शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
2
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
3
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
4
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
5
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
6
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
7
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
8
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
9
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
10
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
11
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
12
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
13
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
14
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
15
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
16
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
17
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
18
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
19
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
20
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने

Maharashtra Election 2019: ठाणे जिल्ह्यात नुकसानभरपाईसाठी आणखी १७ कोटींची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 06:07 IST

Maharashtra Election 2019: अतिवृष्टीबाधितांसाठी मागणी ; सर्वाधिक नुकसान कल्याण तालुक्यात

- सुरेश लोखंडे 

ठाणे : अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील घरे, खरीप पिके व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये ३९८ गावांच्या बाधितांचा समावेश आहे. यातील भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड आणि कल्याणमधील काही बाधितांना २० कोटी रुपये नुकसानभरपाईचे वाटप होणे अपेक्षित आहे. यापैकी १२ कोटी ६४ लाखांचे वाटप झाले. तर, उर्वरित बाधितांसह कल्याण तालुक्यातील सर्वाधिक बाधित कुटुंबीयांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यासाठी तब्बल १६ कोटी ७० लाखांची गरज आहे.

जिल्ह्यात २६ व २७ जुलै आणि ४ ते ६ आॅगस्टदरम्यान अतिवृष्टी व पूरस्थितीच्या संकटात शेकडो गावांतील हजारो रहिवासी सापडले होते. यामध्ये कल्याण तालुक्यातील सर्वाधिक २६ हजार १७६ रहिवाशांसह सरकारी जागेवरील तीन हजार ४०४ बाधित कुटुंबीयांचा समावेश आहे. याशिवाय, जिल्हाभरातील १७ हजार १४३ शेतकऱ्यांच्या सहा हजार ८५५ हेक्टर शेतजमिनी व खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या नुकसानीसह बाधित कुटुंबीयांचे पंचनामे केले असता त्यानुसार भरपाईवाटप झाले. ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर व मुरबाड आदी तालुक्यांतील बाधितांना आतापर्यंत १२ कोटी ६४ लाखांचे वाटप झाले. कल्याण तालुक्यातील सर्वाधिक बाधित कुटुंबीयांपैकी काहींना १६ कोटी ३७ लाख ५० हजारांचे वाटप करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे कल्याण तालुक्यात सर्वात जास्त नुकसान झाले आहे. या बाधितांसाठी सुमारे २८ कोटी रुपये नुकसानभरपाईचे वाटप करणे अपेक्षित आहे. सुमारे २६ हजार १७६ बाधितांचे पंचनामे झालेले असून सरकारी जागेवरील तीन हजार ४०४ बाधितांचे पंचनामे अपेक्षित आहेत. या बाधितांपैकी १२ हजार ८९९ पंचनाम्यानुसार संबंधित कुटुंबीयांना अनुदानाची रक्कम वाटप झाली आहे. अजून तब्बल १३ हजार २७७ बाधित कुटुंबीयांना अजून १६ कोटी ७० लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची गरज आहे.

या रकमेच्या प्राप्तीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही नुकसानभरपाईची उर्वरित रक्कम प्राप्त झाली नाही. निवडणुकीच्या धामधुमीनंतर ती मिळण्याची अपेक्षा आहे.

सहा हजार ८५५ हेक्टरी शेतजमीनीचे नुकसान

जिल्ह्यातील जीवघेण्या अतिवृष्टीमुळे तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला. याच कालावधीत पाच हजार २०१ राहत्या घरांचे नुकसान झाले, तर १३९ गायी, म्हशी, शेळ्यामेंढ्यांचे नुकसान झाले. यात सर्वाधिक नुकसान कल्याण तालुक्यात २६ हजार १७६ कुटुंबीयांचे झाले आहे. त्यांचे पंचनामे होऊन बहुतांश १२ हजार ८९९ आपत्तीग्रस्तांना अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित बाधितांच्या अर्थसाहाय्यासाठी १६ कोटी ७० लाखांची मागणी जोर धरू लागली आहे. जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सुमारे सहा हजार ८५५ हेक्टरी शेतजमीन व त्यावरील खरीप पिकांचे नुकसान झाले. कल्याण तालुक्यातील ५५ गावांचा या नुकसानग्रस्तांमध्ये समावेश आहे. जिल्हाभरात ५८७.८० हेक्टर शेतजमिनीचे पुरामुळे नुकसान झाले.

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे