शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Thane: मुंबई मनपा पाणी कपातीचा फटका ठाण्याला कपातीचा फटका बसू नये यासाठी ठाणे मनपाने केले नियोजन

By अजित मांडके | Updated: February 27, 2024 16:15 IST

Thane News: देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव शहरातील काही भागात आठवड्यातून १५ दिवसातून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पाणी कपात केली जात आहे. परंतु आता मुंबई महापालिकेकडून देखभाल दुरुस्तीसाठी पाणी कपात लागू करण्यात आली असल्याने त्याचा फटका देखील ठाण्यातील बहसुंख्य भागांना बसणार आहे.

- अजित मांडके  ठाणे - देखभाल दुरुस्तीच्या कारणास्तव शहरातील काही भागात आठवड्यातून १५ दिवसातून ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पाणी कपात केली जात आहे. परंतु आता मुंबई महापालिकेकडून देखभाल दुरुस्तीसाठी पाणी कपात लागू करण्यात आली असल्याने त्याचा फटका देखील ठाण्यातील बहसुंख्य भागांना बसणार आहे. त्यामुळे ज्या भागांना पाणी कपातीचा फटका बसणार आहे. त्याठिकाणी पाणी पुरवठ्याचे नियोजन ठाणे महापालिकेने केले आहे. त्यानुसार ज्या भागांना दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी पुरवठा केला जात आहे. त्याभागांना आता पुढील काही दिवस दिवसातून एकदा दोन तास पाणी पुरवठा करण्याचे नियोजन ठाणे महापालिकेने आखले आहे.

मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठयाच्या पिसे येथील पाणी उद्चंन केंद्रामध्ये अचानक आग लागल्याने मुंबईतील अनेक भागांचा पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. त्यानुसार सोमवारी रात्रीपासूनच मुंबई महापालिकेकडून देखभाल दुरुस्तीसाठी पाणी कपात लागू केली आहे. त्यानुसार त्याचा फटका आता ठाणे शहरातील बहुसंख्य भागांना बसणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेकडून ठाण्याला रोज ८५ दशलक्ष लीटर एवढा पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु आता मुंबई महापालिकेने ठाण्यात देखील ५० टक्के पाणी कपात लागू केली आहे. जो पर्यंत काम पूर्ण होत नाही, तो पर्यंत ही कपात लागू असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या पाणी कपातीचा सामना आता शहरातील धोबी घाट कोपरी पूर्व, आनंद नगर गांधी नगर, नौपाडा, बी कॅबीन, राम मारुती रोड टेकडी बंगला, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, वागळे इस्टेट, साईनाथ नगर, रघुनाथ नगर, अंबिका नगर, जिजामाता नगर, रामंचद्र नगर, इंदिरा नगर आदी भागांना याचा फटका बसणार आहे.

येथील बहुसंख्य भागांना दिवसातून दोन किंवा तीन वेळा पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु येथील रहिवाशांना पाणी कपातीचा अधिकचा फटका बसू नये यासाठी महापालिकेने उपाय योजना आखल्या आहेत. त्यानुसार येथील भागांना आता दिवसातून एकदाच दोन तास पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार गावदेवी येथील पाण्याची टाकी भरल्यानंतर येथील भागांना पाणी पुरवठा आणि टेकडी बंगला येथील पाण्याची टाकी भरल्यानंतर तेथील भागांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.

टॅग्स :WaterपाणीThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका