शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

ठाणे पालिकेने घातली ‘रानवाटां’वर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 3:19 AM

ठाण्यातील रानवाटा या संस्थेच्या कार्यक्रमांवर महापालिकेने बंदी घातली आहे. या संस्थेच्या पुढील कार्यक्रमांच्या सर्व तारखा अडवून ठेवल्या असून ठाणे कलाभवनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे पत्र महापालिकेने माझ्या नावाने धाडले असल्याचे रानवाटा संस्थेचे संस्थापक स्वप्नील पवार यांनी सांगितले.

ठाणे : ठाण्यातील रानवाटा या संस्थेच्या कार्यक्रमांवर महापालिकेने बंदी घातली आहे. या संस्थेच्या पुढील कार्यक्रमांच्या सर्व तारखा अडवून ठेवल्या असून ठाणे कलाभवनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे पत्र महापालिकेने माझ्या नावाने धाडले असल्याचे रानवाटा संस्थेचे संस्थापक स्वप्नील पवार यांनी सांगितले. मात्र, अशा प्रकारची कोणतीही बंदी घातली नसून या तक्रारींचे पत्र कलाभवनचे काम पाहणाºया तेथील कर्मचाºयाने काढून त्यावर मी फक्त सही केल्याचे स्पष्टीकरण कलाभवनाच्या व्यवस्थापकाने ‘लोकमत’ला दिले.रानवाटा ही संस्था छायाचित्रकारांशी जोडली गेली आहे. हौशी छायाचित्रकारांना व्यासपीठ मिळावे, यासाठी या संस्थेच्या माध्यमातून छायाचित्र प्रदर्शने आयोजित केली जातात. महाराष्ट्रभरात ख्याती मिळवलेल्या या संस्थेने ठाणे कलाभवनात गेली आठ वर्षे १६ प्रदर्शने आतापर्यंत भरवली आहेत. ठाणे महापालिकेने रानवाटाचे पवार यांच्या नावाने त्यांच्याविरोधातील तक्रारींचे पत्र मंगळवारी त्यांना दिले. त्यात ठाणे कलाभवनात ९ व १० डिसेंबर रोजी या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या तयारीसाठी ठाणे कलाभवनाची कोणतीही परवानगी न घेता ७ डिसेंबर रोजी पहिल्या मजल्यावरील मासुंदा कार्यशाळेचा वापर केला. कार्यशाळेत चित्रप्रदर्शनाची तयारी करत असताना गम सांडून फ्लोअरिंग खराब केले. वेळेचा दुरुपयोग केल्याने दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. १० डिसेंबर रोजी रात्री १२.३० पर्यंत कलाभवनाचा वापर केल्याचे आरक्षक नोंदीवरून दिसून आले. प्रदर्शन संपल्यावर गॅलरीतून चित्र काढून घेतले आणि बोर्ड तसेच ठेवले, अशा तक्रारी पालिकेने या पत्रात केल्या आहेत.मात्र, या तक्रारी चुकीच्या आणि खोट्या असल्याचे पवार यांनी सांगितले. आम्ही गेली आठ वर्षे प्रदर्शन भरवत असताना या चुका करू का, असा सवाल त्यांनी केला आहे. २०१८ मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या सर्व तारखा पालिकेने अडवून ठेवल्या आहेत. त्यासंदर्भात केलेले अर्ज अडवले आहेत. आमच्या कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. मुळात आम्ही दिलेल्या कार्यक्रमांच्या वेळा पाळतो. साफसफाई करून आमचा माणूस रात्री उशिरा बाहेर पडला होता, त्यामुळे आम्ही उशिरापर्यंत कोणताही कार्यक्रम सुरू ठेवला नव्हता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.याबाबत, व्यवस्थापक दत्ता गोंधळे यांच्याशी संपर्क साधला असता आधी त्यांनी भरपूर वाद घातला. नंतर रानवाटा ही संस्था फ्रेम टाकून देते, कार्यक्रम वेळेत संपवत नाही. कोणत्याही वस्तू उचलत नाही, असे सुरुवातीला सांगितले. त्याबाबत स्पष्टीकरण विचारल्यावर कलाभवनमध्ये असलेले कर्मचारी पगारे यांनी या तक्रारींचे पत्र काढले आणि त्यावर मी फक्त सही केली. मी जाऊन पाहणी केली नाही. परंतु, आम्ही त्यांच्या कार्यक्रमांवर कोणतीही बंदी घातली नाही. कार्यक्रमांच्या तारखा अडवलेल्या नाहीत, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.>सोशल मीडियावर संताप व्यक्तठाणे महापालिकेने दिलेल्या या तक्रारींच्या पत्राविरोधात सोशल मिडियावर संताप व्यक्त होत आहे. जाणूनबुजून हे करण्यात आले असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.प्रत्येक आर्ट गॅलरीमध्ये मदतनीस असतात. ठाणे कलाभवनमध्ये गेल्या तीन वर्षांपासून हे पद नाही. त्यामुळे कलाकाराला प्रदर्शनाची तयारी करताना मदतनीस नसल्याने कलाकारांचा प्रचंड गोंधळ उडत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

टॅग्स :thaneठाणे