शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

ठाणे महापालिकेचे आयुक्त अहंकारी - अबु आझमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 4:13 PM

ठाणे महापालिका आयुक्त हे अहंकारी असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी केला आहे. ते मुंब्य्रातील समस्यांचे निवेदन देण्यासाठी ठाणे महापालिकेत आले होते.

ठळक मुद्देस्थानिक आमदार समस्या सोडविण्यात अपयशीमनसे मारामारी करणारा  पक्ष

ठाणे - एखादा आमदार ज्यावेळेस आयुक्तांना निवेदन देतो, त्यावेळेस त्यांनी त्याचा सन्मान करीत उभे राहून ते स्विकारणे अपेक्षित असते. परंतु ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तसे काहीच केले नाही, ते एक अहंकारी आयुक्त असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी केला. या प्रकारचा येत्या अधिवेशनात जाब विचारला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.                                मुंब्य्रातील विविध समस्यांसंदर्भात निवेदन देण्यासाठी आझमी हे ठाणे महापालिकेत आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेण्यासाठी आले होते. परंतु त्यांनी आलेल्या अनुभवानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी थेट आयुक्तांवर निषाना साधला. कोणताही आमदार आयुक्तांना भेटण्यासाठी आल्यानंतर त्यांनी त्या आमदाराचा सन्मान करणे गरजेचे आहे, आलेल्या आमदाराला दारापर्यंत सोडले पाहिजे, परंतु आयुक्तांनी साधे म्हणने देखील व्यवस्थित ऐकूण घेतले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंब्य्रातील ऊर्द शाळांमध्ये पटसंख्या जास्त असून, विद्यार्थ्यांसाठी शौचालय नसून त्यांना दरवाजे देखील नाही, इमारतींची अवस्था दयनीय आहे. ही माहिती त्यांना दिली असता मी काय करु असे उलट उत्तर आयुक्तांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले. वास्तविक आयुक्तांनी या समस्या सोडविणे अपेक्षित असतांना अशा अहंकारी पध्दतीने उत्तरे देणे योग्य नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.                            दुसरीकडे मुंब्य्रातील कब्रस्थानाची जागा प्रशासनाने बदलली आहे. आता जी जागा प्रस्तावित केली आहे, ती जागा येथील रहिवाशांनी खुप लांब पडणार आहे. परंतु आयुक्तांच्या म्हणन्यानुसार आधीची जागा ही सीरआरझेडची असल्यानेच कब्रस्तानची जागा हलविण्यात आली आहे. परंतु त्यांच्या विधानात तथ्य वाटत नसल्याने याबाबत माहिती अधिकार टाकला जाणार असून, त्यात माहिती चुकीची आढळल्यास तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला. मुंब्य्रात फेरीवाल्यांची समस्या देखील गंभीर स्वरुप धारण करीत असून फुटपाथवरुन चालणे शक्य होत नाही, त्यामुळे फेरीवाला झोन तयार करण्याची मागणी देखील त्यांनी केली. या समस्या सोडविण्यात स्थानिक आमदार कमी पडत असल्यानेच आता आम्हाला या समस्या सोडवाव्यात लागत असल्याचे सांगत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा नामोउल्लेख टाळत आरोप केले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आता काहीच मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीत, त्यामुळे मल्टीप्लेक्सचा मुद्दा घेऊन ते आता भांडत आहेत. मनसे केवळ गुंडगीरी आणि मारामारी करणारा पक्ष असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला. शिवसेना आणि भाजपा जरी वेगळ्या विर्दभासाठी आग्रही असली तरी देखील आम्ही त्यांनी साथ देणार नसल्याचे मत आझमी यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाAbu Azmiअबू आझमी