शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

ठाकुर्ली... स्थानक आणि परिसर ‘मेकओव्हर’च्या वाटेवर

By admin | Updated: January 23, 2017 05:34 IST

सन १८५३ मध्ये तत्कालीन बोरीबंदर ते ठाणे रेल्वे दरम्यान रेल्वे सुरू झाली. नंतर ही रेल्वे ठाण्यापलिकडे कल्याण, कर्जत, कसारामार्गे

सन १८५३ मध्ये तत्कालीन बोरीबंदर ते ठाणे रेल्वे दरम्यान रेल्वे सुरू झाली. नंतर ही रेल्वे ठाण्यापलिकडे कल्याण, कर्जत, कसारामार्गे दक्षिण-उत्तर भारतात धावू लागली. १९२५ मध्ये विजेवर चालणारी इंजिने आली. त्यावेळी टाटांकडून वीज घेतली जात होती. मात्र, विजेबाबतीत स्वावलंबी असावे, यासाठी ब्रिटिशांच्या जीयआयपी रेल्वे या कंपनीने १९२९ मध्ये भारतातील पहिले वीज निर्मिती केंद्र ठाकुर्ली येथे सुरू केले. हे केंद्र ‘चोळा पॉवर हाऊस’ किंवा ‘कल्याण बिजली घर’ म्हणून ओळखले जात होते. त्यासाठी ठाकुर्ली खाडीनजीक १९१६ पासून १०० एकर जागा संपादित केली गेली. १९२९ ते १९८७ अशी ५८ वर्षे या पॉवर हाउसमध्ये टप्प्याटप्प्याने १३६ मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी दररोज ३० वॅगन दगडी कोळसा लागायचा. तो मध्य प्रदेश, झारखंड, बिहारहून येई. ठाकुर्ली खाडीच्या गोड्या पाण्याची बॉयरलरमध्ये वाफ केली जात असे. त्यासाठी कोळसा वापरला जात होता. ही वाफ वीज जनित्रांना पुरवली जायची आणि वीज निर्मिती होत असत. या पावर हाऊसमधील वीज मुंबई, लोणावळा आणि इगतपुरीदरम्यान वापरली जात होती. या पॉवर हाऊसमध्ये इंग्लंड, जर्मनी, जपानमधून आयात केलेली टर्बाइन आणण्यात आली होती. डिसेंबर १९८७ मध्ये या पॉवर हाऊसमध्ये बॉयलरचा मोठा स्फोट झाला. त्यात ४०० डिग्री से. इतक्या तापमानाच्या वाफेने आठ कर्मचारी भाजून मृत्युमुखी पडले. त्यानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री माधवराव शिंदे यांनी वीजनिर्मिती हे रेल्वेचे काम नसल्याचे जाहीर केल्याने डिसेंबर १९८७ पासून हे पॉवर हाउस बंद पडले. भविष्यात याच पॉवर हाऊसमध्ये देशातील पहिले एलिव्हेटेड (उड्डाण) टर्मिनस उभे राहणार आहे. १९२९ ला पॉवर हाऊसच्या निर्मितीमुळे ठाकुर्ली स्थानक अस्तित्वात आले. डोंबिवली पश्चिमेला असलेल्या मोठागाव ठाकुर्ली या गावाच्या नावावरून स्थानकाला ते नाव पडले. सुरुवातीला येथे फलाटही नव्हते. शिड्यांच्या आधारे प्रवासी गाडीत चढ-उतार करत असत. पुढे फलाटाची निर्मिती झाली. ब्रिटिश काळापासून रेल्वेच्या दृष्टीने ठाकुर्ली रेल्वे स्थानक महत्त्वाचे होते. पूर्वेला असलेल्या १२ बंगला परिसरात ब्रिटीश अधिकारी, तर पश्चिमेला ५२ बंगल्यात कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था होती. आता पूर्वेला बंगला परिसराचा ताबा आरपीएफकडे आहे. तेथे त्यांचे प्रशिक्षण स्थळ आणि निवास व्यवस्था आहे. ठाकुर्ली पूर्व-पश्चिमेला मिळून जवळपास २०० एकरांपेक्षा जास्त जागा रेल्वेच्या मालकीची आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावरील काही स्थानके ही कायमच उपेक्षित मानली गेली. त्यात ठाकुर्ली हे स्थानक होते. ठाकुर्ली ते कल्याण हा समांतर रस्ता तयार झाला. त्यामुळे याठिकाणच्या जागेला प्रचंड भाव आला. कांचनगाव, खंबाळपाडा, ठाकुर्ली स्टेशन विभागात १२ मजली व त्याहून अधिक उंचीचे टॉवर उभारले जात आहेत. लोकवस्ती वाढल्याने ठाकुर्ली स्थानकाचा वापरही वाढला. प्रवासी संख्या वाढत असली, तरी सोयी सुविधांची वानवा असल्याने रेल्वेकडे १९९८ पासून तत्कालीन स्थानिक भाजपा नगरसेवक श्रीकर चौधरी हे स्थानक विकासाच्या विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या पाठपुराव्याला २०१६ मध्ये यश आले आहे.रेल्वेने कल्याण दिशेला पादचारी पूल आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्यासाठी ३० कोटी रुपये मंजूर केले. त्यापैकी १७ कोटी रुपये खर्चून ठाकुर्ली रेल्वे स्थानकाचा विस्ताराचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या पश्चिमेला होम प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे. त्यात सध्या पादचारी पुलावर असलेली तिकीट खिडकी आता होम फ्लॅटफॉर्म खाली येणार आहे. पादचारी पूलावर चढून तिकीट काढण्याचा द्राविडी प्राणायाम करावा लागणार नाही. पूर्वेलाही तिकीट खिडकी असावी, अशी चौधरी यांची मागणी आहे.