शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली येथून बेपत्ता झालेल्या मुलीचा ठाणे पोलिसांनी घेतला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 00:07 IST

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकातील महिला पोलिसांनी आस्थेने चौकशी करुन कल्याणच्या मुरबाड रोडवरील नवज्योत ट्रस्ट या संस्थेतील १६ वर्षीय मुलीला तिच्या दिल्ली येथील आई वडीलांच्या नुकतेच ताब्यात दिले आहे. ठाणे पोलिसांच्या या कामगिरीबद्दल दिल्ली पोलिसांनीही कौतुक केले आहे.

ठळक मुद्देआई, वडील आणि सामाजिक संस्थेच्या दिले ताब्यातक्षुल्लक कारणावरून सोडले होते घर महिला पोलिसांनी केली आस्थेने चौकशी

ठाणे : दिल्लीतील मनियारी नरेला भागातील राजीव कॉलनी येथून वर्षभरापूर्वी बेपत्ता झालेल्या एका १६ वर्षीय मुलीचा छडा लावण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाला यश आले आहे. या मुलीची ओळख पटवल्यानंतर तिला मंगळवारी आईवडिलांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील हरविलेल्या तसेच अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलामुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अलीकडेच दिले होते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुºहाडे, उपनिरीक्षक कैलास सोनवणे तसेच महिला पोलीस शिपाई माधुरी जाधव, तेजश्री शेळके, वंदना पोटफोडे आणि नीलम पाचपुते यांच्या पथकाकडून अशा बेपत्ता मुलामुलींचा शोध घेण्याचे काम सुरू होते. यावेळी माधुरी जाधव आणि तेजश्री शेळके यांनी कल्याणच्या मुरबाड रोडवरील नवज्योत ट्रस्ट या संस्थेत जाऊन संचालकांकडे याबाबत चौकशी केली. दिल्ली येथील १६ वर्षीय मुलगी या संस्थेत दाखल असल्याची माहिती त्यांना मिळाली. सुरुवातीला या मुलीकडे चौकशी केल्यानंतर तिने कोणतीही माहिती दिली नाही. महिला पोलिसांनी तिची दोन, तीनवेळा भेट घेऊन तिला विश्वासात घेतले. तेव्हा जुलै २०१८ मध्ये दिल्लीच्या राजीव कॉलनी येथून घरातील कोणालाही काहीएक न सांगता निघून आल्याची कबुली तिने दिली. तिला सामाजिक कार्यकर्त्याने उल्हासनगरच्या बालकल्याण समितीच्या आदेशाने भिवंडीतील सनराइज हॅप्पीहोम बालसुधारगृहात जुलै २०१८ मध्ये दाखल केले होते. गेल्या सहा महिन्यांपासून तिला मुरबाडच्या नवज्योत ट्रस्ट येथे ठेवण्यात आले होते. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला असता, ९ जुलै २०१८ रोजी नरेला (दिल्ली) पोलीस ठाण्यात तिच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली. तिच्या आईवडिलांशीही संपर्क साधून ओळख पटवण्यात आली. त्यानंतर, १७ सप्टेंबर २०१९ रोजी उल्हासनगर बालकल्याण समितीच्या आदेशाने तिला तिचे आईवडील तसेच सामाजिक संस्थेच्या ताब्यात देण्यात आले. आईवडील आपल्यापेक्षा धाकट्या भावाला जास्त जीव लावतात, असा समज झाल्याने तिने घरातून निघून जाण्याचे पाऊल उचलल्याचेही तिने सांगितले. या तपासात महिला शिपाई माधुरी जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. गोपनीयतेच्या कारणास्तव या मुलीचे नाव जाहीर करण्यात आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस