शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गायमुख ते पायेगाव प्रवास अवघ्या पाच मिनिटांवर येणार! खाडीपुलासाठी ‘एमएमआरडीए’कडून निविदा प्रक्रिया सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 15:26 IST

गायमुख ते पायेगाव खाडीपुलाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतले आहे.

ठाणे : ठाण्यातील गायमुख ते भिवंडी येथील पायेगाव हा प्रवास एक तासावरून अवघ्या पाच मिनिटांवर आणण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गायमुख ते पायेगाव खाडीपुलाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतले आहे. त्यासाठी ‘एमएमआरडीए’ने निविदा जारी केल्या आहेत. 

चिंचोटी-अंजूरफाटा रस्त्यावरील पायेगाव आणि ठाण्यातील गायमुख हे दोन भाग वसई खाडीच्या दोन बाजूंना आहेत. मात्र, या दोन भागांना जोडण्यासाठी खाडीपूल नाही. त्यातून सद्य:स्थितीत गायमुख येथून पायेगावला जाण्यासाठी ३० किलोमीटर अंतराचा फेरा मारावा लागतो. त्यातून या प्रवासाला सुमारे एक तासाचा वेळ लागतो. परिणामी, प्रवाशांचा वेळ वाया जातो. त्यामुळे या भागात खाडीपूल उभारण्याची गरज निर्माण झाली होती.

‘एमएमआरडीए’च्या ऑक्टोबर २०२२ मध्ये पार पडलेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार ‘एमएमआरडीए’ने आता या प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. 

तीन महिन्यांत कंत्राटदाराची नियुक्ती -

पायेगाव आणि गायमुखदरम्यान ६.४२ किमी लांबीचा रस्ता उभारला जाणार आहे. त्यामध्ये ४.४७ किमी लांबीचा खाडीपूल असेल. हा रस्ता प्रत्येकी दोन लेनचा असणार आहे. या मार्गाच्या उभारणीनंतर गायमुख ते पायेगाव या प्रवासासाठी ५ ते ७ मिनिटांचा कालावधी लागेल. त्यातून प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. तसेच गायमुखपासून चिंचोटी-अंजूरफाटा रस्त्यावरील भाग अधिक जवळ येण्यास मदत मिळणार आहे.

या खाडीपुलाच्या कामासाठी ९२९.१२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आता या प्रकल्पाच्या उभारणीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने निविदा जारी केल्या आहेत. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत कंत्राटदाराची नियुक्ती होऊन प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.

टॅग्स :thaneठाणेmmrdaएमएमआरडीए