शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ठाणे महापालिकेकडून रोज तब्बल ४९ एमएलडी पाण्याची नासाडी, लोकसंख्येच्या मानाने जास्तीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 18:04 IST

ठाणे महापालिकेकडून प्रतीदिन तब्बल ४९ दशलक्ष लीटर पाण्याची नासाडी होत असल्याची माहिती समोर आली आहे. ही नासाडी टाळण्यासाठी पालिका आता काय उपाय योजना करणार हे पाहणे महत्वाचे ठरले आहे.

ठळक मुद्देशहराला ४८५ दशलक्ष लीटर पाणी पुरवठाअनेक जलवाहीन्या झाल्या जीर्ण

ठाणे - उन्हाळा सुरु झाला की जिल्ह्यासह ठाणे शहरालासुध्दा पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. परंतु ठाणे शहराला जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत लोकसंख्येच्या मानाने जास्तीचा पाणी पुरवठा होत आहे. असे असतांना शहरातील अनेक भागांना आजही पाण्यासाठी पालिकेकडे झगडावे लागत आहे. परंतु मुबलक पाणी असतांना सुध्दा केवळ नियोजनाच्या अभावामुळे महापालिकेकडून प्रतीदिन ४९ दशलक्ष लीटर पाण्याची नासाडी होत असल्याची माहिती समोर आली आहे.           ठाणे शहराची आजची लोकसंख्या ही २४ लाखांच्या घरात आहे. शहरातील सध्याच्या लोकसंख्येला ४३६ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची गरज असताना शहरात त्यापेक्षा जास्त म्हणजे ४८५ एमएलडी पाण्याचा पुरवठा होत आहे. परंतु असे असतांना सुध्दा सोमवारी ठाण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवसेनेच्या एका नगरसेवकाच्या कार्यालयावर पाणी पुरवठा होत नाही, म्हणून महिलांनी तक्रार केल्याची बाब समोर आली आहे. केवळ याच भागात नाही तर शहरातील इतर भागातही अनेक वेळा कमी दाबाने किंवा एक दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. सेंट्रल पिब्लक हेल्थ अ‍ॅण्ड एन्व्हायरमेंट इंजिनीअरींग आॅर्गनायझेशनच्या नामांकनानुसार प्रत्येक व्यक्तीची दैनंदिन पाण्याची गरज ही १५० लीटर इतकी आहे. ठाण्याची सध्याची लोकसंख्या अंदाजे २४ लाख २१ हजार इतकी असून या लोकसंख्येची पाण्याची गरज ही ४३६ एमएलडी आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त पाणी पुरवठा शहराला होत असूनही अनेक ठिकाणी पाणी टंचाई भेडसावत आहे. २०१५ व २०१६ साली ठाणे शहराला रोज ४८० एमएलडी पाणी पुरवठा होत होता. त्या वर्षी अनुक्र मे पाण्याची गरज ही ४०६ आणि ४२१ एमएलडी इतकी होती. तर, २०१५ साली २१ लाख ७२ हजार लोकसंख्येसाठी ३९० एमएलडी पाण्याची गरज असताना ४६० एमएलडी पाणी पुरवठा होत होता अशी माहिती हाती पालिका सुत्रांनी दिली आहे. ठाणे महापालिकेला एमआयडीसी,स्टेम, मुंबई महापालिका आणि स्वत:च्या योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, शहरांत पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक जलवाहिन्या या जीर्ण झाल्या असून जमिनीखाली मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. तर शहरातील काही ठिकाणी मीटरच्या माध्यमातुन बीलांचे वाटप होत आहे. तर काही ठिकाणी ठोक अशी बिले दिली जात आहेत. त्यामुळे कितीही पाणी वापर केला गेला याचा योग्य तो अंदाज बांधण्यात येत नाही. एकूणच ही नासाडी टाळण्यासाठी पालिका काय उपाय योजना करणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाWaterपाणी