शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ठाण्यातील बेपत्ता मुलाचा काही तासांमध्ये पोलिसांनी घेतला शोध : अपहरणकर्त्यास विठ्ठलवाडीतून अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: October 15, 2018 23:30 IST

फिरायला नेण्याच्या बहाण्याने ठाण्याच्या घोडबंदर रोड येथील एका १३ वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या देवानंद शर्मा या सुरक्षा रक्षकाला कासारवडवली पोलिसांनी विठ्ठलवाडी येथून अटक केली आहे. मुलाच्या सुखरुप सुटकेमुळे पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

ठळक मुद्देकासारवडवली पोलिसांची कामगिरीफिरायला नेण्याच्या बहाण्याने केले अपहरणपालकांनी मानले पोलिसांचे आभार

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : घोडबंदर रोड येथून अपहरण झालेल्या एका तेरावर्षीय मुलाचा अवघ्या सहा ते सात तासांमध्ये कासारवडवली पोलिसांनी शोध घेऊन अपहरणकर्त्या देवानंद शर्मा (४५) या सुरक्षा रक्षकाला सोमवारी पहाटेच्या सुमारास कल्याणच्या विठ्ठलवाडी भागातून अटक केली. त्याला दोन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.हा मुलगा रविवारी सकाळी घोडबंदर रोड येथील ‘जांगिड’ या इमारतीसमोरून सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खेळताना अचानक बेपत्ता झाला. दोन तास उलटूनही तो घरी न परतल्याने त्याच्या पालकांनी सर्वत्र शोध घेतला. अखेर, रात्री याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात त्याच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होत असतानाच त्याचा मोबाइल देवानंद शर्मा याच्याकडे लागल्याचे आढळले. त्याला दोन तासांत घेऊन येतो, असे शर्माने सांगितले. तो न आल्याने अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले आणि पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांनी सहायक पोलीस निरीक्षक कैलास टोकले, हवालदार विश्वनाथ दुर्वे, राजकुमार महापुरे, राजेंद्र चौधरी आणि विजय जाधव यांची पथके तयार केली. विठ्ठलवाडी परिसरात या पथकांनी रविवारी रात्री शोध घेतला. अनेक बांधकामांच्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर एका बंद खोलीतून देवानंदला या पथकांनी ताब्यात घेतले आणि त्याच्या ताब्यातून या मुलाची सुखरूप सुटकाही केली. या मुलाला आपण सहजच फिरण्यासाठी घेऊन गेलो होतो, पण येताना पैसे नसल्याने त्याला आणू शकलो नसल्याचा दावा त्याने पोलिसांकडे केला. देवानंद हा पूर्वी ठाण्यातील ‘जांगिड’ इमारतीमध्ये सुरक्षारक्षकाचे काम करत होता. त्यामुळेच त्याची या मुलाशी ओळख झाली होती. सकाळी त्याने त्याला वाघबीळ येथे फिरण्याच्या बहाण्याने नेले. पण वाघबीळला जाण्याऐवजी बसने तो ठाणे रेल्वेस्थानक येथे गेला. तिथून रेल्वेने त्याने विठ्ठलवाडी गाठले. तेथील एका बांधकामाच्या ठिकाणी मुलाला त्याने एका खोलीत डांबून ठेवले. मुलाने घरी फोन केल्यानंतर दोन तासांत घेऊन येतो, असे त्याने सांगितले. पण नंतर देवानंदने स्वत:चाही फोन बंद करून ठेवला. घरी फोन केल्यास ठार मारण्याची धमकीही त्याने मुलाला दिली. पोलिसांनी मुलाच्या मोबाइलच्या आधारावर विठ्ठलवाडी परिसरातून त्याची सुखरूप सुटका केल्याने त्याच्या पालकांनी पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण