शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

ठाण्यात शिवसेनेचाच बोलबाला, आघाडीची वाट खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 01:05 IST

ठाणे लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा शिवसेनेचे राजन विचारे यांनी विजय संपादित केला आहे.

- अजित मांडकेठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा शिवसेनेचे राजन विचारे यांनी विजय संपादित केला आहे. ठाणे विधानसभा क्षेत्रात विचारे यांच्या मतांमध्ये मागील लोकसभेच्या तुलनेत तब्बल ४० हजारांची वाढ झाल्याचे दिसून आले. तर, राष्टÑवादीच्या उमेदवाराच्या मतांमध्ये घट झाली आहे. विचारे यांना यंदा ठाणे विधानसभा क्षेत्रातून एक लाख ३० हजार ७६३ मते मिळाली आहेत. तर, राष्टÑवादीचे आनंद परांजपे यांना या मतदारसंघातून ४७ हजार ६५५ मते मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतांचा फायदा युतीच्या उमेदवाराला निश्चित होणार असून आघाडीच्या उमेदवाराला या मतदारसंघात तारेवरची कसरत करावी लागणार आहे.ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाणे विधानसभा क्षेत्र हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु, या बालेकिल्ल्यावर मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने कब्जा केला आहे. असे असले तरी लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे दोनही पक्ष युतीत लढल्याने त्याचा फायदा विचारे यांना झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपच्या १३ नगरसेवकांचे वर्चस्व आहे. तर, राष्टÑवादीचे अवघे चार नगरसेवक आहेत. त्यात काँग्रेसचा येथे सफाया झाला आहे. या मतदारसंघात काँग्रेस असून नसल्यासारखीच परिस्थिती असल्याचे मतमोजणीनंतर दिसून आले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादी, काँग्रेस आणि मनसेच्या उमेदवारांना मिळून या मतदारसंघातून ४८ हजार ५८४ मते मिळाली होती. आता लोकसभा निवडणुकीत त्यातही ९२९ मतांची घट झाल्याचे दिसून आले. परंतु, शिवसेनेच्या मतांमध्ये मात्र एक हजार ५२९ मतांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आघाडीसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. या निवडणुकीत ठाणे विधानसभा क्षेत्रात सुरुवातीला भाजपच्या नगरसेवकांनी विचारे यांना विरोध केला होता. परंतु, त्यानंतर त्यांचा हा विरोध मावळला आणि विचारे यांना या मतदारसंघातून निर्णायक मतांची आघाडी मिळाली. या मतदारसंघातून शिवसेना आणि भाजपने संघटितपणे काम केल्याचे दिसून आले. त्यामुळे हा संघटनात्मक आणि त्यातून आखलेल्या रणनीतीचा हा विजय असल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे राष्टÑवादी आधीच या मतदारसंघात कमकुवत असल्याचे दिसत होते. परंतु, मेट्रो, नवीन ठाणे स्टेशन, कचºयाचा मुद्दा आदींसह इतर स्थानिक मुद्यांना हात घालतानाच शिक्षणाच्या मुद्यालाही राष्टÑवादीने हात घातला.>शिवसेनेने मारली जोरदार मुसंडीदुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला ४,८८४ मते मिळाली. त्यामुळे त्याचा फारसा परिणाम या निवडणुकीत दिसून आला नाही.परंतु, ज्या पद्धतीने शिवसेनेने या मतदारसंघात मुसंडी मारली, त्यानुसार त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत नक्कीच दिसणार असून काँग्रेस, राष्टÑवादीला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार, हे नक्की.