शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

ठाणे महापालिकेकडून रोज तब्बल ४९ एमएलडी पाण्याची नासाडी, लोकसंख्येच्या मानाने जास्तीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 18:04 IST

ठाणे महापालिकेकडून प्रतीदिन तब्बल ४९ दशलक्ष लीटर पाण्याची नासाडी होत असल्याची माहिती समोर आली आहे. ही नासाडी टाळण्यासाठी पालिका आता काय उपाय योजना करणार हे पाहणे महत्वाचे ठरले आहे.

ठळक मुद्देशहराला ४८५ दशलक्ष लीटर पाणी पुरवठाअनेक जलवाहीन्या झाल्या जीर्ण

ठाणे - उन्हाळा सुरु झाला की जिल्ह्यासह ठाणे शहरालासुध्दा पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. परंतु ठाणे शहराला जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत लोकसंख्येच्या मानाने जास्तीचा पाणी पुरवठा होत आहे. असे असतांना शहरातील अनेक भागांना आजही पाण्यासाठी पालिकेकडे झगडावे लागत आहे. परंतु मुबलक पाणी असतांना सुध्दा केवळ नियोजनाच्या अभावामुळे महापालिकेकडून प्रतीदिन ४९ दशलक्ष लीटर पाण्याची नासाडी होत असल्याची माहिती समोर आली आहे.           ठाणे शहराची आजची लोकसंख्या ही २४ लाखांच्या घरात आहे. शहरातील सध्याच्या लोकसंख्येला ४३६ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची गरज असताना शहरात त्यापेक्षा जास्त म्हणजे ४८५ एमएलडी पाण्याचा पुरवठा होत आहे. परंतु असे असतांना सुध्दा सोमवारी ठाण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवसेनेच्या एका नगरसेवकाच्या कार्यालयावर पाणी पुरवठा होत नाही, म्हणून महिलांनी तक्रार केल्याची बाब समोर आली आहे. केवळ याच भागात नाही तर शहरातील इतर भागातही अनेक वेळा कमी दाबाने किंवा एक दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. सेंट्रल पिब्लक हेल्थ अ‍ॅण्ड एन्व्हायरमेंट इंजिनीअरींग आॅर्गनायझेशनच्या नामांकनानुसार प्रत्येक व्यक्तीची दैनंदिन पाण्याची गरज ही १५० लीटर इतकी आहे. ठाण्याची सध्याची लोकसंख्या अंदाजे २४ लाख २१ हजार इतकी असून या लोकसंख्येची पाण्याची गरज ही ४३६ एमएलडी आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त पाणी पुरवठा शहराला होत असूनही अनेक ठिकाणी पाणी टंचाई भेडसावत आहे. २०१५ व २०१६ साली ठाणे शहराला रोज ४८० एमएलडी पाणी पुरवठा होत होता. त्या वर्षी अनुक्र मे पाण्याची गरज ही ४०६ आणि ४२१ एमएलडी इतकी होती. तर, २०१५ साली २१ लाख ७२ हजार लोकसंख्येसाठी ३९० एमएलडी पाण्याची गरज असताना ४६० एमएलडी पाणी पुरवठा होत होता अशी माहिती हाती पालिका सुत्रांनी दिली आहे. ठाणे महापालिकेला एमआयडीसी,स्टेम, मुंबई महापालिका आणि स्वत:च्या योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, शहरांत पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक जलवाहिन्या या जीर्ण झाल्या असून जमिनीखाली मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. तर शहरातील काही ठिकाणी मीटरच्या माध्यमातुन बीलांचे वाटप होत आहे. तर काही ठिकाणी ठोक अशी बिले दिली जात आहेत. त्यामुळे कितीही पाणी वापर केला गेला याचा योग्य तो अंदाज बांधण्यात येत नाही. एकूणच ही नासाडी टाळण्यासाठी पालिका काय उपाय योजना करणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाWaterपाणी