शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
5
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
6
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
7
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
9
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
10
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
11
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
12
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
13
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
14
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
15
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
16
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
17
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
18
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
19
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
20
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 

ठाणे महापालिका : वाढीव १० एमएलडी पाण्यावरून भाजप-सेनेत श्रेयवादाची लढाई  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 23:42 IST

Thane Municipal Corporation: ठाणेकरांना स्टेमकडून मिळणारे वाढीव १० एमएलडी पाणी केवळ घोडबंदरलाच मिळणार नसून ते संपूर्ण ठाण्यासाठी असल्याचा दावा महापौर नरेश म्हस्के यांनी केला.

ठाणे : ठाणेकरांना स्टेमकडून मिळणारे वाढीव १० एमएलडी पाणी केवळ घोडबंदरलाच मिळणार नसून ते संपूर्ण ठाण्यासाठी असल्याचा दावा महापौर नरेश म्हस्के यांनी केला. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये पाण्याच्या मुद्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. कारण, भाजप नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी ते घोडबंदरलाच मिळणार असल्याचा दावा केला हाेता.महापौरांच्या उपस्थितीत बुधवारी स्टेमच्या अधिकाऱ्यांबरोबर ठाण्याला वाढीव १० एमएलडी पाणी मिळावे, यासाठीच्या बैठकीत ते तीन दिवसांत उपलब्ध करून द्यावे, असे आदेश त्यांनी दिले होते. त्यानंतर, गुरुवारी पुन्हा स्टेमच्या अधिकाऱ्यांनी महापौरांंची त्यांच्या दालनात भेट घेतली. या भेटीतही दोन दिवसांत वाढीव पाणी मिळाले नाही, तर जेसीबी लावून खेचून आणू, असा सज्जड दमच दिला. त्यामुळे ठाणेकरांना लवकरच हे पाणी मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले.दरम्यान, गुरुवारी डुंबरे यांनी हे वाढीव पाणी घोडबंदरला मिळणार असल्याचा दावा करून आपणच सतत पाठपुरावा केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु, या मुद्यावरून महापौरांना छेडले असता केवळ घोडबंदरसाठी हे पाणी नसून ते संपूर्ण ठाणेकरांसाठी मिळणार असल्याचा दावा करून उगाचचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपवाल्यांनी करू नये, असा टोलाही लगावला. केवळ पत्रकबाजी करून, निवेदन देऊन ही कामे होत नसून त्यासाठी बैठकीला हजर राहून चर्चादेखील करावी लागते, असे खडेबोलही सुनावले. दुसऱ्यांचे श्रेय घेण्याची सवयच भाजपवाल्यांना लागली असल्याने त्यांना इतर प्रश्नांशी काहीही देणेघेणे नसल्याचेही महापौर म्हणाले. आता पाण्याच्या मुद्यावरून ठाण्यात पुन्हा सेना विरुद्ध भाजप अशी श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा