शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपा सरकारविरोधात मूक धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 14:45 IST

महात्मा गांधींच्या नावाने स्वच्छता अभियान राबवणारे हे भाजपा सरकारचे धोरण गांधीतत्त्वांशी प्रतारणा करीत आहे, असा आरोप करीत ठाणे शहरात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली मूक धरणे आंदोलनं करण्यात आले. 

ठाणे -  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे १५० वे जयंती वर्ष सुरू झाले आहे. मात्र या वर्षातच भाजपा सरकारकडून गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि शांततेच्या तत्वांना हरताळ फसला जात आहे. या देशात सध्या अराजकता माजली आहे. सदृढ लोकशाहीचे स्वप्न महात्मा गांधींनी पाहिले  होते. मात्र भाजपाचे सरकार या देशात अप्रत्यक्ष हुकूमशाही लादत आहे. महात्मा गांधींच्या नावाने स्वच्छता अभियान राबवणारे हे भाजपा सरकारचे धोरण गांधीतत्त्वांशी प्रतारणा करीत आहे, असा आरोप करीत  ठाणे शहरात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली मूक धरणे आंदोलनं करण्यात आले. 

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते धरणे आंदोलनास बसले. या कार्यकर्त्यांनी आपल्या तोंडाला काळ्या फिती लावल्या होत्या. तसेच राफेल करारामध्ये झालेला भ्रष्टाचार; एच.ए.एल. कंपनीला राफेल बनवण्याची क्षमता नाही या असत्याची मांडणी, सनातन या संस्थेवर बंदी न घालून हिंसेला संधी देणे, देशातील संविधानाचे दहन करणाऱ्यांना अभय देऊन अशांती निर्माण करणे आदींच्या माध्यमातून गांधींच्या सत्य -अहिंसा आणि शांतता या तत्वांना हरताळ फसला जात आहे. असे फलक या ठिकाणी लावण्यात आले होते. तसेच ५६ इंचाची छाती असल्याचे सांगून सत्ता मिळवलेल्यांनी शेतकरी, कामगार, कष्टकरी, दलित , आदिवासी, मुस्लिम, धनगर आदींच्या विरोधात मोहीम राबवली असल्याचा आरोप करून गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर या सरकारचा निषेध  करण्यात आला. 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMahatma Gandhiमहात्मा गांधी