवरील ओढा जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 5:31 AM

ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व कल्याण दिशेकडील दोन्ही पूल अरुंद असून, प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

ठाणे : ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व कल्याण दिशेकडील दोन्ही पूल अरुंद असून, प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकातील अरुंद पुलावर झाली तशी चेंगराचेंगरी ठाणे रेल्वे स्थानकात होऊ शकते. जुने पूल रुंद करण्यापेक्षा सरकते जिने बसवून स्टेशन स्मार्ट करण्याचा दिखाऊपणा रेल्वे प्रशासनाने केला आहे.मंगळवारपासून सुरू झालेल्या १०० रेल्वे स्थानकांच्या सुरक्षा अॉडिटमध्ये ठाणे रेल्वे स्थानकाचाही समावेश केला आहे. ठाणे रेल्वे स्थानकात मध्यभागी काही वर्षांपूर्वी नवा पूल बांधल्यामुळे स्टेशनच्या पुढील व मागील बाजूस असलेल्या अरुंद पुलांवरील ताण काही अंशी कमी झाला. तरीही प्रवाशांची वाढती संख्या व पुढील किंवा मागील डब्यात बसून प्रवास करण्याकडे प्रवाशांचा असलेला कल यामुळे त्या जुन्या पुलांवरच चेंगराचेंगरीचे प्रकार होण्याची दाट शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या काही फलाटांची रचना हीदेखील प्रवाशांनी विशिष्ट पुलाच्या समोर थांबणाºया डब्यांमध्ये बसण्याचे एक प्रमुख कारण आहे. प्रवाशांचा ओढा ज्या पुलांकडे असतो त्यावर किंवा त्याच्या आजूबाजूला फेरीवाले, बुटपॉलिशवाले, फळ विक्रेते बसतात. त्यामुळे एकीकडे सकाळी व सायंकाळी प्रवाशांची गर्दी व त्यातच फेरीवाल्यांचा ठिय्या यामुळे अनेकदा पुलांवर गर्दी होते. ठाणे-वाशी-पनवेल ही लोकल सेवा सुरू झाल्याने प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे.नव्या पुलांच्या रचनेनुसार लोकल थांबणे गरजेचे!लोकलच्या डब्यांची संख्या वाढत्या प्रवाशांमुळे वाढू लागली. त्यानुसार फलाटांची लांबीही वाढली. पण, अजूनही ब्रिटिशकालीन रचनेनुसार, लोकल थांबवण्याच्या पद्धतीमुळे नव्या प्रशस्त पुलापेक्षा जुन्या पुलांकडे प्रवाशांचा ओढा पाहण्यास मिळतो. या रचनेत बदल करण्याची आणि प्रवासी जास्तीतजास्त नवीन प्रशस्त पुलाचा वापर कसा करतील याचाही विचार होणे आवश्यक आहे.ठाणे-वाशी आणि पनवेल या सेवेमुळे ठाण्यात गर्दी वाढली आहे. ९ आणि १० या क्रमांकांच्या फलाटांवरही इतर फलाटांप्रमाणे जुन्या पुलांचाच प्रामुख्याने प्रवासी वापर करताना दिसतात. त्यातच या फलाटांवरील पुलांना अद्यापही सरकते जिने उभारण्यात आले नाहीत. तसेच हे जिने उभारताना, त्या जिन्यांवरून दोनपेक्षा जास्त प्रवासी कसे जातील याचा विचार होणेही महत्त्वाचे आहे.महत्त्व वाढलेहार्बर रेल्वेमार्गे नवी मुंबई व त्यापुढे जाण्यासाठी प्रवाशांना कुर्ला स्थानक गाठावे लागत होते. आता ठाणे, मुलुंड, भांडुप, कल्याण, डोंबिवली व त्यापुढील प्रवासी ठाण्यातून गाड्या पकडतात. त्यामुळे महत्त्व वाढले आहे.

टॅग्स :Elphinstone Stampedeएलफिन्स्टन चेंगराचेंगरीMumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वे