शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ठाकुर्ली... स्थानक आणि परिसर ‘मेकओव्हर’च्या वाटेवर

By admin | Updated: January 23, 2017 05:34 IST

सन १८५३ मध्ये तत्कालीन बोरीबंदर ते ठाणे रेल्वे दरम्यान रेल्वे सुरू झाली. नंतर ही रेल्वे ठाण्यापलिकडे कल्याण, कर्जत, कसारामार्गे

सन १८५३ मध्ये तत्कालीन बोरीबंदर ते ठाणे रेल्वे दरम्यान रेल्वे सुरू झाली. नंतर ही रेल्वे ठाण्यापलिकडे कल्याण, कर्जत, कसारामार्गे दक्षिण-उत्तर भारतात धावू लागली. १९२५ मध्ये विजेवर चालणारी इंजिने आली. त्यावेळी टाटांकडून वीज घेतली जात होती. मात्र, विजेबाबतीत स्वावलंबी असावे, यासाठी ब्रिटिशांच्या जीयआयपी रेल्वे या कंपनीने १९२९ मध्ये भारतातील पहिले वीज निर्मिती केंद्र ठाकुर्ली येथे सुरू केले. हे केंद्र ‘चोळा पॉवर हाऊस’ किंवा ‘कल्याण बिजली घर’ म्हणून ओळखले जात होते. त्यासाठी ठाकुर्ली खाडीनजीक १९१६ पासून १०० एकर जागा संपादित केली गेली. १९२९ ते १९८७ अशी ५८ वर्षे या पॉवर हाउसमध्ये टप्प्याटप्प्याने १३६ मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी दररोज ३० वॅगन दगडी कोळसा लागायचा. तो मध्य प्रदेश, झारखंड, बिहारहून येई. ठाकुर्ली खाडीच्या गोड्या पाण्याची बॉयरलरमध्ये वाफ केली जात असे. त्यासाठी कोळसा वापरला जात होता. ही वाफ वीज जनित्रांना पुरवली जायची आणि वीज निर्मिती होत असत. या पावर हाऊसमधील वीज मुंबई, लोणावळा आणि इगतपुरीदरम्यान वापरली जात होती. या पॉवर हाऊसमध्ये इंग्लंड, जर्मनी, जपानमधून आयात केलेली टर्बाइन आणण्यात आली होती. डिसेंबर १९८७ मध्ये या पॉवर हाऊसमध्ये बॉयलरचा मोठा स्फोट झाला. त्यात ४०० डिग्री से. इतक्या तापमानाच्या वाफेने आठ कर्मचारी भाजून मृत्युमुखी पडले. त्यानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री माधवराव शिंदे यांनी वीजनिर्मिती हे रेल्वेचे काम नसल्याचे जाहीर केल्याने डिसेंबर १९८७ पासून हे पॉवर हाउस बंद पडले. भविष्यात याच पॉवर हाऊसमध्ये देशातील पहिले एलिव्हेटेड (उड्डाण) टर्मिनस उभे राहणार आहे. १९२९ ला पॉवर हाऊसच्या निर्मितीमुळे ठाकुर्ली स्थानक अस्तित्वात आले. डोंबिवली पश्चिमेला असलेल्या मोठागाव ठाकुर्ली या गावाच्या नावावरून स्थानकाला ते नाव पडले. सुरुवातीला येथे फलाटही नव्हते. शिड्यांच्या आधारे प्रवासी गाडीत चढ-उतार करत असत. पुढे फलाटाची निर्मिती झाली. ब्रिटिश काळापासून रेल्वेच्या दृष्टीने ठाकुर्ली रेल्वे स्थानक महत्त्वाचे होते. पूर्वेला असलेल्या १२ बंगला परिसरात ब्रिटीश अधिकारी, तर पश्चिमेला ५२ बंगल्यात कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था होती. आता पूर्वेला बंगला परिसराचा ताबा आरपीएफकडे आहे. तेथे त्यांचे प्रशिक्षण स्थळ आणि निवास व्यवस्था आहे. ठाकुर्ली पूर्व-पश्चिमेला मिळून जवळपास २०० एकरांपेक्षा जास्त जागा रेल्वेच्या मालकीची आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावरील काही स्थानके ही कायमच उपेक्षित मानली गेली. त्यात ठाकुर्ली हे स्थानक होते. ठाकुर्ली ते कल्याण हा समांतर रस्ता तयार झाला. त्यामुळे याठिकाणच्या जागेला प्रचंड भाव आला. कांचनगाव, खंबाळपाडा, ठाकुर्ली स्टेशन विभागात १२ मजली व त्याहून अधिक उंचीचे टॉवर उभारले जात आहेत. लोकवस्ती वाढल्याने ठाकुर्ली स्थानकाचा वापरही वाढला. प्रवासी संख्या वाढत असली, तरी सोयी सुविधांची वानवा असल्याने रेल्वेकडे १९९८ पासून तत्कालीन स्थानिक भाजपा नगरसेवक श्रीकर चौधरी हे स्थानक विकासाच्या विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या पाठपुराव्याला २०१६ मध्ये यश आले आहे.रेल्वेने कल्याण दिशेला पादचारी पूल आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्यासाठी ३० कोटी रुपये मंजूर केले. त्यापैकी १७ कोटी रुपये खर्चून ठाकुर्ली रेल्वे स्थानकाचा विस्ताराचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या पश्चिमेला होम प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे. त्यात सध्या पादचारी पुलावर असलेली तिकीट खिडकी आता होम फ्लॅटफॉर्म खाली येणार आहे. पादचारी पूलावर चढून तिकीट काढण्याचा द्राविडी प्राणायाम करावा लागणार नाही. पूर्वेलाही तिकीट खिडकी असावी, अशी चौधरी यांची मागणी आहे.