शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

प्रदूषण विरहित ठाण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याची ठाणे ते मुंबई सायकलसवारी

By जितेंद्र कालेकर | Published: June 04, 2019 11:00 PM

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे प्रदूषणातही वाढ होत आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी तसेच सुदृढ आरोग्यासाठीही सायकलींगचा वापर करणे हितकारक ठरणारे आहे. हाच संदेश देण्यासाठी ठाण्याचे पोलीस अधिकारी चंद्रकांत जाधव यांच्यासह काही तरुण मंडळींनी नुकतेच ठाणे ते गेटवे आॅफ इंडिया हे ४७ किलोमीटरचे अंतर सायकल सफरीने पार केले.

ठळक मुद्देब्लॉकबस्टर सायकल ग्रुपच्या सदस्यांचाही सहभागदोन तासांमध्ये पार केले ४७ किलोमीटरचे अंतरपर्र्यावरण दिनानिमित्त सायकल सफरीची जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वाढत्या वाहनांमुळे होणारे वायूप्रदूषण आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सायकलचा अधिकाधिक होणे अपेक्षित आहे. याची जनजागृती करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी नुकतीच ठाणे ते गेटवे आॅफ इंडिया (मुंबई) अशी सायकल सफर केली.वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी, वाहन कोंडीवर नियंत्रण येण्यासाठी तसेच आरोग्य तंदुरुस्तीसाठी सायकलचा वापर केल्यास अनेक फायदे होऊ शकतात. हा सकारात्मक विचार लोकांमध्ये रुजविण्यासाठी आपण स्वत:पासून काहीशी सुरुवात करावी, या संकल्पनेतून वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्यासह ठाण्यातील होतकरु ब्लॉकबस्टर सायकल ग्रुप मधील संदेश राव, साजिद खाकीयनी, पवन मेमन, अनुराग नाईक, संजय मिश्रा, चिराग शहा, अजय सिंग, सचिन चौधरी आणि दिग्विजय गर्जे यांनी पर्यावरण दिनाचे औचित्य साधत २ जून रोजी पहाटे ५.३० वाजता ठाण्याच्या तीन हात नाका ते मुंबईतील गेटवे आॅफ इंडिया, नरीमन पॉइंट्स हे ४७ किलो मीटरचे अंतर दोन तासांनी सकाळी ७.३० वाजता पार केले. पर्यावरण संरक्षण, वाहतूक कोंडी, व्यक्तिगत स्वास्थ असे उद्देश यामागे असल्याचे जाधव यांनी सांगितले. सायकल रॅलीतून एक वेगळे समाधान मिळाल्याचेही साजिद खाकीयनी म्हणाले.
जनसामान्यांप्रमाणे पोलिसांनीही हा आदर्श घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांनी सकाळी ६ ते ८ वाजताची पेट्रोलिंग ही सायकलवरच सुरु केली आहे. नाका आणि बंदोबस्त पॉइन्टसही ते सायकलवरुनच चेक करतात. त्यांचा हाच आदर्श आता अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनीही घेतला आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCyclingसायकलिंग