शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Thane: मुंबई मनपा पाणी कपातीचा फटका ठाण्याला कपातीचा फटका बसू नये यासाठी ठाणे मनपाने केले नियोजन

By अजित मांडके | Updated: February 27, 2024 16:15 IST

Thane News: देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव शहरातील काही भागात आठवड्यातून १५ दिवसातून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पाणी कपात केली जात आहे. परंतु आता मुंबई महापालिकेकडून देखभाल दुरुस्तीसाठी पाणी कपात लागू करण्यात आली असल्याने त्याचा फटका देखील ठाण्यातील बहसुंख्य भागांना बसणार आहे.

- अजित मांडके  ठाणे - देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव शहरातील काही भागात आठवड्यातून १५ दिवसातून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पाणी कपात केली जात आहे. परंतु आता मुंबई महापालिकेकडून देखभाल दुरुस्तीसाठी पाणी कपात लागू करण्यात आली असल्याने त्याचा फटका देखील ठाण्यातील बहसुंख्य भागांना बसणार आहे. त्यामुळे ज्या भागांना पाणी कपातीचा फटका बसणार आहे. त्याठिकाणी पाणी पुरवठ्याचे नियोजन ठाणे महापालिकेने केले आहे. त्यानुसार ज्या भागांना दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी पुरवठा केला जात आहे. त्याभागांना आता पुढील काही दिवस दिवसातून एकदा दोन तास पाणी पुरवठा करण्याचे नियोजन ठाणे महापालिकेने आखले आहे.

मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठयाच्या पिसे येथील पाणी उद्चंन केंद्रामध्ये अचानक आग लागल्याने मुंबईतील अनेक भागांचा पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. त्यानुसार सोमवारी रात्रीपासूनच मुंबई महापालिकेकडून देखभाल दुरुस्तीसाठी पाणी कपात लागू केली आहे. त्यानुसार त्याचा फटका आता ठाणे शहरातील बहुसंख्य भागांना बसणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेकडून ठाण्याला रोज ८५ दशलक्ष लीटर एवढा पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु आता मुंबई महापालिकेने ठाण्यात देखील ५० टक्के पाणी कपात लागू केली आहे. जो पर्यंत काम पूर्ण होत नाही, तो पर्यंत ही कपात लागू असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या पाणी कपातीचा सामना आता शहरातील धोबी घाट कोपरी पूर्व, आनंद नगर गांधी नगर, नौपाडा, बी कॅबीन, राम मारुती रोड टेकडी बंगला, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, वागळे इस्टेट, साईनाथ नगर, रघुनाथ नगर, अंबिका नगर, जिजामाता नगर, रामंचद्र नगर, इंदिरा नगर आदी भागांना याचा फटका बसणार आहे.

येथील बहुसंख्य भागांना दिवसातून दोन किंवा तीन वेळा पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु येथील रहिवाशांना पाणी कपातीचा अधिकचा फटका बसू नये यासाठी महापालिकेने उपाय योजना आखल्या आहेत. त्यानुसार येथील भागांना आता दिवसातून एकदाच दोन तास पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार गावदेवी येथील पाण्याची टाकी भरल्यानंतर येथील भागांना पाणी पुरवठा आणि टेकडी बंगला येथील पाण्याची टाकी भरल्यानंतर तेथील भागांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.

टॅग्स :WaterपाणीThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका