शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

ठाणे महापालिका उभारणार शौचालयांवर मोबाइल टॉवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:24 AM

ठाणे : शहरात शौचालयांची उभारणी करूनही त्यांची निगा देखभाल राखली जात नसल्यामुळे पालिकेला नेहमीच टीकेचे धनी व्हावे लागत आहे. ...

ठाणे : शहरात शौचालयांची उभारणी करूनही त्यांची निगा देखभाल राखली जात नसल्यामुळे पालिकेला नेहमीच टीकेचे धनी व्हावे लागत आहे. परंतु, आता केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाकरिता शहरातील शौचालयांवर मोबाइल टॉवर बसवून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शौचालयांच्या दुरु स्तीचा खर्च वापर शुल्कातून केला तर महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत संपूर्ण ३१३ गुण प्राप्त होऊ शकतात. मात्र, वापर शुल्क भरण्यास नागरिकांचा विरोध असल्यामुळे प्रशासनाने मोबाइल टॉवरची योजना आणली आहे.शनिवारी होणाºया महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. महापालिका हद्दीत २०११ च्या जनगणनेनुसार ११८४३ कुटुंबे उघड्यावर शौचास जात असल्याचा अहवालप्राप्त झाला होता. त्यानंतर आॅगस्ट २०१५ मध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरात ६९९८ कुटुंबे उघड्यावर शौचास जात असल्याची बाब पुढे आली होती. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी ८ हजारपेक्षा जास्त वैयक्तिक शौचालये प्रशासनाने बांधून दिली आहेत. परंतु, त्यांची देखभाल व्यवस्थित नसल्याने आणि नागरिकांकडूनही त्यांची काळजी घेतली जात नसल्याने पालिकेने हा निर्णय घेतला. यातून शौचालयांच्या दुरु स्ती व देखभालीवरील खर्च वापर शुल्कामधून वसूल करता येणे शक्य असून महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत संपूर्ण ३१३ गुण मिळू शकतात.