शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कल्याणमध्ये गांजाची तस्करी करणा-या आरोपीच्या कोठडीत वाढ : ठाणे न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 18:45 IST

कल्याणमधून गांजाची तस्करी करणा-या रिक्षा चालक अच्चूला अटक केल्यानंतर चौकशीत त्याने विशेष काहीच माहिती दिली नाही. पोलिसांच्या मागणीनंतर ठाणे न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे.

ठळक मुद्दे कल्याणच्या बैलबाजार परिसरात गांजाची विक्रीगांजा तस्करीत टोळीची शक्यताएनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा

ठाणे : कल्याण परिसरातून गांजाची तस्करी केल्याप्रकरणी अटक केलेल्या अच्चू ऊर्फ अब्दुल रशीद शेख (४५, रा. बैलबाजार, कल्याण) या रिक्षाचालकाला २० फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाण्याचे विशेष न्या. व्ही.व्ही. बंबार्डे यांनी दिले आहेत. त्याच्याकडून ६० हजारांचा चार किलो गांजा हस्तगत करण्यात आला आहे.कल्याणच्या बैलबाजार जेठा कम्पाउंड परिसरातून गांजाची तस्करी केल्याप्रकरणी अच्चूला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे आणि उपनिरीक्षक अमृता चवरे यांच्या पथकाने १३ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्याच्याकडे मिळालेल्या चार किलोच्या गांजाच्या चौकशीसाठी न्यायालयाने सुरुवातीला त्याला १७ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली. दरम्यान, त्याने हा गांजा कोणाकडून आणला? कोणाला विक्री करणार होता? त्याचे आणखी कोण कोण साथीदार आहेत? तो कधीपासून हे काम करतो? अशा कोणत्याच प्रश्नांची त्याने चौकशीत उत्तरे दिली नाही. तपासात तो कोणत्याही प्रकारे तो सहकार्य करीत नसल्यामुळे त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली. त्याच्या कोठडीची मुदत शनिवारी संपताच त्याला आणखी तीन दिवस म्हणजे २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून याप्रकरणी सखोल चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हा