शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

ठाणे जिल्ह्यात २०२७ बालके कुपोषणाच्या चक्रव्यूहात

By admin | Updated: August 30, 2015 21:31 IST

सर्वाधिक महापालिकांचा जिल्हा म्हणून देशात नावारूपाला आलेल्या ठाणे जिल्ह्यात दोन हजार २७ बालके कुपोषणाच्या चक्रव्यूहात अडकली आहेत. संबंधित

सुरेश लोखंडे, ठाणेसर्वाधिक महापालिकांचा जिल्हा म्हणून देशात नावारूपाला आलेल्या ठाणे जिल्ह्यात दोन हजार २७ बालके कुपोषणाच्या चक्रव्यूहात अडकली आहेत. संबंधित प्रशासन यावर उपायांचा दावा करीत असले तरी तो फोल ठरला आहे. जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटी ६० लाख दहा हजार असून त्यापैकी सर्वाधिक शहरी भागात वास्तव्याला आहेत. महापालिकांचे क्षेत्र चोहोबाजूने विस्तारलेले असतानाही या जिल्ह्यात अद्यापही दोन हजार पेक्षा जास्त बालके कुपोषित जीवन जगत आहे. जिल्ह्यातील ठाणे हा संपूर्ण शहरी लोकवस्तीचा तालुका असतानाही त्यात २० बालके कुपोषित आहेत. यानंतर कल्याण तालुकाही बहुतांशी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट असताना त्यामध्येही १३९ बालके कुपोषित आढळली आहेत. महापालिका क्षेत्रालगतही परिस्थिती असून नगरपालिका, नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातही कुपोषित बालके जीव मुठीत घेऊन जगत आहेत. ही स्थिती भूषणावह नाही.विकासाच्या जोरावर नगर पंचायत म्हणून उदयाला आलेल्या शहापूर, भिवंडी व मुरबाड या दोन्ही तालुक्यात तर सर्वाधिक बालके तीव्र कुपोषीत आहेत. शहापूर तालुक्यात ३० हजार ७२० बालकांचे आरोग्य संवंर्धक पध्दतीने वजन केले असता त्यामध्ये तीव्र कमी वजनाची म्हणजे कुपोषित एक हजार ७९ बालके आढळले आहेत. वजन केलेल्यांपैकी ७ टक्के बालकेही कुपोषीत आहेत.