शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
5
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
6
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
7
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
8
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
9
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
10
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
11
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
12
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
13
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
14
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
15
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
16
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
17
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
18
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
19
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'

Maharashtra Election 2019: ठाणे जिल्ह्यात नुकसानभरपाईसाठी आणखी १७ कोटींची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 06:07 IST

Maharashtra Election 2019: अतिवृष्टीबाधितांसाठी मागणी ; सर्वाधिक नुकसान कल्याण तालुक्यात

- सुरेश लोखंडे 

ठाणे : अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील घरे, खरीप पिके व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये ३९८ गावांच्या बाधितांचा समावेश आहे. यातील भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड आणि कल्याणमधील काही बाधितांना २० कोटी रुपये नुकसानभरपाईचे वाटप होणे अपेक्षित आहे. यापैकी १२ कोटी ६४ लाखांचे वाटप झाले. तर, उर्वरित बाधितांसह कल्याण तालुक्यातील सर्वाधिक बाधित कुटुंबीयांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यासाठी तब्बल १६ कोटी ७० लाखांची गरज आहे.

जिल्ह्यात २६ व २७ जुलै आणि ४ ते ६ आॅगस्टदरम्यान अतिवृष्टी व पूरस्थितीच्या संकटात शेकडो गावांतील हजारो रहिवासी सापडले होते. यामध्ये कल्याण तालुक्यातील सर्वाधिक २६ हजार १७६ रहिवाशांसह सरकारी जागेवरील तीन हजार ४०४ बाधित कुटुंबीयांचा समावेश आहे. याशिवाय, जिल्हाभरातील १७ हजार १४३ शेतकऱ्यांच्या सहा हजार ८५५ हेक्टर शेतजमिनी व खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या नुकसानीसह बाधित कुटुंबीयांचे पंचनामे केले असता त्यानुसार भरपाईवाटप झाले. ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर व मुरबाड आदी तालुक्यांतील बाधितांना आतापर्यंत १२ कोटी ६४ लाखांचे वाटप झाले. कल्याण तालुक्यातील सर्वाधिक बाधित कुटुंबीयांपैकी काहींना १६ कोटी ३७ लाख ५० हजारांचे वाटप करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे कल्याण तालुक्यात सर्वात जास्त नुकसान झाले आहे. या बाधितांसाठी सुमारे २८ कोटी रुपये नुकसानभरपाईचे वाटप करणे अपेक्षित आहे. सुमारे २६ हजार १७६ बाधितांचे पंचनामे झालेले असून सरकारी जागेवरील तीन हजार ४०४ बाधितांचे पंचनामे अपेक्षित आहेत. या बाधितांपैकी १२ हजार ८९९ पंचनाम्यानुसार संबंधित कुटुंबीयांना अनुदानाची रक्कम वाटप झाली आहे. अजून तब्बल १३ हजार २७७ बाधित कुटुंबीयांना अजून १६ कोटी ७० लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची गरज आहे.

या रकमेच्या प्राप्तीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही नुकसानभरपाईची उर्वरित रक्कम प्राप्त झाली नाही. निवडणुकीच्या धामधुमीनंतर ती मिळण्याची अपेक्षा आहे.

सहा हजार ८५५ हेक्टरी शेतजमीनीचे नुकसान

जिल्ह्यातील जीवघेण्या अतिवृष्टीमुळे तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला. याच कालावधीत पाच हजार २०१ राहत्या घरांचे नुकसान झाले, तर १३९ गायी, म्हशी, शेळ्यामेंढ्यांचे नुकसान झाले. यात सर्वाधिक नुकसान कल्याण तालुक्यात २६ हजार १७६ कुटुंबीयांचे झाले आहे. त्यांचे पंचनामे होऊन बहुतांश १२ हजार ८९९ आपत्तीग्रस्तांना अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित बाधितांच्या अर्थसाहाय्यासाठी १६ कोटी ७० लाखांची मागणी जोर धरू लागली आहे. जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सुमारे सहा हजार ८५५ हेक्टरी शेतजमीन व त्यावरील खरीप पिकांचे नुकसान झाले. कल्याण तालुक्यातील ५५ गावांचा या नुकसानग्रस्तांमध्ये समावेश आहे. जिल्हाभरात ५८७.८० हेक्टर शेतजमिनीचे पुरामुळे नुकसान झाले.

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे