शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रदूषण विरहित ठाण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याची ठाणे ते मुंबई सायकलसवारी

By जितेंद्र कालेकर | Updated: June 4, 2019 23:41 IST

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे प्रदूषणातही वाढ होत आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी तसेच सुदृढ आरोग्यासाठीही सायकलींगचा वापर करणे हितकारक ठरणारे आहे. हाच संदेश देण्यासाठी ठाण्याचे पोलीस अधिकारी चंद्रकांत जाधव यांच्यासह काही तरुण मंडळींनी नुकतेच ठाणे ते गेटवे आॅफ इंडिया हे ४७ किलोमीटरचे अंतर सायकल सफरीने पार केले.

ठळक मुद्देब्लॉकबस्टर सायकल ग्रुपच्या सदस्यांचाही सहभागदोन तासांमध्ये पार केले ४७ किलोमीटरचे अंतरपर्र्यावरण दिनानिमित्त सायकल सफरीची जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वाढत्या वाहनांमुळे होणारे वायूप्रदूषण आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सायकलचा अधिकाधिक होणे अपेक्षित आहे. याची जनजागृती करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी नुकतीच ठाणे ते गेटवे आॅफ इंडिया (मुंबई) अशी सायकल सफर केली.वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी, वाहन कोंडीवर नियंत्रण येण्यासाठी तसेच आरोग्य तंदुरुस्तीसाठी सायकलचा वापर केल्यास अनेक फायदे होऊ शकतात. हा सकारात्मक विचार लोकांमध्ये रुजविण्यासाठी आपण स्वत:पासून काहीशी सुरुवात करावी, या संकल्पनेतून वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्यासह ठाण्यातील होतकरु ब्लॉकबस्टर सायकल ग्रुप मधील संदेश राव, साजिद खाकीयनी, पवन मेमन, अनुराग नाईक, संजय मिश्रा, चिराग शहा, अजय सिंग, सचिन चौधरी आणि दिग्विजय गर्जे यांनी पर्यावरण दिनाचे औचित्य साधत २ जून रोजी पहाटे ५.३० वाजता ठाण्याच्या तीन हात नाका ते मुंबईतील गेटवे आॅफ इंडिया, नरीमन पॉइंट्स हे ४७ किलो मीटरचे अंतर दोन तासांनी सकाळी ७.३० वाजता पार केले. पर्यावरण संरक्षण, वाहतूक कोंडी, व्यक्तिगत स्वास्थ असे उद्देश यामागे असल्याचे जाधव यांनी सांगितले. सायकल रॅलीतून एक वेगळे समाधान मिळाल्याचेही साजिद खाकीयनी म्हणाले.
जनसामान्यांप्रमाणे पोलिसांनीही हा आदर्श घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांनी सकाळी ६ ते ८ वाजताची पेट्रोलिंग ही सायकलवरच सुरु केली आहे. नाका आणि बंदोबस्त पॉइन्टसही ते सायकलवरुनच चेक करतात. त्यांचा हाच आदर्श आता अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनीही घेतला आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCyclingसायकलिंग