शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

वनराई बंधाऱ्यांच्या ४५ लाख गोण्यांसाठी ठाणे जि. प. चा महापालिकांकडे पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 18:53 IST

 जिल्ह्यातील छोट्यामोठ्या नद्या, नाले, ओढे आदींचे पाणी सध्या वाहून जात आहे. या वाहत्या पाण्यास योग्य ठिकाणी आडवून वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने युध्दपातळीवर हाती घेतला आहे.अवकाळी पावसाची दाट शक्यता लक्षात घेऊन या उपक्रमास मध्यंतरी अडथळा निर्माण झाला होता. बंधारा बांधल्यानंतर अवकाळी पावसामुळे त्यातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरून नुकसानीची शक्यता होती.

ठळक मुद्देजिल्ह्यात सुमारे चार हजार ५०० बंधारे बांधण्याचे नियोजनउन्हाळ्यात उद्भवणाऱ्यां पाणी टंचाईला काही अंशी आळागुरूढोरं, वन्य पशूपक्षी आदीसाठी जंगलात पाण्याची उपलबधताशेतकऱ्यांना भेंडी सारख्या पालेभाज्यांचे उत्पन्न

ठाणे : रब्बी हंगामासाठी व जनावरांना जंगलात पाणी उपलब्ध व्हावे या करीता ठाणेजिल्हा परिषदेने जिल्ह्यात नदी, नाले व ओढ्यांच्या ओव्हळांवर वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी प्राधान्यक्रमाने हाती घेतला आहे. पण त्यासाठी लागणाऱ्यां ४५ लाख रिकाम्या गोण्यां प्राप्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाकडून जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, विकास आदींकडे सतत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.       जिल्ह्यातील छोट्यामोठ्या नद्या, नाले, ओढे आदींचे पाणी सध्या वाहून जात आहे. या वाहत्या पाण्यास योग्य ठिकाणी आडवून वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने युध्दपातळीवर हाती घेतला आहे.अवकाळी पावसाची दाट शक्यता लक्षात घेऊन या उपक्रमास मध्यंतरी अडथळा निर्माण झाला होता. बंधारा बांधल्यानंतर अवकाळी पावसामुळे त्यातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरून नुकसानीची शक्यता होती. यामुळे दरम्यानच्या काळात बंधारे बांधण्याऐवजी ग्राम सेवकांना केवळ बंधारा बांधण्याच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी पार पाडावी लागली.आता ठिकाणांची निश्चिती झाली आहे. त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या काही रिकाम्य गोण्यांव्दारे बंधारे बांधण्याचे काम युध्दपातळीने सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी लागणाऱ्यां रिकाम्या गोण्यां महापालिकां, विकासकांकडून मिळवण्यासाठी यंत्रणाही सज्ज केली आहे.         ग्रामीण भागातील जंगलांमध्ये ठिकठिकाणी बांधल्या जाणाऱ्यां वनराई बंधाऱ्यांसाठी ४५ लाख गोण्यांची गरज जिल्हा परिषदेला आहे. त्या प्राप्त करण्यासाठी ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी महापालिका, नगरपालिका, विकासकांच्या भेटी घेऊन पाठपुरावा सुरू केला आहे. या दौऱ्यांमुळे त्यांना गोण्या मिळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याव्दारे लोक सहभागातून जिल्ह्यात सुमारे चार हजार ५०० बंधारे बांधण्याचे नियोजन सुरू केले आहे. यामध्ये शहापूर, मुरबाड या दोन्ही तालुक्यात प्रत्येकी एक हजार ५०० बंधाऱ्यांचे नियोजन आहे. तर भिवंडीला एक हजार आणि कल्याण, अंबरनाथ तालुक्यात प्रत्येकी २५० बंधारे बांधण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज झाली आहे. दिवाळीच्या या सुटीनंतर जिल्हा परिषदेनेकडून बंधाऱ्यांचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेण्याचे नियोजन केले आहे.    या बंधाऱ्यांमुळे उन्हाळ्यात उद्भवणाऱ्यां पाणी टंचाईला काही अंशी आळा घालणे शक्य होईल. पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, हात पंप आदींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल. याशिवाय गुरूढोरं, वन्य पशूपक्षी आदीसाठी जंगलात पाण्याची उपलबधता होणार आहे. रब्बी व नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांना भेंडी सारख्या पालेभाज्यांचे उत्पन्न या पाण्यामुळे घेणे शक्य होणार आहे. ग्रामीण भागास नवसंजीवनी देणाऱ्यां या उपक्रमासाठी स्थानिक गावकऱ्यांच्या लोकसहभागाप्रमाणेच ठाणे, मुंबईतील महाविद्यालयातील विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी आदी विद्यार्थी संघटना, उद्योंगधंदे, कारखाने, शाळा, महाविद्यालये, सामाजिक, राजकीय संघटना , शिक्षक संघटना आदींचा सहभाग घेण्याचे देखील नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद