शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपा सरकारविरोधात मूक धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 14:45 IST

महात्मा गांधींच्या नावाने स्वच्छता अभियान राबवणारे हे भाजपा सरकारचे धोरण गांधीतत्त्वांशी प्रतारणा करीत आहे, असा आरोप करीत ठाणे शहरात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली मूक धरणे आंदोलनं करण्यात आले. 

ठाणे -  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे १५० वे जयंती वर्ष सुरू झाले आहे. मात्र या वर्षातच भाजपा सरकारकडून गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि शांततेच्या तत्वांना हरताळ फसला जात आहे. या देशात सध्या अराजकता माजली आहे. सदृढ लोकशाहीचे स्वप्न महात्मा गांधींनी पाहिले  होते. मात्र भाजपाचे सरकार या देशात अप्रत्यक्ष हुकूमशाही लादत आहे. महात्मा गांधींच्या नावाने स्वच्छता अभियान राबवणारे हे भाजपा सरकारचे धोरण गांधीतत्त्वांशी प्रतारणा करीत आहे, असा आरोप करीत  ठाणे शहरात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली मूक धरणे आंदोलनं करण्यात आले. 

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते धरणे आंदोलनास बसले. या कार्यकर्त्यांनी आपल्या तोंडाला काळ्या फिती लावल्या होत्या. तसेच राफेल करारामध्ये झालेला भ्रष्टाचार; एच.ए.एल. कंपनीला राफेल बनवण्याची क्षमता नाही या असत्याची मांडणी, सनातन या संस्थेवर बंदी न घालून हिंसेला संधी देणे, देशातील संविधानाचे दहन करणाऱ्यांना अभय देऊन अशांती निर्माण करणे आदींच्या माध्यमातून गांधींच्या सत्य -अहिंसा आणि शांतता या तत्वांना हरताळ फसला जात आहे. असे फलक या ठिकाणी लावण्यात आले होते. तसेच ५६ इंचाची छाती असल्याचे सांगून सत्ता मिळवलेल्यांनी शेतकरी, कामगार, कष्टकरी, दलित , आदिवासी, मुस्लिम, धनगर आदींच्या विरोधात मोहीम राबवली असल्याचा आरोप करून गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर या सरकारचा निषेध  करण्यात आला. 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMahatma Gandhiमहात्मा गांधी