शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

‘ठाणे’करी - भाजपचे ‘मिशन १५२’ नवी राजकीय मांडणी

By संदीप प्रधान | Updated: July 17, 2023 10:54 IST

भिवंडीत बावनकुळे यांनी हे मिशन जाहीर केले. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा भरभक्कम बहुमत प्राप्त करून देण्याकरिता लोकसभा निवडणुकीत ४५ जागांचे लक्ष्य भाजपने निश्चित केले आहे. मोदींचा करिष्मा आणि महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फूट यामुळे हे उद्दिष्ट साध्य करण्यात भाजप यश मिळविणार, असा विश्वास त्या पक्षाच्या नेत्यांमध्ये आहे. परंतु, भिवंडीतील शिबिरात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेले ‘मिशन १५२’ हे लोकसभा निवडणूक निकालानंतर महायुतीमधील फेरमांडणीचे संकेत देणारे आहे.

भिवंडीत बावनकुळे यांनी हे मिशन जाहीर केले. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, १५२ जागांचे मिशन पूर्ण होईल इतक्या जागा लढण्याकरिता दिल्या जातील. तेवढेच बोलून ते थांबले नाहीत, तर २०१४ मधील आदित्य ठाकरे यांच्या ‘मिशन १५१’मुळे युती तुटली होती. मात्र, भाजप आपल्या मित्रांना अंतर न देता हे मिशन साध्य करेल. बावनकुळे यांचे मिशन व फडणवीस यांनी त्यावर केलेली मल्लिनाथी यात विसंगती आहे. हे दोन्ही साध्य कसे होणार, याबाबत साशंकता आहे. सर्वाधिक १०६ आमदार असूनही भाजपला प्रचंड तडजोड करायला लागल्यामुळे भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांमध्ये उमेद निर्माण करणे, हा हे मिशन जाहीर करण्यामागील हेतू असू शकतो. शिवाय आपल्याला १५२ जागा जिंकायच्या असून, २८८ जागांवर काम करायचे आहे म्हटले तर कार्यकर्त्याला समोर आव्हान दिसते. अन्यथा तीन पक्षांच्या सरकारमध्ये अर्धामुर्धा वाटा मिळणार असेल तर कार्यकर्ता हतोत्साहित होतो. त्यामुळे मिशन जाहीर करण्यामागे कार्यकर्त्याला चेतवणे, हा हेतू आहे हे उघड आहे.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत अगोदरच्या १२२ आमदारांपैकी भाजपचे किमान ४२ उमेदवार हे मोदींचा करिष्मा व केंद्रात सत्ता असतानाही पराभूत झाले व नवे २६ आमदार विजयी झाले. मिशन १५२ साठी २०१९ मध्ये लढविलेल्या १६२ जागा अधिक दुसऱ्या क्रमांकाच्या ५२ जागांवर निवडणूक लढवावी लागेल.

दोन पक्षांचा संसारसमजा भाजपने एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना १०० जागा देऊ केल्या तर ते दोघे इतक्या कमी जागा स्वीकारणार का? हा प्रश्न आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, लोकसभा निवडणुकीत भाजपला शिंदे व पवार यांच्यामध्ये जो जास्त उपयुक्त वाटेल त्याच्यासोबत युती करून कदाचित एकाला स्वबळ आजमावण्याकरिता मोकळे करण्याचा निर्णय भाजप घेऊ शकते.भाजपच्या लोकसभेतील ‘मिशन ४५’शी विधानसभेतील ‘मिशन १५२’चा सूतराम संबंध नाही. उलटपक्षी विधानसभा निवडणुकीत दोन पक्षांचा संसार भाजपची परवड थांबवणारा ठरेल.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण