शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

‘ठाणे’करी - भाजपचे ‘मिशन १५२’ नवी राजकीय मांडणी

By संदीप प्रधान | Updated: July 17, 2023 10:54 IST

भिवंडीत बावनकुळे यांनी हे मिशन जाहीर केले. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा भरभक्कम बहुमत प्राप्त करून देण्याकरिता लोकसभा निवडणुकीत ४५ जागांचे लक्ष्य भाजपने निश्चित केले आहे. मोदींचा करिष्मा आणि महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फूट यामुळे हे उद्दिष्ट साध्य करण्यात भाजप यश मिळविणार, असा विश्वास त्या पक्षाच्या नेत्यांमध्ये आहे. परंतु, भिवंडीतील शिबिरात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेले ‘मिशन १५२’ हे लोकसभा निवडणूक निकालानंतर महायुतीमधील फेरमांडणीचे संकेत देणारे आहे.

भिवंडीत बावनकुळे यांनी हे मिशन जाहीर केले. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, १५२ जागांचे मिशन पूर्ण होईल इतक्या जागा लढण्याकरिता दिल्या जातील. तेवढेच बोलून ते थांबले नाहीत, तर २०१४ मधील आदित्य ठाकरे यांच्या ‘मिशन १५१’मुळे युती तुटली होती. मात्र, भाजप आपल्या मित्रांना अंतर न देता हे मिशन साध्य करेल. बावनकुळे यांचे मिशन व फडणवीस यांनी त्यावर केलेली मल्लिनाथी यात विसंगती आहे. हे दोन्ही साध्य कसे होणार, याबाबत साशंकता आहे. सर्वाधिक १०६ आमदार असूनही भाजपला प्रचंड तडजोड करायला लागल्यामुळे भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांमध्ये उमेद निर्माण करणे, हा हे मिशन जाहीर करण्यामागील हेतू असू शकतो. शिवाय आपल्याला १५२ जागा जिंकायच्या असून, २८८ जागांवर काम करायचे आहे म्हटले तर कार्यकर्त्याला समोर आव्हान दिसते. अन्यथा तीन पक्षांच्या सरकारमध्ये अर्धामुर्धा वाटा मिळणार असेल तर कार्यकर्ता हतोत्साहित होतो. त्यामुळे मिशन जाहीर करण्यामागे कार्यकर्त्याला चेतवणे, हा हेतू आहे हे उघड आहे.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत अगोदरच्या १२२ आमदारांपैकी भाजपचे किमान ४२ उमेदवार हे मोदींचा करिष्मा व केंद्रात सत्ता असतानाही पराभूत झाले व नवे २६ आमदार विजयी झाले. मिशन १५२ साठी २०१९ मध्ये लढविलेल्या १६२ जागा अधिक दुसऱ्या क्रमांकाच्या ५२ जागांवर निवडणूक लढवावी लागेल.

दोन पक्षांचा संसारसमजा भाजपने एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना १०० जागा देऊ केल्या तर ते दोघे इतक्या कमी जागा स्वीकारणार का? हा प्रश्न आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, लोकसभा निवडणुकीत भाजपला शिंदे व पवार यांच्यामध्ये जो जास्त उपयुक्त वाटेल त्याच्यासोबत युती करून कदाचित एकाला स्वबळ आजमावण्याकरिता मोकळे करण्याचा निर्णय भाजप घेऊ शकते.भाजपच्या लोकसभेतील ‘मिशन ४५’शी विधानसभेतील ‘मिशन १५२’चा सूतराम संबंध नाही. उलटपक्षी विधानसभा निवडणुकीत दोन पक्षांचा संसार भाजपची परवड थांबवणारा ठरेल.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण