शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेकडून रोज तब्बल ४९ एमएलडी पाण्याची नासाडी, लोकसंख्येच्या मानाने जास्तीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 18:04 IST

ठाणे महापालिकेकडून प्रतीदिन तब्बल ४९ दशलक्ष लीटर पाण्याची नासाडी होत असल्याची माहिती समोर आली आहे. ही नासाडी टाळण्यासाठी पालिका आता काय उपाय योजना करणार हे पाहणे महत्वाचे ठरले आहे.

ठळक मुद्देशहराला ४८५ दशलक्ष लीटर पाणी पुरवठाअनेक जलवाहीन्या झाल्या जीर्ण

ठाणे - उन्हाळा सुरु झाला की जिल्ह्यासह ठाणे शहरालासुध्दा पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. परंतु ठाणे शहराला जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत लोकसंख्येच्या मानाने जास्तीचा पाणी पुरवठा होत आहे. असे असतांना शहरातील अनेक भागांना आजही पाण्यासाठी पालिकेकडे झगडावे लागत आहे. परंतु मुबलक पाणी असतांना सुध्दा केवळ नियोजनाच्या अभावामुळे महापालिकेकडून प्रतीदिन ४९ दशलक्ष लीटर पाण्याची नासाडी होत असल्याची माहिती समोर आली आहे.           ठाणे शहराची आजची लोकसंख्या ही २४ लाखांच्या घरात आहे. शहरातील सध्याच्या लोकसंख्येला ४३६ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची गरज असताना शहरात त्यापेक्षा जास्त म्हणजे ४८५ एमएलडी पाण्याचा पुरवठा होत आहे. परंतु असे असतांना सुध्दा सोमवारी ठाण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवसेनेच्या एका नगरसेवकाच्या कार्यालयावर पाणी पुरवठा होत नाही, म्हणून महिलांनी तक्रार केल्याची बाब समोर आली आहे. केवळ याच भागात नाही तर शहरातील इतर भागातही अनेक वेळा कमी दाबाने किंवा एक दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. सेंट्रल पिब्लक हेल्थ अ‍ॅण्ड एन्व्हायरमेंट इंजिनीअरींग आॅर्गनायझेशनच्या नामांकनानुसार प्रत्येक व्यक्तीची दैनंदिन पाण्याची गरज ही १५० लीटर इतकी आहे. ठाण्याची सध्याची लोकसंख्या अंदाजे २४ लाख २१ हजार इतकी असून या लोकसंख्येची पाण्याची गरज ही ४३६ एमएलडी आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त पाणी पुरवठा शहराला होत असूनही अनेक ठिकाणी पाणी टंचाई भेडसावत आहे. २०१५ व २०१६ साली ठाणे शहराला रोज ४८० एमएलडी पाणी पुरवठा होत होता. त्या वर्षी अनुक्र मे पाण्याची गरज ही ४०६ आणि ४२१ एमएलडी इतकी होती. तर, २०१५ साली २१ लाख ७२ हजार लोकसंख्येसाठी ३९० एमएलडी पाण्याची गरज असताना ४६० एमएलडी पाणी पुरवठा होत होता अशी माहिती हाती पालिका सुत्रांनी दिली आहे. ठाणे महापालिकेला एमआयडीसी,स्टेम, मुंबई महापालिका आणि स्वत:च्या योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, शहरांत पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक जलवाहिन्या या जीर्ण झाल्या असून जमिनीखाली मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. तर शहरातील काही ठिकाणी मीटरच्या माध्यमातुन बीलांचे वाटप होत आहे. तर काही ठिकाणी ठोक अशी बिले दिली जात आहेत. त्यामुळे कितीही पाणी वापर केला गेला याचा योग्य तो अंदाज बांधण्यात येत नाही. एकूणच ही नासाडी टाळण्यासाठी पालिका काय उपाय योजना करणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाWaterपाणी