शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

गायमुख ते पायेगाव प्रवास अवघ्या पाच मिनिटांवर येणार! खाडीपुलासाठी ‘एमएमआरडीए’कडून निविदा प्रक्रिया सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 15:26 IST

गायमुख ते पायेगाव खाडीपुलाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतले आहे.

ठाणे : ठाण्यातील गायमुख ते भिवंडी येथील पायेगाव हा प्रवास एक तासावरून अवघ्या पाच मिनिटांवर आणण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गायमुख ते पायेगाव खाडीपुलाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतले आहे. त्यासाठी ‘एमएमआरडीए’ने निविदा जारी केल्या आहेत. 

चिंचोटी-अंजूरफाटा रस्त्यावरील पायेगाव आणि ठाण्यातील गायमुख हे दोन भाग वसई खाडीच्या दोन बाजूंना आहेत. मात्र, या दोन भागांना जोडण्यासाठी खाडीपूल नाही. त्यातून सद्य:स्थितीत गायमुख येथून पायेगावला जाण्यासाठी ३० किलोमीटर अंतराचा फेरा मारावा लागतो. त्यातून या प्रवासाला सुमारे एक तासाचा वेळ लागतो. परिणामी, प्रवाशांचा वेळ वाया जातो. त्यामुळे या भागात खाडीपूल उभारण्याची गरज निर्माण झाली होती.

‘एमएमआरडीए’च्या ऑक्टोबर २०२२ मध्ये पार पडलेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार ‘एमएमआरडीए’ने आता या प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. 

तीन महिन्यांत कंत्राटदाराची नियुक्ती -

पायेगाव आणि गायमुखदरम्यान ६.४२ किमी लांबीचा रस्ता उभारला जाणार आहे. त्यामध्ये ४.४७ किमी लांबीचा खाडीपूल असेल. हा रस्ता प्रत्येकी दोन लेनचा असणार आहे. या मार्गाच्या उभारणीनंतर गायमुख ते पायेगाव या प्रवासासाठी ५ ते ७ मिनिटांचा कालावधी लागेल. त्यातून प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. तसेच गायमुखपासून चिंचोटी-अंजूरफाटा रस्त्यावरील भाग अधिक जवळ येण्यास मदत मिळणार आहे.

या खाडीपुलाच्या कामासाठी ९२९.१२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आता या प्रकल्पाच्या उभारणीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने निविदा जारी केल्या आहेत. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत कंत्राटदाराची नियुक्ती होऊन प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.

टॅग्स :thaneठाणेmmrdaएमएमआरडीए