शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

स्वातंत्र्य दिनाच्या झेंडा वंदनसाठी लाल किल्ल्यावर ठाण्याचे शेतकरी दांपत्य‘विशेष अतिथी’

By सुरेश लोखंडे | Updated: August 14, 2023 18:29 IST

केंद्र शासनाने बंधनकारक केलेल्या ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’(पीएमके) योजनेसाठी उत्कृष्ठ कामकाज केल्यामुळे राज्यात ठाणे व पुणे जिल्हा अव्वल ठरला आहे.

ठाणे : केंद्र शासनाने बंधनकारक केलेल्या ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’(पीएमके) योजनेसाठी उत्कृष्ठ कामकाज केल्यामुळे राज्यात ठाणे व पुणे जिल्हा अव्वल ठरला आहे. या जिल्ह्यातील दोन शेतकरी लाभार्थी दांपत्यांना दिल्ली येथील १५ ऑगस्टच्या समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून केंद्र सरकारे आमंत्रित केले आहे. हा विशेष अतिथीचा सन्मान ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यामधील विजय गोटीराम ठाकरे व त्यांच्या पत्नी संगीता ठाकरे या दांपत्यास मिळाला आहे. या दांपत्यास ठाणे जिल्हा प्रशासनाकडून देश स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी सांगता समारंभाला लाल किल्यावर उपस्थित करण्यात आले आहे.

पुणे येथील राज्य शासनाच्या कृषि विभागामधील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कृषि आयुक्तालयाने ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून या शेतकरी ठाकरे दांपत्याची माहिती घेऊन केंद्र शासनाला आधीच कळवली आहे. केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना बुधवारी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन समारंभाचे साक्षीदार होता आले आहे. त्यासाठी राज्याभरातून जाणाऱ्या दोन दांपत्यांमध्ये मुरबाड तालुक्यातील वैशाखरे गावातील या ठाकरे दांपत्याचा समावेश आहे. दिल्लीच्या या समारंभाला घेऊन जाण्यासह त्यांना सुखरूप घरी आणण्याची जबाबदारी मुरबाडच्या न्याहाडी येथील मंडल अधिकारी भोजू पवार व जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक विशाल सुनील जाधव यांच्याकडून पार पाडली जात आहे.

दिल्लीच्या लाल किल्लयावरील स्वातंत्र्या दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या या सांगता समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी या ठाकरे दांपत्यास घेऊन शासकीय यंत्रणा रेल्वेव्दारे सोमवारी सकाळीच दिल्लीत दाखल झाली आहे. देशातील प्रत्येक राज्यातून दोन शेतकरी लाभार्थी पत्नीसह विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात राज्यातून ठाणे व पुणे येथील शेतकरी दांपत्यास या विशेष अतिथी होण्याचा सन्मान मिळाला आहे. केंद्र शासनाने बंधनकारक केलेल्या पी.एम. किसान योजनेच्या लाभाथीर्ची भूमि अभिलेखनुसार माहिती अद्ययावत करण्याच्या कार्यवाहीत राज्यात ठाणे व पुणे जिल्ह्याने उत्कृष्ठ कामकाज केले आहे. त्यास अनुसरून ठाणे जिल्हह्यातील आदिवासी दुर्गम तालुक्यामधील या वैशाखरे गावामधील ठाकरे दांपत्याला स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे कामकाज महत्वाचे ठरले आहे. 

टॅग्स :thaneठाणेFarmerशेतकरीIndependence Dayस्वातंत्र्य दिन