शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ठाणे, पालघरसह रायगडच्या जिल्हा रुग्णालयांचा आहारपुरवठा करणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 23:57 IST

जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी आहारपुरवठा करणा-या राजर्षी शाहू नागरी सेवा सह. संस्थेला मागील नऊ महिन्यांपासून आहारसेवा देयक मिळालेले नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

पंकज रोडेकर ठाणे : जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी आहारपुरवठा करणा-या राजर्षी शाहू नागरी सेवा सह. संस्थेला मागील नऊ महिन्यांपासून आहारसेवा देयक मिळालेले नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. ते १२ मार्च पूर्वी न मिळाल्यास संबंधित संस्थेने १२ मार्चपासून ठाणे, पालघर, रायगड या तिन्ही जिल्ह्यांतील रुग्णांना दिली जाणारी आहारसेवा बंद करण्याचा इशारा दिला आहे. ही अवस्था ठाणे, पालघर किंवा रायगड जिल्ह्यातील रुग्णालयाची नसून ती राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर, निधी उपलब्ध होत नसल्याने हे देयक देण्यास उशीर होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.राज्य आरोग्य भवनामार्फत गतवर्षी राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांतील रुग्णांना आहारपुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रिया पार पडली. यावेळी ३० संस्थांनी त्यात सहभाग घेतला होता. त्यातील ६ नागरी सेवा सहकारी संस्थांना राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये आहारपुरवठा करण्याबाबत ठेका हा दर निश्चित करून दिला आहे. त्यातचएका संस्थेला चार ते पाच जिल्ह्यांतील रुग्णालयांना आहारपुरवठा करण्याचा ठेका दिला आहे. या संस्थात्यात्या जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना नियमित आहारपुरवठा करीत आहेत. मात्र, जून २०१९ पासूनते फेब्रुवारी २०२० या नऊ महिन्यांपासून आहारपुरवठा संस्थांना देयकमिळाले नाही. त्यामुळे किराणा, दूधव भाजीपाला या व्यापाऱ्यांचेदेणे बाकी असल्यामुळे पुरवठा केव्हाही बंद होऊ शकतो. तसेच देयकाची रक्कम १२ मार्चपूर्वी न मिळाल्यावर रुग्णालयातील आहारपुरवठाबंद करण्यात येईल, असा इशारा संस्थेने उपसंचालक आरोग्यसेवामुंबई मंडळ, ठाणे आणिजिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय यांना निवेदनाद्वारेदिला आहे.>काय मिळते रुग्णांनारुग्णालयात दाखल होणाºया एका रुग्णाला दिवसातून सकाळी नाश्ता, चहा, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा आणि शेंगदाण्याचा लाडू तसेच रात्रीचे जेवण असा आहार दिला जातो. यासाठी ठेकेदाराला एक रुग्णाच्या मागे ११० रुपये मिळतात. तर, ठाणे जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांत ७५० ते ८०० रुग्ण असून त्यांच्यासाठी राजर्षी शाहू नागरी सेवा सहकारी संस्थाही आहार पुरविण्याचे काम करीत असून त्या संस्थेला नऊ महिन्यांपासून ६७ लाख ४६ हजार २५२ रुपये इतके देयक मिळलेले नाही.>निधी उपलब्ध नसल्याने मागील नऊ महिन्यांपासून आहारसेवा देयकाची रक्कम मिळालेली नाही. गेल्या वर्षी अशा प्रकारे पाच महिन्यांनंतर देयक मिळाले होते. त्यातच नऊ महिन्यांचे देयक मिळावे, यासाठी सोमवारी काही संस्थांच्या अध्यक्षांनी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ते लवकरच मिळेल, असे आश्वासन दिले आहे.- जनार्दन चांदणे, अध्यक्ष, राजर्षी शाहू नागरी सेवा सह. संस्था मर्यादित, ठाणे व पालघर>आहार देयकांबाबत आरोग्य विभागाला लेखी माहिती दिली आहे. हे प्रकरण शासनस्तरावर आहे. तसेच संबंधित संस्थेने आहारसेवा बंद करू नये, असेही सांगितले आहे.- डॉ. गौरी राठोड, उपसंचालक,आरोग्यसेवा, मुंबई मंडळ, ठाणे