शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

ठाणे-पालघरच्या २४ हजार शेतकऱ्यांना ७३ कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 2:38 AM

यंदाच्या खरीपातील पीककर्जासाठी १८० कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) आतापर्यंत ठाणे व पालघर जिल्ह्यातील सुमारे २४ हजार ३६३ शेतकºयांना ७२ कोटी ७८ लाख रूपयांचे पीककर्ज वाटप केले आहे.

ठाणे : यंदाच्या खरीपातील पीककर्जासाठी १८० कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) आतापर्यंत ठाणे व पालघर जिल्ह्यातील सुमारे २४ हजार ३६३ शेतकºयांना ७२ कोटी ७८ लाख रूपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. शेतकºयांनी या कर्जाचा लाभ मोठ्याप्रमाणात घ्यावा, यासाठी सुमारे नऊ दिवस दोन्ही जिल्ह्यात शेतकºयांचे मेळावे आयोजित करून जनजागृती केली जात आहे. यानुसार शहापूर तालुक्यातील किन्हवली येथे गुरूवारी पहिला मेळावा घेतल्याचे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले.ठाणे व पालघर जिल्ह्यात प्रत्येकी ९० कोटींचे पीककर्ज वाटप शेतकºयांना होणार आहे. यापैकी आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात ४३ कोटी २२ लाखांच्या पीककर्जाचा लाभ सुमारे १६ हजार ४६ शेतकºयांना मिळाला आहे. सुमारे ४८ टक्के कर्ज वाटप झालेल्या शेतकºयांमध्ये नियमित कर्ज भरणाºया नऊ हजार ३३२ शेतकºयांचा समावेश आहे. त्यांना १२ कोटी ८९ लाखांचे कर्ज मिळाले आहे. तर कर्जमाफी मिळालेल्या सहा हजार ७१४ शेतकºयांना ३० कोटी ३३ लाखांच्या कर्जाचा लाभ झाला आहे. याप्रमाणेच पालघर जिल्ह्यात तीन हजार ४४५ कर्जमाफी मिळालेल्या शेतकºयांना २० कोटी ६८ लाखांचे पीक कर्ज मिळाले आहे. तर नियमित कर्ज भरणाºया चार हजार ८७२ शेतकºयांना आठ कोटी ८८ लाखांचे पीक कर्ज वाटप केल्याचा दावा टीडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भगीरथ भोईर यांनी केला आहे.२९ जूनला वसईच्या शिरसाडफाटा येथील जैन मंदिर व पालघरच्या काँग्रेस भवन सभागृहात शेतकरी मेळावा आयोजिला आहे. तर ३० जूनला विक्रमगडचे श्री औसरकर सभागृह व डहाणू तालुक्यातील कासा येथील बँकेच्या सभागृहात मेळावा होणार आहे. यानंतर २ जुलैला मुरबाड बाजार समिती, ३ जुलैला भिवंडीच्या दुगाडफाटा येथील सत्संग सभागृह, ४ ला जव्हार - मोखाड्यासाठी जव्हारच्या बँक शाखा सभागृहात व ६ ला कल्याणच्या नालिंदीगांव भिसोळे येथे मेळावा आहे. याशिवाय ७ जुलैला तलासरीच्या आमगांव ग्रा.पं.मध्ये, ९ जुलैला अंबरनाथच्या बेलवली बँक शाखेत व ठाणेच्या कल्याण शीळफाटा दत्त मंदिर सभागृहात शेतकरी मेळावा आहे.