शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

वनराई बंधाऱ्यांच्या ४५ लाख गोण्यांसाठी ठाणे जि. प. चा महापालिकांकडे पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 18:53 IST

 जिल्ह्यातील छोट्यामोठ्या नद्या, नाले, ओढे आदींचे पाणी सध्या वाहून जात आहे. या वाहत्या पाण्यास योग्य ठिकाणी आडवून वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने युध्दपातळीवर हाती घेतला आहे.अवकाळी पावसाची दाट शक्यता लक्षात घेऊन या उपक्रमास मध्यंतरी अडथळा निर्माण झाला होता. बंधारा बांधल्यानंतर अवकाळी पावसामुळे त्यातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरून नुकसानीची शक्यता होती.

ठळक मुद्देजिल्ह्यात सुमारे चार हजार ५०० बंधारे बांधण्याचे नियोजनउन्हाळ्यात उद्भवणाऱ्यां पाणी टंचाईला काही अंशी आळागुरूढोरं, वन्य पशूपक्षी आदीसाठी जंगलात पाण्याची उपलबधताशेतकऱ्यांना भेंडी सारख्या पालेभाज्यांचे उत्पन्न

ठाणे : रब्बी हंगामासाठी व जनावरांना जंगलात पाणी उपलब्ध व्हावे या करीता ठाणेजिल्हा परिषदेने जिल्ह्यात नदी, नाले व ओढ्यांच्या ओव्हळांवर वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी प्राधान्यक्रमाने हाती घेतला आहे. पण त्यासाठी लागणाऱ्यां ४५ लाख रिकाम्या गोण्यां प्राप्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाकडून जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, विकास आदींकडे सतत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.       जिल्ह्यातील छोट्यामोठ्या नद्या, नाले, ओढे आदींचे पाणी सध्या वाहून जात आहे. या वाहत्या पाण्यास योग्य ठिकाणी आडवून वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने युध्दपातळीवर हाती घेतला आहे.अवकाळी पावसाची दाट शक्यता लक्षात घेऊन या उपक्रमास मध्यंतरी अडथळा निर्माण झाला होता. बंधारा बांधल्यानंतर अवकाळी पावसामुळे त्यातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरून नुकसानीची शक्यता होती. यामुळे दरम्यानच्या काळात बंधारे बांधण्याऐवजी ग्राम सेवकांना केवळ बंधारा बांधण्याच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी पार पाडावी लागली.आता ठिकाणांची निश्चिती झाली आहे. त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या काही रिकाम्य गोण्यांव्दारे बंधारे बांधण्याचे काम युध्दपातळीने सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी लागणाऱ्यां रिकाम्या गोण्यां महापालिकां, विकासकांकडून मिळवण्यासाठी यंत्रणाही सज्ज केली आहे.         ग्रामीण भागातील जंगलांमध्ये ठिकठिकाणी बांधल्या जाणाऱ्यां वनराई बंधाऱ्यांसाठी ४५ लाख गोण्यांची गरज जिल्हा परिषदेला आहे. त्या प्राप्त करण्यासाठी ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी महापालिका, नगरपालिका, विकासकांच्या भेटी घेऊन पाठपुरावा सुरू केला आहे. या दौऱ्यांमुळे त्यांना गोण्या मिळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याव्दारे लोक सहभागातून जिल्ह्यात सुमारे चार हजार ५०० बंधारे बांधण्याचे नियोजन सुरू केले आहे. यामध्ये शहापूर, मुरबाड या दोन्ही तालुक्यात प्रत्येकी एक हजार ५०० बंधाऱ्यांचे नियोजन आहे. तर भिवंडीला एक हजार आणि कल्याण, अंबरनाथ तालुक्यात प्रत्येकी २५० बंधारे बांधण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज झाली आहे. दिवाळीच्या या सुटीनंतर जिल्हा परिषदेनेकडून बंधाऱ्यांचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेण्याचे नियोजन केले आहे.    या बंधाऱ्यांमुळे उन्हाळ्यात उद्भवणाऱ्यां पाणी टंचाईला काही अंशी आळा घालणे शक्य होईल. पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, हात पंप आदींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल. याशिवाय गुरूढोरं, वन्य पशूपक्षी आदीसाठी जंगलात पाण्याची उपलबधता होणार आहे. रब्बी व नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांना भेंडी सारख्या पालेभाज्यांचे उत्पन्न या पाण्यामुळे घेणे शक्य होणार आहे. ग्रामीण भागास नवसंजीवनी देणाऱ्यां या उपक्रमासाठी स्थानिक गावकऱ्यांच्या लोकसहभागाप्रमाणेच ठाणे, मुंबईतील महाविद्यालयातील विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी आदी विद्यार्थी संघटना, उद्योंगधंदे, कारखाने, शाळा, महाविद्यालये, सामाजिक, राजकीय संघटना , शिक्षक संघटना आदींचा सहभाग घेण्याचे देखील नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद